Advertisement

Showing posts with label dainik sanatan prabhat. Show all posts
Showing posts with label dainik sanatan prabhat. Show all posts

Saturday, January 8, 2011

काळ्या पैशाचा भस्मासुर !

देशात समांतर अर्थव्यवस्था चालू आहे, असे म्हटले जाते. ही समांतर अर्थव्यवस्था म्हणजे काळ्या पैशाचे साम्राज्य ! प्रतिवर्षी केंद्रशासन उत्पन्न आणि व्यय यांचे विविध मार्ग अर्थसंकल्पातून मांडते. सुयोग्य प्रशासन, शांतता आणि भरभराट यांसाठी संरक्षणसिद्धता, सामाजिक विकास, आर्थिक विकास या गोष्टी आवश्यक आहेत. तो साधण्यासाठी व्ययाची (खर्चाची) आखणी करावी लागते. अर्थातच यासाठी शासनाकडे निधीचा पुरेसा स्रोत उपलब्ध असावा लागतो. शासनाच्या उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत म्हणजे प्राप्तीकर! देशाच्या खर्चातील ठराविक वाटा उचलण्याचे नैतिक दायित्व प्रत्येक नागरिकाचे आहे आणि ते दायित्व पार पाडण्यासाठी प्राप्तीकर हे एक माध्यम आहे. देशात दारिद्र्यरेषेखाली रहाणारे, तसेच दारिद्र्यरेषेच्या किंचित वर रहाणारे नागरिक आहेत. त्यांच्याकडून करभरणा अपेक्षित नाही.
परिणामी ज्यांचे आर्थिक उत्पन्न दैनंदिन निकड भागवूनही शिल्लक रहाण्याएवढे आहे, त्यांच्यावर प्रत्यक्ष कर भरण्याचे दायित्व येते. आपल्या देशात बहुसंख्य लोकसंख्या ही कर न भरणार्‍या गटात मोडते आणि जे अल्प प्रमाणातील लोक कर भरतात, त्यांपैकी काही जण करचुकवेगिरी करतात. हा चुकवलेला कर म्हणजे काळा पैसा ! ‘काळा पैसा' या शब्दांमधूनच गोपनीयता आणि अवैधपणाची छटा लक्षात येते. काळा पैसा म्हणजे नेमके काय ? अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर, ‘ज्या उत्पन्नावर एखाद्याने कर भरला पाहिजे; मात्र तो भरला जात नाही’, असे उत्पन्न म्हणजे काळा पैसा ! कायदेशीर मार्गाने पैसा कमवायचा; मात्र त्यावर कर भरायचा नाही. या काळ्या पैशामुळे सर्वाधिक हानी कशाची होते ? अर्थातच, शासनाची हानी मोठ्या प्रमाणावर होते. प्राप्तीकरातून मिळणारे शासनाचे उत्पन्न बुडते. दुसरे म्हणजे काळ्या पैशामुळे प्रामाणिक करदात्यांवरचा दबाव वाढतो. शिवाय, आर्थिक असमतोल निर्माण होतो आणि देशातील मूठभरांच्या हाती संपत्ती एकवटू लागते. करचुकवेगिरीचे प्रमाण जितके वाढते, तितकाच काळा पैसा वाढतो. कर चुकवणारे काळ्या बाजारात मोठ्या प्रमाणावर देवाण-घेवाण करतात. वस्तू-मालाचा साठा करतात. त्यातून खुल्या बाजारात टंचाई वाढून महागाई वाढते. काळ्या पैशाचे अस्तित्वच बर्‍याच प्रमाणात महागाईला उत्तरदायी असते. टंचाई, भाववाढ आणि जमाखर्चाचा ताळमेळ बिघडण्यातही काळ्या पैशाचा वाटा असतो. राजू चेलिया गटाच्या अहवालानुसार भारतात प्रत्येक रुपयाच्या व्यवहारातील एक पंचमांश भाग हा काळ्या व्यवहारात होतो. १९८३-८४ या एकाच आर्थिक वर्षात तब्बल ३६ सहस्र कोटी किंवा तेव्हाच्या ढोबळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या तब्बल २१ टक्के भाग काळा पैसा होता, असे या गटाने म्हटले आहे. याचा अर्थ प्रतिदिनचा आर्थिक गैरव्यवहार होता शंभर कोटी रुपयांचा ! ही काही अंतिम आकडेवारी नव्हे. कारण परकीय व्यापारातील लाचखोरी, तस्करी आणि परकीय चलन व्यवहारासह अमली पदार्थ अन् इतर गुन्हेगारी व्यवहारांतून जन्मणार्‍या काळ्या पैशाची मोजदाद करता आली नसल्याचे गटानेच मान्य केले आहे. काही अर्थतज्ञ तर असा दावा करतात की, भारतीय ढोबळ उत्पान्नाच्या ९८ टक्के काळा पैसा आहे !
काळा पैसा आणि शासन !
काळ्या पैशातील खोट त्या पैशात नाही; तर तो ज्या पद्धतीने जमवला जातो, त्यामध्ये आहे. लाचखोरी, तस्करी, बनावट कागदपत्रांसारखी गुन्हेगारी यांसारख्या माध्यमातून काळा पैसा साठवला जातो. हा पैसा परदेशात पाठवणे आणि साठेबाजीसाठी वापरणे, अशा पद्धतीने अस्तित्वात रहातो. काळा पैसा हे देशातील भ्रष्टाचाराचे एक स्वरूप आहे. देशातील भ्रष्टाचाराची वेगळी उदाहरणे द्यायची आवश्यकता सध्यातरी वाटत नाही. महाराष्ट्र म्हटला म्हणजे ‘आदर्श’ घोटाळा डोळ्यांसमोर येतो. गोवा म्हटले, तर अमली पदार्थाचा व्यापार दिसायला लागतो. दिल्ली म्हटले, तर २-जी स्प्रेक्ट्रम आणि राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा दिसायला लागतात. कर्नाटक म्हटले, तर भूखंड घोटाळा, बिहार म्हटले, तर चारा घोटाळा, वगैरे वगैरे ! देशात ७३ लक्ष कोटी रुपये एवढा काळा पैसा आहे. यातील मोठा हिस्सा स्विस बँकेत गेला आहे. ही रक्कम एवढी मोठी आहे की, काही जणांच्या मते देशाचे चार अर्थसंकल्प यातून भरून निघतील, काही जणांच्या मते सर्व प्रकारची करवसुली थांबवली, तरी तीस वर्षांपर्यंत काळजी करण्याची आवश्यकता भासणार नाही, तर काही अर्थतज्ञ म्हणतात, ‘देशाच्या माथी असलेले सर्व कर्ज फेडले जाऊन पैसा शिल्लक उरेल ! योगतज्ञ प.पू. रामदेवबाबा देशभर भ्रमंती करून देशातील काळ्या पैशाच्या अस्तित्वाविषयी जनजागृती करत आहेत. राजकीय क्षेत्रात प्रवेश करून देशाला या आर्थिक दुरवस्थेतून बाहेर काढण्याचा त्यांचा निश्चय आहे. स्विस बँकेने भारतीय खातेदारांची नावे उघड करायची सिद्धता दाखवली, जर्मनीने त्यात साहाय्य करण्याची सिद्धता दाखवली, तरी देशातील काँग्रेसप्रणीत शासन काहीच कृती करण्यास सिद्ध नाही. स्विस बँकेने कळवल्याप्रमाणे भारतियांचा एकूण काळा पैसा जगभरातील इतर देशांतील लोकांच्या पैशांच्या बेरजेहून अधिक आहे. हा पैसा भारतात आला, तर देशाला महासत्ता बनण्यासाठी २०२० पर्यंत वाट पहावी लागेल का ? भ्रष्टाचार्‍यांना शिक्षा करण्यासाठी उत्तम प्रशासनच हवे. ते कोणत्याही विद्यमान राजकीय पक्षाला शक्य नाही. त्यासाठी ईश्वरी राज्यच हवे.

काँगे्रस शासन जाणीवपूर्वक हिंदुत्ववाद्यांना गुन्ह्यांमध्ये अडकवत आहे - रा.स्व. संघ

स्वामी असीमानंद यांनी समझौता एक्स्प्रेस स्फोटातील सहभागाची कबुली दिल्याचा प्रसारमाध्यमांचा दावा
नवी दिल्ली, ७ जानेवारी (वृत्तसस्था) - स्वामी असीमानंद यांनी फेब्रुवारी २००७ मध्ये झालेल्या समझौता एक्स्प्रेसमधील बाँबस्फोटात त्यांचा सहभाग असल्याचे मान्य केल्याचे वृत्त ‘टाईम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीने दिले आहे. या वृत्तावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना संघाचे प्रवक्ते राम माधव म्हणाले, ‘‘केंद्रशासन खूप पूर्वीपासून हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवायांमध्ये जाणीवपूर्वक अडकवत आहे.’’
(केंद्रातील काँग्रेसचे राज्यकर्ते आयएस्आयच्या हस्तकाप्रमाणे कार्य करत आहेत. ते हिंदुत्ववादी संघटनांना जाणीवपूर्वक आतंकवादी ठरवत आहेत, हे प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिक जाणून आहे, तेच सत्य पुन्हा सांगून राम माधव काय साध्य करू इच्छित आहेत ? राम माधव यांनी केवळ लोकांना माहिती असणार्‍या गोष्टीच पुन्हा सांगत बसण्याऐवजी राज्यकर्त्यांना जरब बसून ते हिंदूंच्या भावनांशी खेळ करणार नाहीत, अशी कृती करणे हिंदूंना अपेक्षित आहे. संघाचे नेतृत्व हिंदूंच्या भावना समजून त्याप्रमाणे कृती करणार का ? - संपादक)
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार असीमानंद यांनी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्‍यांसमोर समझौता एक्स्प्रेस स्फोटात हिंदुत्ववादी संघटनांचा हात आहे, असे मान्य केले आहे. (काँग्रेसचे राज्यकर्ते केंद्रीय अन्वेषण विभाग आणि विकाऊ प्रसारमाध्यमे यांना हाताशी धरून िंहदुत्ववादी संघटना आणि नेते यांना संपवण्यासाठी किती नियोजनबद्धरीत्या त्यांची मानहानी करत आहेत, त्याचेच हे एक उदाहरण आहे. हिंदू संघटित नसल्यानेच काँग्रेसचे राज्यकर्ते असे साहस करू धजावत आहेत. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी त्यांचे व्यापक संघटन निर्माण करून राष्ट्र आणि धर्म प्रेमी राज्यकर्त्यांच्या हातात सत्ता सोपवायला हवी ! - संपादक)
स्वामी असीमानंद यांनी मक्का मशीद आणि अजमेर दर्गा येथे झालेल्या स्फोटांत संघाचे नेते इंद्रेशकुमार यांच्या कथित संबंधांविषयीही माहिती दिली आहे. तसेच साध्वी प्रज्ञा सिंग, सुनील जोशी, इंद्रेशकुमार आणि इतर यांनी देशभर आतंकवादी आक्रमणे करण्याचा कट रचला होता, याचीही माहिती दिली आहे, असे प्रसारमाध्यमांनी त्यांच्या वृत्तात म्हटले आहे. (एखाद्या खटल्याचे कामकाज चालू असतांना त्याविषयीची अशी माहिती प्रसारमाध्यमांकडून कोणताही अधिकृत हवाला न देता प्रसारित केली जाते, हा हिंदुत्ववादी संघटनांच्या मानहानीच्या व्यापक कटाचाच भाग आहे, असेच म्हणावे लागेल. या प्रसारमाध्यमांनी कधीच जिहादी संघटनांच्या संदर्भात असे वृत्त दिलेले नाही. हिंदूंची अशी जाणीवपूर्वक मानहानी करणार्‍या प्रसारमाध्यमांना धडा शिकवण्यासाठी हिंदूंची त्यांच्यावर बहिष्कार घालायला हवा ! - संपादक)

Friday, January 7, 2011

द्रौपदीचे अश्लाघ्य विडंबन असणारे ‘अमूल बॉडीवेअर’चे विज्ञापन मागे !

हिंदु जनजागृती समितीच्या सनदशीर विरोधाचा परिणाम !
हिंदूंनो, या यशाबद्दल श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा !
हिंदु जनजागृती समितीचे यश !
मुंबई, ६ जानेवारी (वार्ता.) - ‘अमूल बॉडीवेअर’च्या विज्ञापनात हिंदूंचा धर्मग्रंथ असणार्‍या ‘महाभारता’तील द्रौपदीचे अत्यंत हीन पातळीला जाऊन विडंबन केले होते. ते दूरचित्रवाहिन्या आणि ‘यूट्यूब’ यांवर दाखवण्यात येत होते. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांचा सनदशीर विरोध आणि समितीचे मुंबई, ठाणे अन् रायगड जिल्ह्यांचे समन्वयक श्री. शिवाजी वटकर यांनी चिकाटीने केलेला पाठपुरावा यांमुळे सदर विज्ञापन मागे घेण्यात आले आहे. (छोट्याशा हिंदु जनजागृती समितीला असणार्‍या ईश्वरी अधिष्ठानामुळेच धर्महानी रोखली जाऊ शकते. यातून बोध घेऊन अन्य हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते साधना करतील का ? - संपादक) या विज्ञापनात प्रथम थंडीमुळे रग गुंडाळलेली एक व्यक्ती दुसर्‍या रग गुंडाळलेल्या व्यक्तीचे वस्त्रहरण करत आहे. बारबालाही रग गुंडाळूनच अश्लील हावभाव करत नृत्य करत आहेत; मात्र ‘अमूल बॉडीवेअर’ अंगात घातल्यानंतर द्रौपदी अत्यंत अल्प वस्त्रांत उपस्थितांवर चुंबनांचा वर्षाव करत वस्त्रहरणाचा आनंद लुटत आहे,
असे दाखवण्यात आले होते. या संदर्भात श्री. वटकर यांनी ‘अमूल बॉडीवेअर’शी संपर्क साधून निषेध नोंदवला; मात्र नाताळच्या सुटीचे कारण सांगून त्यांना कुणी दाद दिली नाही. त्यानंतर सदर विडंबनाचे वृत्त दैनिक ‘सनातन प्रभात’च्या १ जानेवारीच्या अंकात आणि समितीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले. त्यानंतर हिंदु धर्माभिमान्यांनी निषेध नोंदवला. श्री. वटकर यांनी ‘अमूल बॉडीवेअर’चे वितरण व्यवस्थापक श्री. रमेश यांचा सतत पाठपुरावा केला. श्री. वटकर म्हणाले, ‘‘या विडंबनामुळे हिंदूंच्या धर्मभावना दुखावल्या आहेत. हिंदू तुमच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकतीलच, शिवाय हा धर्मभावनांचा प्रश्न असल्याने तुम्ही ईश्वरी कोपासही पात्र व्हाल.’’ श्री. रमेश यांनी विदेशात असणारे ‘अमूल बॉडीवेअर’चे मुख्य अधिकारी श्री. नवीन यांना संपर्क करून समस्त माहिती कळवली. त्यानंतर श्री. रमेश यांनी श्री. वटकर यांना कळवले की, सदर विज्ञापन दूरचित्रवाहिन्या आणि ‘यू-ट्यूब’वरून मागे घेण्यासाठी आम्ही विज्ञापन एजन्सीला कळवले आहे. ४८ तासातच ते मागे घेण्यात येईल. श्री. वटकर यांनी या संदर्भात लेखी क्षमायाचनेच्या पत्राची मागणी केल्यानंतर श्री. रमेश यांनी ते देण्याचे मान्य केले.

भ्रष्टाचार्‍यांच्या मुळावर उठलेला ‘माहिती अधिकार’ !

नगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी या लहानशा एका गावातून आलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रयत्नांमुळे ‘माहिती अधिकारा’चे शस्त्र समाजाला प्राप्त झाले आहे. अण्णा हजारे यांनी सातत्याने भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवला. शासनाला त्यांच्या आवाजाची दखल घ्यावी लागली आणि त्यातून ‘माहिती अधिकार’, हा कायदा अस्तित्वात आला. अर्थात त्यांच्या प्रयत्नांना सहजासहजी यश आले, असे कधी झाले नाही. उपोषणे आणि आंदोलने अशा सनदशीर मार्गांचा त्यांना अवलंब करावा लागला होता. तेथे कधी रक्तपात नव्हता किंवा िंहसाचार नव्हता. अण्णांनी त्यांचे आंदोलन चालू करायचे आणि त्या तथ्यपूर्ण आंदोलनाची राज्यशासनाने दखल घ्यायची, असे कित्येक दिवस चालू होते. राज्यातील राजकारण्यांना कोणतेही काम करतांना दोनदा विचार करावा लागत होता. हजारे यांचे एकसुद्धा आंदोलन अयशस्वी झाले, असे म्हणता येत नाही. त्यांचा त्या प्रकरणाचा अभ्यास आणि त्या प्रकरणाच्या संदर्भात शासनापुढे ओढवली जाणारी नामुष्की यांमुळे यशस्वी होण्यात संबंधित प्रकरणाला कधी आडकाठी आली नाही.
त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे काही मंत्र्यांना घरी बसावे लागले. त्या पार्श्वभूमीवर हजारे यांच्या विरोधातही तक्रारी दाखल झाल्या आणि काही प्रसंग हजारे यांच्या जिवावरही बेतले होते. ज्या कोणी घोटाळे आणि भ्रष्टाचार यांचे पाप केले होते, ते हजारे यांच्या विरोधात जात होते; पण म्हणून ते कधीही थांबले नाहीत आणि स्वतःची भ्रष्टाचारविरोधी चळवळ त्यांनी चालूच ठेवली. अण्णा हजारे समाजकल्याणाच्या ध्येयाने पे्ररित झालेले असल्यामुळे त्यांना त्यांच्या ध्येयाच्या व्यतिरिक्त काहीच दिसत नव्हते. त्यांच्या प्रयत्नांतून अस्तित्वात आलेल्या ‘माहिती अधिकार’ या कायद्यातून जनसामान्यांना हवी ती माहिती उपलब्ध होईल, भ्रष्टाचार्‍यांना जरब बसेल, शासकीय कारभारात पारदर्शकता येईल, अशा काही ठळक अपेक्षा होत्या. आता दिवस जसे पुढे पुढे जात आहेत, तसे या कायद्याच्या उपयुक्ततेविषयी किंवा लाभाविषयी प्रश्न निर्माण व्हायला आरंभ झाला आहे. भ्रष्टाचार आणि गैरकृत्ये यांना आळा घालून राज्याचा आणि पुढे देशाचा कारभार पूर्ण पारदर्शकतेतून पार पडण्यासाठी आणि त्यातून सुराज्य निर्माण करण्यासाठी हा कायदा म्हणजे प्राथमिक निकड आहे. त्याच्या कार्यवाहीच्या आड येणारे जर कोणी असतील, तर ते समाजहिताचे नाही; किंबहुना अशा प्रसंगी काहीतरी काळेबेरे आहे, असे गृहित धरायला हरकत नाही.
जनतेचा निश्चय महत्त्वाचा !
पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथील माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते सतीश शेट्टी यांनी ‘माहिती अधिकार’ कायद्याच्या साहाय्याने भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघड केली. त्यांनी जिल्ह्यातील भूमीची खरेदी-विक्री आणि वनभूमीचे व्यवहार यांसंबंधी माहिती मागवली होती. त्यांच्या या अर्जानंतर त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे राज्यभर संतापाची लाट निर्माण झाली. ही हत्या कोणी केली, हे जनतेला आता सहजपणे कळते; पण कायद्याच्या बंधनात अडकलेली जनता पुढाकार घेऊन अपराध्याला शिक्षा करू शकत नाही. आपल्या लोकराज्यातील (लोकशाहीतील) जनता प्रातिनिधिक शासनाएवढीच उत्तरदायी आहे. त्यामुळे जनतेच्या भावनांकडे दुर्लक्ष करता कामा नये. देशातील भूखंड म्हणजे आजच्या भ्रष्ट राजकारण्यांसाठी सापडलेली सोन्याची खाण आहे. राजकीय अधिकारांचा वापर करून भूखंडांतील गैरप्रकारांना खतपाणी घालण्याचे काम विद्यमान राजकारणी करत आहेत, ही गोष्ट दिवसागणिक उघड होत आहे. मुंबई शहरातील ‘आदर्श’ घोटाळ्यानंतर राज्यभरात होऊन गेलेली आणि शक्याशक्यता असलेली अनेक ‘भूखंड प्रकरणे’ वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होत आहेत. अशा प्रकरणांतून वाढत गेलेली भ्रष्टाचाराची कीड ‘माहिती अधिकार’च्या माध्यमातून नष्ट करायची आहे. कायद्याने दिलेला अधिकार वापरणार्‍यांचेच जर खून पडायला लागले, तर हे सुराज्य कसे होणार ? सतीश शेट्टी यांच्या हत्येच्या तपासाने वेग घेतला नाही, म्हणून अरुण माने नावाच्या व्यक्तीने विचारणा करणारा अर्ज केला आणि त्यांच्यावरही प्राणघातक आक्रमण झाले. हे कायद्याचे राज्य आहे का ? यातील खरा अपराधी कोण ? हा समाजकंटकांतील भ्रष्टाचार आहे कि राजकीय वर्तुळातील भ्रष्टाचार आहे कि या दोहोंचा मिळून एकत्र भ्रष्टाचार आहे ? ‘माहिती अधिकार’ या कायद्याने जनतेला एक प्रकारचा आत्मविश्वास दिला होता. पारदर्शक राजकीय कारभार आणि त्यातून सुराज्याची स्थापना साध्य करण्यासाठी हा कायदा उपयुक्त आहे, याची शासनाला जाणीव व्हायला हवी. अर्थात विद्यमान शासनाकडून ती अपेक्षा करणे योग्य नाही; कारण त्यांची विश्वासार्हता संशयातीत नाही. त्यासाठी धर्माधिष्ठित राज्यकर्त्यांची आवश्यकता आहे.

Saturday, May 1, 2010

महाराष्ट्र ५० वर्षांचा झाला तरी...!

महाराष्ट्र पन्नास वर्षांचा झाला ! त्याला आमचे अभिवादन !
एखादी व्यक्ती पन्नास वर्षांची होते, तेव्हा तिच्या कुटुंबियांच्या जीवनातील तो आनंदाचा क्षण असतो. त्यांच्या भावनांच्या उत्साहाला मर्यादा रहात नाहीत आणि तो क्षण कधीच संपू नये, असे सर्वांना वाटायला लागते.
महाराष्ट्र पन्नास वर्षांचा झाला, त्याविषयीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या उदयापासून पन्नाशीला पोहोचेपर्यंत त्याला पहाणारी जनता महाराष्ट्र भूमीवर आहे. देश स्वतंत्र झाला, असे म्हटल्यावर स्वातंत्र्यापूर्वी काय होते आणि स्वातंत्र्य कसे मिळाले, हे जाणून घेण्याचे कुतूहल निर्माण होते. तद्वतच महाराष्ट्र पन्नास वर्षांचा झाला म्हणजे त्याचा जन्म कसा झाला आणि त्याच्या जन्मापूर्वी काय होते, हे जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण होते. `छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र', अशी मराठी जनतेची भावुक श्रद्धा आहे. छत्रपतींनी महाराष्ट्राच्या उभारणीसाठी घेतलेले कष्ट डोळयासमोर उभे केले म्हणजे या राज्याचे जतन आणि सेवा करणे, हे आपल्या जीवनातील एक अटळ कर्तव्य आहे, अशी भावना निर्माण होते. महाराष्ट्र शूरांचा आहे, तो मर्दांचा आहे, तो धारातीर्थी पडणाऱ्यांचा आहे, तो संतांचा आहे आणि तो हिंदूंचा आहे. महाराष्ट्राची ही सगळी वैशिष्ट्ये त्याच्या इतिहासाच्या अभ्यासातून लक्षात यायला लागतात. विलक्षण योग्यतेची ही वैशिष्ट्ये कोणा दुसऱ्या राज्याला लाभली असतील, असे वाटत नाही. मराठी भाषिकांना मुंबईसह महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी जो लढा द्यावा लागला, तो प्रामुख्याने महाराष्ट्र आणि मराठीद्वेष्ट्या काँग्रेसच्या राजवटीच्या विरोधात होता. मुंबई केंद्रशासित ठेवण्याचा घाट महाराष्ट्र काँग्रेसमधील लाचार मराठी नेत्यांसकट त्या वेळचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी घातला होता. नेहरूंपेक्षा महाराष्ट्र मोठा नाही, असे म्हणण्यापर्यंत काँग्रेसमधील या लाचार मराठी नेत्यांची मजल गेली होती. या लाचार नेत्यांकडून काँग्रेसमध्ये चालणाऱ्या या व्यक्तीपूजेच्या राजकारणात `मराठीच्या अस्मितेचे दर्शन होणे अशक्य होते.' त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र समिती या नावाने विरोधकांचे जे संघटन होते, त्याचेच तेवढे प्रयत्न आशादायी वाटत होते. अर्थात या समितीच्या प्रयत्नांना तोड नव्हती, असे म्हणून विस्तारभयास्तव समितीच्या कार्याचा सविस्तर परामर्श घेण्याचे टाळून महाराष्ट्र उदयास आल्यानंतरच्या कालावधीकडे वळता येईल.

आजचा महाराष्ट्र !
भाषेच्या निकषावर राज्याची निर्मिती करण्यामागे `त्या प्रदेशाचा भाषेच्या आधारावर संस्कृती जोपासनेसह सर्वांगीण विकास' हा प्रमुख हेतू होता. भारतीय राज्यघटनेत निधर्मी राज्यप्रणालीचे जे कलम आहे त्याचा भावार्थ योग्य त्या पद्धतीने लावला गेला नाही. देशातील जनतेला तिच्या धर्माप्रमाणे म्हणा किंवा पंथाप्रमाणे म्हणा, आचरण ठेवण्याची मुभा घटनेने दिलेली आहे. असे असतांना निधर्मी या शब्दाचे राजकारणात स्तोम माजवण्यात आले आणि त्याचा आधार घेऊन काँग्रेसच्या शासनाने महाराष्ट्राची उत्कृष्ट परंपरा आणि संस्कृती यांकडे दुर्लक्ष करण्याचे बंधन स्वत:वर घालून घेतले. पंढरपूरच्या विठ्ठलाची पूजा आषाढी-कार्तिकीला करणार, हिंदु भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेला मंदिरातील पैसा सरकार जमा करणार; परंतु मंदिराचा लाभ हिंदु भाविकांना करून देण्याकडे लक्ष देणार नाही, ही काँग्रेसच्या नेत्यांची नीती झाली. जनतेचे हित ओळखून त्याप्रमाणे कृती करता न येणाऱ्यांना राज्यकर्ता म्हणता येत नाही. राज्यात अत्यंत पवित्र आणि भाविकांची नितांत श्रद्धा असलेली जी देवस्थाने आहेत, त्यांना कह्यात घेऊन त्यांच्या उत्पन्नाचा विनियोग मनमानीपणे करून जनतेच्या अर्पणभावाचा अनादर करण्याचे वाईट काम या सरकारकडून होत आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. देशातील सर्वाधिक संत महाराष्ट्रात होऊन गेले आणि त्यांनी दाखवलेल्या जीवनमार्गाचे अनुकरण आज जनता करत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची आळंदी येथील समाधी जीर्णावस्थेत जाऊ दिली जाते आणि महाराष्ट्राचा शत्रू असलेल्या अफझलखानाच्या कबरीच्या सुरक्षेसाठी काँग्रेसचे राज्यशासन जीवाचे रान करते. धार्मिक श्रद्धा हा मराठी माणसाच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. तो मराठी माणसाचा अंगीभूत गुण आहे. काँगे्रसच्या शासनाला आपली जनता ओळखता आली नाही आणि निधर्मी शब्दाच्या दबावाखाली राहून भरकटलेल्या विचारसरणीच्या नेतृत्वाखालील अंधश्रद्धा निर्मूलन समितीला हाताशी धरून `श्रद्ध' जनांना सैरभैर करून टाकण्याचा निंद्य प्रकार काँग्रेस शासन करत आहे. राज्यघटनेचा हवाला देऊन निधर्मी राज्यकारभार करण्याच्या नादात हे शासन काहीही करू शकते. हिंदूंनी एवढेच लक्षात घ्यायला हवे की, छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याला धार्मिक बैठक होती. महाराज नसते तर प्रत्येकाची सुंता झाली असती, या कवी भूषण यांच्या काव्यपंक्तीत सर्वकाही आहे. आजचा महाराष्ट्र कोठे आहे ? निधर्मी या शब्दाचे आपल्या जीवनातील स्थान काय ? घटनेने दिलेेले अधिकार कोणते ? पुरोगामित्वाच्या शासनाच्या सूत्रामुळे आपल्या श्रद्धास्थानांना बाधा पोहोचते का ?, अशा प्रश्नांची योग्य उत्तरे मराठी जनांनी स्वत:च्या चिंतनाने मिळवली पाहिजेत.

हे व्हायला हवे
महाराष्ट्राबद्दल सर्वसामान्य जनतेचे एक स्वप्न आहे, ते म्हणजे राजा जनतेला पित्यासमान वाटावा, अशी त्याची धोरणे असावीत. राज्यातील जनतेला न्याय मिळत आहे, असे जाणवायला हवे. श्रद्धाळू जनतेला पोषक असे वातावरण राज्यात आहे, असे जाणवायला हवे. गुन्हेगाराला शिक्षा आणि गुणवंतांचे कौतुक, अशी राज्याची रीत असावी. राज्याविषयी स्वाभिमान वाटेल आणि राज्याच्या उत्कर्षासाठी जनतेला कृतीप्रवण व्हावेसे वाटेल, असे वातावरण हवे.नेते भ्रष्टाचारात अडकलेले आहेत, अशी शंका चुकूनही जनतेच्या मनात येणार नाही, अशी स्थिती हवी. आजच्या सुवर्णमहोत्सवाच्या मुहुर्तावर जनतेने लोकशाहीतील तिच्या अधिकाराखाली या गोष्टी सरकारपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. महाराष्ट्राला समकालीन असलेल्या गुजरात राज्याकडे देशातील सर्वांत विकसित राज्य म्हणून पाहिले जाते. महाराष्ट्राने देशातील आदर्श राज्य म्हणून नावारूपास येण्यासाठी जनतेचा अभ्युदय हा एकमेव निकष आहे. त्यासाठी राज्यशासनाला कोणते प्रयास घ्यावे लागतील, त्यावर आज चिंतन चालू झाले तरी पुरेसे आहे.

Wednesday, April 28, 2010

चर्चमधील अनैतिकता !


आपलाच धर्म श्रेष्ठ आहे. त्यामुळे संपूर्ण जग ख्रिस्तीमय व्हावे, या महत्त्वाकांक्षेने ख्रिस्ती मिशनरी जगभर धर्मप्रसार करत आहेत. भारतात एकूण लोकसंख्येच्या तुलनेत अधिकृत ८ प्रतिशत असणार्‍या ख्रिस्त्यांना येथे राजाश्रय मिळावा आणि मोठ्या प्रमाणात धर्मप्रसार करून धर्मांतरे करता यावीत यांसाठी विदेशांतून अमाप पैसा येत आहे.
हिंदुबहुल भारतात गरीब, अशिक्षित, बेरोजगार आणि अज्ञानी असलेली जनताच नव्हे, तर एकेश्‍वरवादी वा हिंदु धर्माचा अंशत: अभ्यास नसलेले अनेकजण ख्रिस्त्यांच्या या षड्यंत्राला बळी पडत आहेत. त्यामुळे भारतातील अनेक राज्ये आज ख्रिस्त्मय होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातील मिझोरम, नागालँड यांसारखी राज्ये तर पूर्णपणे ख्रिस्तीबहुल झाली आहेत. एकीकडे भारतात काही हिंदु लोक ख्रिस्त्यांच्या षड्यंत्राला बळी पडून धर्मांतर करत असतांना पाश्चात्त्य देशांतील ख्रिस्ती लोक मात्र चर्चमध्ये वाढत चाललेल्या अनैतिक गोष्टींमुळे चर्चपासून दूर जात आहेत. प्रेम, करुणा, सहिष्णुपणा यांचा बुरखा पांघरणार्‍या कॅथोलिक चर्चचे उघडे रूप आता जगासमोर येत आहे. असंख्य कॅथोलिक पाद्री स्वत:ची विकृत वासना शमवण्यासाठी त्यांच्याच धर्मबांधवांचे दशकानुदशके शोषण करत असल्याचे प्रकार अनेक देशांत सर्रास चालू असल्याचे उघड झाले आहे. आयर्लंड येथे पाद्र्यांनी अनेक मुलांवर बलात्कार, गुदसंभोग यांसारखे घृणास्पद शारीरिक अत्याचार अनेक दशके केले असल्याचे उघड झाले आहे. अमेरिकेत मिलवॉकी शहरात रेव्ह लॉरेन्स मर्फी याने कर्णबधिर मुलांच्या शाळेतील २०० मुलांचे लैंगिक शोषण केल्याचे मान्य केले आहे. बेल्जियममध्ये ७३ वर्षीय पाद्र्याने लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणावरून त्यागपत्रही दिले आहे. यात कहर म्हणजे आरोपी पाद्र्यांवर कारवाई करायची कि नाही, याचा निर्णय देणारे `कोंग्रेगेशन फॉर द डॉक्ट्रीन ऑफ दी फेथ' या व्हॅटिकनमधील कार्यालयाचे प्रमुख वरिष्ठ पदाधिकारी कार्डिनल जोसेफ रॅटसिंगर म्हणजेच सद्याचे पोप १६वे बेनेडिक्ट यांना पाद्र्यांच्या या विकृत चाळयाची माहिती असूनही त्यांनी त्याकडे सोयीस्कररीत्या आणि जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. या पोप महाशयांची किमान ३ प्रकरणांत आक्षेपार्ह भूमिका असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पाप्यांना पाठीशी घालणार्‍या पोपनी त्यागपत्र द्यावे, अशी मागणी सर्वत्र होत असतांना पोपनी मात्र `अनेक पिढ्यांना धर्मोपदेशक आणि नन्स यांच्या दुराचारी आणि पापी वर्तनामुळे दु:ख अन् यातना सहन कराव्या लागल्या आहेत, हे मी जाणतो आणि त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्‍त करतो', अशी वरवरची क्षमायाचना केली आहे़ अनेक दशके अत्याचार होत असल्याचे माहीत असतांनाही काहीच न करणारे पोपही या प्रकरणात तितकेच दोषी आहेत आणि त्यामुळे तेही शिक्षेस पात्र ठरतात. पोपच्या क्षमायाचनेनंतर अमेरिकी चर्चने विविध अत्याचारांपोटी २ अब्ज डॉलरची भरपाई पीडितांना दिली आहे; मात्र ही भरपाई केल्याने अत्याचारित मुलांच्या मनांवर खोलवरझालेल्या जखमा भरून येणार आहेत का ?

भारतीय प्रसारमाध्यमांचा ख्रिस्त्यांच्या कुकृत्यांकडे कानाडोळा !
समलिंगी जीवनाचा खुलेपणा स्वीकारणार्‍या मेरी ग्लासपुल या महिलेची चर्चमध्ये नेमणूक असो, लिऑ लाको या धर्मोपदेशकाचे एका नन्सची शरीरसंबंध असल्याचे उघड होताच त्याची करण्यात आलेली हकालपट्टी असो किंवा ख्रिस्त्यांचे अत्याचार कसे असतात, याचे चरित्रात्मक वर्णन असलेले मल्याळम् भाषेतील एका केरळी नन्सचे लोकप्रिय होणारे पुस्तक असो या आणि अशा अनेक घटनांतून ख्रिस्त्यांची खरी मानसिकता आणि (कु)संस्कृतीच उघड झाली आहे. अशा या ख्रिस्ती धर्मगुरूंच्या नैतिक अध:पतनाचा विषय सध्या चर्चेत असून पाश्चात्त्य वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्या यांनी हा विषय लावून धरला आहे. `न्यूयॉर्क टाइम्स'चे वार्ताहर या सर्व गोष्टींचा पर्दाफाश करून ख्रिस्त्यांचे खरे स्वरूप उघड करत आहेत. याउलट बेगडी धर्मनिरपेक्षता जपणारी भारतातील वृत्तपत्रे आणि वाहिन्या मात्र ख्रिस्त्यांच्या या सर्व प्रकरणांवर अवाक्षरही काढतांना दिसत नाहीत. ते केवळ हिंदु संतांवर नाहक आरोप करण्यातच धन्यता मानतात.

हिंदूंनो, धर्म वाचवा !
काही वर्षांपूर्वी श्रीलंकेत ख्रिस्ती मिशनरी धर्मप्रसाराचा उच्छाद मांडत असतांना त्याला विरोध करणार्‍या एका बौद्ध धर्मगुरूंची हत्या करण्यात आली. या वेळी तेथील धर्माभिमानी बौद्धांनी या घटनेची अतिशय गंभीर दखल घेतली. त्यानंतर बौद्धांनी ख्रिस्ती धर्मप्रसारकांच्या नाड्या चांगल्याच आवळल्या आणि श्रीलंकेतील सर्व चर्चेसच्या घंटा शांत झाल्या. भारतात निधर्मी (अधर्मी) राज्यकर्ते मात्र ख्रिस्ती मिशनरींना पायघड्याच घालत आहेत. भारतावर निधर्मी (अधर्मी) काँग्रेस शासन राज्य करत आहे. या पक्षाच्या सर्वेसर्वाही मूळच्या ख्रिस्तीच आहेत. त्यामुळे भारताचे संपूर्ण ख्रिस्तीकरणाचे पोपचे स्वप्न पूर्ण होण्यास एकप्रकारे हातभार लागत आहे. धर्माभिमानी हिंदूंनी हा धोका ओळखून आपल्या महान अशा हिंदु धर्माला वाचवण्यासाठी संघटन करणे आणि धर्मशिक्षण घेणेच आवश्यक आहे.

पाकसाठी हेरगिरी करणार्‍या भारतीय महिला अधिकार्‍यास अटक

नवी दिल्ली, २७ एप्रिल (वृत्तसंस्था) - पाकसाठी हेरगिरी करणार्‍या पाकमधील भारतीय उच्चायुक्‍त कार्यालयातील ५३ वर्षीय माहिला अधिकारी माधुरी गुप्‍ता यांना अटक करण्यात आली. (गुप्‍ता यांच्यासारख्या राष्ट्रद्रोह्यांना फाशीचीच शिक्षा द्यायला हवी ! - संपादक) गुप्‍ता यांना न्यायालयाने चार दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. केंद्रीय गृहसचिव जी.के. पिल्ले यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. इस्लामाबाद येथील भारतीय गुप्‍तचर यंत्रणा `रॉ'च्या प्रमुखांवरही संशय व्यक्‍त करण्यात येत असल्याचे वृत्त वृत्तसंस्थांकडून देण्यात आले आहे.
भारतीय विदेश सेवेच्या `ब' श्रेणीची अधिकारी असलेल्या गुप्‍ता या गेल्या दोन वर्षांपासून इस्लामाबाद येथील भारतीय दूतावासात कार्यरत होत्या. सार्क परिषदेच्या निमित्ताने त्यांना भारतात बोलावून अटक करण्यात आली. उर्दू उत्तमरीत्या जाणार्‍या गुप्‍ता दूतावासातील प्रसारमाध्यम आणि सूचना विभागात काम करत होत्या.

Sunday, July 5, 2009

हिंदूंकडून राष्ट्रविघातक कारवाया अशक्य ! - गुप्‍तवार्ता विभागाचे माजी महासंचालक अजितकुमार दोव्हाल

येत्या २६ नोव्हेंबरला मुंबईवरील अतिरेक्यांच्या आक्रमणाला एक वर्ष पूर्ण होईल. अजमल कसाब याला न्याय मिळावा, यासाठी धडपडणारे काँग्रेस शासन आक्रमणात ठार झालेल्या १८९ जणांना न्याय मिळावा म्हणून कधीच तडफडतांना दिसत नाही. उलट हिंदु आतंकवादी ही नवीन जमात निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्‍न करत आहे. त्यातीलच एक मालेगाव अन् मडगाव या घटनांमध्ये `बादरायण' संबंध जोडण्याच्या प्रयत्‍नाला, भारताच्या गुप्‍तवार्ता विभागाचे माजी महासंचालक अजितकुमार दोव्हाल यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ``हिंदु संघटनांकडून किंवा हिंदुत्ववादी विचारधारेकडून राष्ट्रविघातक कारवाया घडण्याची मला सुतराम शक्यता वाटत नाही'', असे म्हणत त्यांनी `हिंदु आतंकवादी' या संकल्पनेचा फज्जा उडवला आहे. त्यांची ,`रेडिफ' या संकेतस्थळावरील ही मुलाखत दैनिक `तरुण भारत'ने प्रसिद्ध केली. ती येथे आमच्या वाचकांसाठी देत आहोत.
पत्रकार : २६ नोव्हेंबरच्या घटनेनंतर `इंटेलिजन्स'च्या क्षमतेमध्ये काही फरक पडला आहे, असे तुम्हाला वाटते का ? दोव्हाल : `इंटेलिजन्स' (गुप्‍तवार्ता विभाग) च्या क्षमतेमध्ये एका रात्रीत बदल होऊ शकत नाही. त्यासाठी सातत्याने आपली कौशल्ये, शक्‍तीस्थाने आणि क्षमता अद्ययावत कराव्या लागतात आणि हे पालट गुणात्मक, रचनात्मक कार्यपद्धतीमधीलही असतात.पत्रकार : `इंटेलिजन्स' (गुप्‍तवार्ता विभाग) च्या क्षमतेमध्ये पालट म्हणजे नेमके काय ? ही संकल्पना जरा सविस्तर सांगाल ?दोव्हाल : स्पष्टपणे सांगायचे झाले, तर भारतामधील गुप्‍तवार्ता विभागामधील पालट हे प्रतिक्रियात्मक असतात. तपासकार्यामध्ये माहिती मिळवण्यासाठी काही त्रुटी आढळल्या की, त्या दुरुस्त करणे अपरिहार्य असते. प्रथम झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळणे, हे या पालटाचे प्राथमिक उद्दिष्ट असते; पण कित्येकदा हे पालट तुटपुंजे ठरतात. आता मुंबईवर आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणाचे उदाहरण पाहूया. हे आक्रमण पंचतारांकित हॉटेलांवर झाले होते. सुरक्षाव्यवस्थेमध्ये आणि हॉटेलला सुरक्षा पुरवण्याच्या यंत्रणेत आपण सुधारणा केल्या. यामुळे देशातील हॉटेल्स संपूर्णपणे सुरक्षित झालीही; पण देशाला असलेला आतंकवाद्यांचा धोका कमी झालेला नाही. कारण आतंकवादी पुढील वेळी पंचतारांकित हॉटेलवरच आक्रमण करतील, याची शक्यता नाही. थोडक्यात पालट घडवतांना आतंकवाद्यांच्या पालटत्या मनोवृत्तीचा, कार्यपद्धतीचा आणि क्षमतांचा वेध घेऊन ते घडवून आणावे लागतील. इथे प्रतिक्रियेपेक्षा आधीच कार्यान्वित होण्याच्या पद्धतीची आवश्यकता आहे. जर अतिरेकी `व्यापक मनुष्यहानी' करणार्‍या क्षेपणास्त्रांनी आक्रमण करणार असतील, तर आपल्याला त्यादृष्टीने सिद्ध रहावे लागेल. कदाचित लष्करी तळ किंवा आण्विक तळावर आक्रमण करणे, हेही त्यांचे उद्दिष्ट असू शकते. विरोधी पक्षाला चकवा देता यावा, यासाठी आतंकवादी संघटना त्यांची कार्यपद्धती आणि जागा सतत पालटत असतात; पण जेव्हा ते असे करण्यात अयशस्वी ठरतात, तेव्हा त्यांच्या कारवायांना लगाम घालणे शक्य होते. यासाठी ते त्यांचे लक्ष्य आणि मोहरे पालटत रहातात. त्यामुळे पालट हा संक्रमणासारखा असावा. मागील अपयशाच्या कारणांमध्ये दुरुस्त्या करत बसण्यापेक्षा तंत्र आणि तंत्रज्ञान, यांमध्ये गतीमानतेने आणि सहज ओळखता न येणारे पालट करणेही शहाणपणाचे ठरू शकते. `प्रत्येक पालट हा काळाच्या कसोटीला उतरलाच पाहिजे', हा हट्ट `इंटिलिजन्स'ला परवडणारा नाही. प्रत्येक वेळी काहीतरी अनपेक्षित आणि नवीन घडवून आणता येणे, हीच पालटाची गोम आहे. त्यासाठीच हेरखात्याला आतंकवाद्यांच्या दृष्टीकोनातून विचार करता आला पाहिजे. पत्रकार : मुंबईवरील आक्रमणामागे स्थानिकांचे सहकार्य हीसुध्दा खूपच चर्चिली गेलेली बाब आहे; मात्र मुंबई पोलीस सातत्याने त्याचा इन्कार करत आले आहेत, आपले मत काय ? दोव्हाल : सहस्रावधी वर्षे आपल्याला युरेनियमचे अस्तित्व माहीत नव्हते, याचा अर्थ युरेनियमचे अस्तित्व नाही, असा होत नाही. मुंबईवरील आक्रमण कोणत्याही अर्धशिक्षित परकीय नागरिकांकडून, परक्या भूमीवर आणि तोसुद्धा इतक्या नेमकेपणाने, वेळ आणि दिशा यांच्या अचूकतेने होणं हे स्थानिक साहाय्याशिवाय शक्यच नाही. केवळ मुंबई पोलिसांना स्थानिक स्तरावर साहाय्य करणारे धागेदोरे दुर्दैवाने मिळवता न येणे, याचा अर्थ `स्थानिक साहाय्य नव्हते', असे म्हणता येत नाही. आपण आजवरच्या आतंकवादी घटनांचा आणि आक्रमणांचा तपशीलवार विचार केला, तर आपल्या लक्षात येईल की, कोणतेच आक्रमण हे स्थानिकांच्या सहकार्याशिवाय तडीस नेता आलेले नाही. पत्रकार : म्हणजे अजूनही `स्थानिक' तपासकार्याला वाव आहे, असे म्हणता येईल ? दोव्हाल : माझ्या मते युद्ध आपण जिंकल्यानंतरच संपुष्टात येते. प्रयत्‍न करायला हवा. त्यादृष्टीने येथे पुष्कळ वाव आहे. पत्रकार : आतंकवादाच्या विरोधात लढण्यासाठी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव आहे, असे वाटते का ? शिवाय पाकिस्तान त्यादृष्टीने काही प्रयत्‍न करत असल्याचे वाटते का ?दोव्हाल : भारताच्या बाबतीत विचार करायचा झाला, तर पाकिस्तानवर खरंच कोणताही दबाव टाकण्यात आपण यशस्वी ठरलेलो नाही. पाकिस्तान वर्षानुवर्षांच्या आंतरराष्ट्रीय टिकेनंतर कोडगेपणाने वागू लागला आहे. आपल्या ढासळत्या प्रतिमेची पाकिस्तानला यत्किंचितही लाज वाटत नाही. स्वाभाविकच केवळ पाश्चिमात्य हितसंबंधांचा विचार करून त्या दृष्टीने अटकसत्र घडवणे म्हणजे प्रयत्‍न नव्हेत ! भारतविरोधी घातपाती कारवाया थांबवणे, घुसखोरी रोखणे, खोटी चलनव्यवस्था रोखणे, या दृष्टीने पाकिस्तानवर कोणताही दबाव नाही; मात्र अफगाणिस्तान-पाकिस्तान ही उभय राष्ट्रे अतिरेकीविरोधी व्हावीत, अशी पाश्चिमात्त्य राष्ट्रांची प्रामाणिक इच्छा दिसते एवढं नक्की ! पत्रकार : लष्कर-ए-तोयबाविषयी काय वाटते ? मुंबईवरील आक्रमणानंतर त्यांचे नटवर्क विस्कळीत झाले आहे, असे वाटते का ? दोव्हाल : अजिबात नाही. फक्‍त आंतरराष्ट्रीय दबावाचा विचार करून त्या संघटनेला सध्या नमतं घ्यायला लावलं गेलं आहे. त्यांच्या पायाभूत सुविधा, आर्थिक स्त्रोत, नवीन भरती, `मर्कझ-दावा-उल-ईशाद' च्या छताखाली जिहादी मनोवृत्ती घडवणार्‍या शाळा, शस्त्रास्त्र प्रशिक्षण आदी सर्व कारवाया चालूच आहेत. पत्रकार : सिमी, इंडियन मुजाहिदीन याविषयी काय वाटते ? या संघटना सध्या शांत असणे, निष्क्रिय भासणे याचा अर्थ त्या संपल्या, असा घ्यावा का ? दोव्हाल : अजिबात नाही. या दोन्ही संघटना सध्या कार्यरत आहेत. संघटना म्हणून कदाचित त्यांचा प्रभाव कमी होत असेलही; पण त्या संपलेल्या नाहीत. त्यांचे खाजगी वा व्यक्‍तीगत पातळीला असलेलं `नेटवर्क' तितकच मजबूत आहे. पत्रकार : सध्या हिंदु संघटनांकडूनही आतंकवाद पसरवला जात असल्याचे बोलले जाते. तुम्हाला काय वाटते ? दोव्हाल : हिंदु संघटना आणि हिंदुत्ववादी विचारधारा यांच्याकडून राष्ट्रविघातक हिंसा घडण्याची शक्यता मला वाटत नाहीच; किंबहुना कोणतीही हिंदु संघटना इतक्या मोठ्या प्रमाणावर हिंसा घडवू शकत नाहीत. तरीही अशा कोणत्याही प्रयत्‍नाला हाणून पाडलेच पाहिजे.

संघाच्या दबावामुळे मंगळुरू येथील मुद्रणालयातील कन्नड `साप्‍ताहिक सनातन प्रभात'चे मुद्रण बंद !

सनातन प्रभातसारख्या हिंदुत्ववादी नियतकालिकाची गळचेपी करणारा संघ हिंदुसंघटन काय करणार !

सनातन करत असलेल्या टीकेचा उद्देश समजून न घेता संघाची असहकार्याची भूमिका !

मंगळुरू, ४ जुलै - कन्नड `साप्‍ताहिक सनातन प्रभात'ची छपाई मंगळुरू येथील दिगंत मुद्रणालयात गेली ७ वर्षे सुरू होती. त्याचे मालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी आहेत. कन्नड `साप्‍ताहिक सनातन प्रभात'मध्ये संघावर टीका करणार्‍या बातम्या प्रसिद्ध होत असल्याने `साप्‍ताहिक सनातन प्रभात'चे मुद्रण बंद करण्यासाठी दिगंत मुद्रणालयाच्या मालकावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दबाव आणला. त्यानंतर दिगंत मुद्रणालयाच्या मालकाने `साप्‍ताहिक सनातन प्रभात'चे मुद्रण करण्यास नकार दिला.

(राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदुत्वाच्या तत्त्वांशी तडजोड न करता चुका सुधारून हिंदूंच्या रक्षणार्थ कार्य करावे, यासाठी सनातन संघावर टीका करते, याचा विचार न करता केवळ विरोधासाठी विरोध करणारा संघ ! गेली ७ वर्षे छपाई केल्यामुळे मुद्रणालयाच्या मालकांना `सनातन प्रभात'च्या कार्याची निश्चितच कल्पना आहे; पण संघाच्या दबावापुढे ते काही करू शकले नाहीत. अशाने हिंदूंना संघाचा आधार वाटत नसल्यास हिंदूंचा त्यात दोष काय ? यावर संघ कधी विचार करणार का ? - संपादक ) सध्या कन्नड `साप्‍ताहिक सनातन प्रभात'चे मुद्रण दुसर्‍या ठिकाणी करण्यात येते. संघाने दिगंत मुद्रणालयाच्या मालकावर प्रचंड दबाव आणला आहे. त्यामुळे संघावर टीका करणारे काही लिखाण नसलेली सनातन संस्थेची `गुरुपौर्णिमा विशेष स्मरणिके'चीही छपाई करून द्यायला मुद्रणालयाच्या मालकाने नकार दिला. या वेळी ते म्हणाले, ``सनातनची कुठल्याही प्रकारची छपाई यापुढे करणार नाही.'' (हिंदूंवर चारही बाजूंनी होणारा अन्याय दूर होण्यासाठी हिंदू सक्षम होणे, ही काळाची गरज आहे. यासाठी छोटे `सनातन प्रभात' सातत्याने हिंदूंना व हिंदुत्ववादी संघटनांना दिशा देण्याचे काम करत आहे. असे असतांना `सनातन प्रभात'ला असहकार्य करणारा संघ विशाल हिंदुसंघटनाचे ध्येय कसे पार पाडणार ? - संपादक)

सनातन करत असलेल्या टीकेचा उद्देश बहिर्मुखी संघवाले कधी लक्षात घेणार ?
`सनातन प्रभात' रा.स्व. संघ आणि भाजप यांच्यावर टीका करते, ती त्यांनी सुधारावे यासाठी अन् काँग्रेसवर टीका करते, ती काँग्रेसने केलेल्या हिंदुद्रोही आणि राष्ट्रविरोधी कुकृत्यांविषयी जनमानसात चीड निर्माण व्हावी यासाठी !

सनातनच्या संकेतस्थळावर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विशेषांक व वाचनीय मजकूर उपलब्ध !

मंगळवार, ७.७.२००९ रोजी गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सनातनच्या संकेतस्थळावर `साधना मार्गदर्शक' या नावाचा साधनाविषयक विशेषांक, `गुरुपौर्णिमा विशेषांक' व `प्रश्‍नमंजुषा' असा वाचनीय मजकूर ठेवण्यात आला आहे.

मार्गिका : http://dainik.sanatan.org/visheshank/sadhana_guide
याशिवाय संकेतस्थळावरील गुरुपौर्णिमा विशेषांक व विद्यार्थ्यांसाठी गुरुपौर्णिमा प्रश्‍नमंजुषा यांच्या मार्गिका खाली दिल्या आहेत.
* गुरुपौर्णिमा विशेषांक
http://dainik.sanatan.org/visheshank/gurupournima
* विद्यार्थ्यांसाठी गुरुपौर्णिमा प्रश्‍नमंजुषा
http://www.sanatan.org/marathivisheshank/gp_quiz

साधकांना सूचना व वाचकांना विनंती !
वरील माहितीची `मार्गिका' (`लिंक') आपण इ-मेलद्वारे नातेवाईक व मित्रमंडळी यांना पाठवू शकतो व या अध्यात्मप्रसारात सहभागी होऊ शकतो.

Saturday, July 4, 2009

धर्मांतराला विरोध करा ! - प.पू.आसारामजी बापू

`दैनिक सनातन प्रभात' आपुलकीने न्याहाळातांना प.पू. आसारामजी बापू आणि सनातन प्रभातचे प्रतिनिधी

आळंदी (जिल्हा पुणे), ४ जुलै (वार्ता.) - आज भारतात धर्मांतर जोरात सुरू आहे. आपण त्याला विरोध केला पाहिजे. भारतात आज विदेशी कंपन्या आल्या आहेत व त्या पुन्हा एकदा भारत तोडण्याचे काम करत आहेत, त्याच्यापासूनही आपण सावध राहिले पाहिजे, असे आवाहन प.पू. आसारामजी बापू यांनी येथे केले. आळंदी जवळील केळगाव येथे योग वेदांत समितीतर्फे ३० जून, १ आणि २ जुलै या दिवशी बापूजींचा दर्शन व सत्संगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संपूर्ण दिवस चालू असणार्‍या या सोहळयाचा तीन दिवसांत लक्षावधी भक्‍तांनी लाभ घेतला.

स्वस्थ, सुखी आणि संयमीत जीवन केवळ भारतीय संस्कृतीच देऊ शकते !
``स्वस्थ, सुखी व संयमीत जीवन केवळ भारतीय संस्कृती देऊ शकते'', असा गुरुपौर्णिमेचा संदेश प.पू. आसारामजी बापू यांनी भक्‍तांना मार्गदर्शन करतांना दिला. ते पुढे म्हणाले, ``गुरूंच्या सत्संगाचे महत्त्व अनन्य साधारण आहे. हिंदु धर्माची महानता आत्म्याची जागृती करण्यातच आहे. गुरूंची सेवा म्हणजे त्यांची शारीरिक सेवा नसून, त्यांचे कार्य व संदेश समाजात पोहोचवणे ही आहे.''

सनातनला माझा सदैव पाठिंबा आणि आशीर्वाद !
याप्रसंगी पुणे येथील `दैनिक सनातन प्रभात'चे प्रतिनिधी सर्वश्री धीरज बेंगरुट, उमेश निकम आणि पराग गोखले यांनी बापूजींची भेट घेऊन त्यांना `दैनिक सनातन प्रभात'ची वैशिष्ट्ये सांगितली. तसेच पुणे जिल्ह्यातील हिंदूंची स्थिती, देवता आणि धर्म यांचे होणारे विडंबन, संतांची बदनामी, धर्मांतर अशा विविध विषयांची माहिती दिली. त्यावर बापूजींनी सांगितले, ``तुमचे कार्य खूप चांगले आहे. आमचा त्यास संपूर्ण पाठिंबा व आशीर्वाद आहे. आपल्याला सर्वांना मिळून हे कार्य करायचे आहे. धर्मद्रोह्यांच्या विरुद्ध आपण सदैव सज्ज राहून त्यांना धडा शिकवला पाहिजे.''

Thursday, July 2, 2009

संतांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणार्‍यांवर कारवाई करू !

वारकरीबंधूंनो, मुख्यमंत्र्यांच्या या आश्‍वासनावर विश्‍वास ठेवू नका आणि धर्मद्रोही साहित्यावर प्रत्यक्ष बंदी येईपर्यंत पाठपुरावा करा !

वारकर्‍यांच्या संघटित शक्‍तीपुढे शासन नमले !
मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन

पंढरपूर, १ जुलै (वार्ता.) - संतांना जातीच्या राजकारणात अडकवणारे धर्मद्रोही साहित्य आणि वक्‍तव्ये यांवर बंदी घालण्याची मागणी वारकर्‍यांनी केली होती. ही मागणी मान्य न झाल्यास पालख्या वाखरीतच थांबवण्याचा इशारा वारकर्‍यांनी दिला होता. वारकर्‍यांच्या या निर्धारासमोर मुख्यमंत्री अखेर आज नमले.

वारकर्‍यांच्या मागण्यांविषयी योग्य ती शहानिशा करून संबंधितांवर कारवाई करण्याचा आदेश त्यांनी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक अन् सचिव यांना दिला. याविषयीचे पत्र आज देवाच्या आळंदीचे दिंडीमालक ह.भ.प. बाळासाहेब महाराज आरफळकर, वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. रामेश्‍वर महाराज शास्त्री यांच्यासह समस्त वारकरी व फडकरी यांना प्राप्‍त झाले. आक्षेपार्ह साहित्य दहा दिवसांत शासनाकडे जमा करावे, असे माहिती संचालनालयाने वारकर्‍यांना सांगितले. शासनाकडे केलेल्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात वारकर्‍यांनी एका स्वतंत्र समितीची स्थापना करण्याचे निश्चित केले आहे. त्याचप्रमाणे देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांचे विविध मार्गांनी होणारे विडंबन रोखण्यासाठी शासनाने कायदा करावा, याकरता आणखी एक कायदेविषयक समिती स्थापन करण्याचे विचाराधीन आहे. या समितीच्या माध्यमातून विडंबनविरोधी कायदा करण्यासंदर्भात आवश्यक ती कागदपत्रे व साहित्य जमा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विनंतीनुसार ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी वाखरीमध्ये न थांबता नेहमीप्रमाणे पंढरपूरच्या दिशेने प्रयाण करील, असे ज्ञानेश्‍वर महाराज पालखीच्या समाजारतीनंतर जाहीर करण्यात आले.


वारकर्‍यांच्या मागण्या
१. मा.म. देशमुख, श्रीमंत कोकाटे, पुरुषोत्तम खेडेकर यांच्या धर्मद्रोही साहित्यावर बंदी घालावी.
२. धर्मद्रोही लेखक करत असलेले धर्मद्रोही लिखाण अयोग्य आहे, असे न वाटणार्‍या पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या विश्‍वस्तांना काढून टाकावे.
३. वारकरी संप्रदाय, देवता, संत, संतसाहित्य व धार्मिक विधी यांचे विडंबन आणि विटंबना करणार्‍यांविरुद्ध कारवाई होण्यासाठी कायदा करावा.

Monday, June 29, 2009

विकृतीचा अंत !

कोणी कितीही महान असला, तरी सामाजिक बांधिलकीशी त्याने जाणूनबुजून केलेला द्रोह दुर्लक्षित करून चालत नाही. नुकताच मरण पावलेला पाश्चात्त्य जगतातील विकृत पॉप गायक मायकेल जॅक्सन याच्या बाबतीही हा नियम तंतोतंत लागू पडतो. पूर्वी केवळ वेशभूषा आणि केशभूषा यांवरून विकृत वाटणार्‍या जॅक्सनची खरी मनोविकृती जगासमोर आली ती त्याने लहान मुलांशी केलेल्या गैरवर्तनांच्या प्रकारामुळे ! उंच इमारतीच्या सज्जात स्वत:च्या मुलाला उलटे धरून झोके देणे, दोन वर्षांत दोन विवाह करणे, असे चाळे करून त्याने सामाजिक बांधिलकीला सुरुंग लावला !

कर्णकर्कश पाश्चात्त्य संगीताच्या तालावर जॅक्सनचे किंचाळणे (म्हणजेच गाणे म्हणणे), तेही इंग्रजीतून, हे खरोखरंच किती जणांना कितपत कळणारे आहे, हाही एक प्रश्‍नच आहे! जॅक्सनच्या चाहत्या भारतियांना भारताच्या शास्त्रीय संगीताची कितपत ओळख आहे, हे पहाणे म्हणजे एक संशोधन असेल ! `गाढवाला गुळाची चव काय' म्हणतात ना...! एकीकडे भारतीय शास्त्रीय संगीताचा अभ्यास आज जगभर होत असतांना दुसरीकडे सतत झिंगणार्‍या माणसाचे संगीत भारतातीलच लोकांचे आवडते बनणे, हे दुर्दैवी आहे. अर्थात `जेथे पिकते तेथे विकले जात नाही', ही म्हण भारतात सर्वच क्षेत्रांत लागू पडते. असो ! जॅक्सनसारख्या विकृत माणसांना हल्लीच्या भाषेतील `आयडॉल' बनवणे समाजाला घातक कि उपयुक्‍त, त्याचे लहान मुले, महाविद्यालयीन तरुण वर्ग यांच्यावर कोणते परिणाम होतील, आधीच भरकटलेले तरुण चंगळवादाकडे वळतील कि सामाजिक बांधिलकीकडे, आदी अनेक प्रश्‍नांची उत्तरे भारतात त्याचा उदोउदो करणार्‍यांनी द्यावयास हवीत. अन्यथा उद्या चुकीचे वागणार्‍यांविषयी `त्यांचे अवगुण कशाला बघता ?', असा प्रश्‍न विचारला जाऊन अशी माणसे (उदा: क्रूर असा अँडॉल्फ हिटलर हा `हुशार' म्हणून, जगातील सर्वांत मोठे आक्रमण करूनही कोणाच्याच हाती न लागलेला ओसामा बिन लादेन `बुद्धीवान' म्हणून, तर उभी हयात भारताविरुद्ध जिहादी युद्धाची मनीषा बाळगणारे परवेझ मुशर्रफ हे `जिगरबाज' म्हणून) उद्याचे `आयडॉल' बनतील, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. असो. तूर्त तरी जॅक्सनचा मृत्यू म्हणजे एका विकृतीचा अंत, असे म्हटल्यास गैर नाही.

मनमानी मायाराज !

विकासकामांकडे दुर्लक्ष करून नेत्यांचे पुतळे उभारण्यात कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करणार्‍या जनताद्रोही मायावती !

स्वत:च्या हयातीत स्वत:च स्वत:चे मोठमोठाले पुतळे बनवणार्‍या इराकच्या सद्दाम यांच्यासारख्या नेत्यांच्या सूचीतील भारतीय नाव म्हणजे उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती ! यांनी स्वत:चे अन् त्यांचे नेता कांशीराम यांचे ४० मोठाले पुतळे निर्माण करण्यासाठी उत्तरप्रदेश शासनाच्या कोषातील १९४ कोटी रुपयांचा चुराडा केला ! त्यांच्या पक्षाचे चिन्ह असलेल्या हत्तीच्या ६० संगमरवरी प्रतिमा आंबेडकर स्मारकापाशी उभारण्यासाठी ५२ कोटी रुपये पक्षनिधीतून नव्हे, तर जननिधीतून खर्च करण्यात आले! त्यांचे नेता कांशीराम यांचे स्मारक उभारण्यासाठी ३७० कोटी रुपये उधळण्यात आले. हा सगळा खर्च `महान नेत्यां'च्या पुतळयांच्या निर्मितीसाठी', अशी तरतूद उत्तरप्रदेशच्या २००९-१०च्या अर्थसंकल्पात करून करण्यात आला ! या एकूण ६१६ कोटी रुपये रकमेचा विचार केला, तर त्यातून ५ लाख रुपयांची १२ सहस्र ३२० घरे उभारता आली असती ! निरक्षरतेत व अनारोग्यात पुढे असलेल्या उत्तरप्रदेशात शाळा व रुग्णालये उभारता आली असती. त्यातून चौफेर विकास करता आला असता; पण मायावतींच्या दृष्टीने ही स्मारके म्हणजे सामाजिक सबलीकरणाची प्रतिके आणि लाखोंचे प्रेरणास्रोत
आहेत ! केवढा हा स्वत:चा उदोउदो ! ही स्मारके उभारणे म्हणजे अनेकांना रोजगार निर्माण करणे, असे मायावतींना वाटते ! माकडाच्या हातात कोलीत दिल्यावर काय काय घडू शकते, याचे हे उत्तम उदाहरण ! विरोधकांनी याविषयी आवाज उठवल्यावर मायावती म्हणतात, हा निधी उत्तरप्रदेशच्या विधानसभेने अर्थात जनतेने मंजूर केला आहे. आता ही उत्तरप्रदेशची विधानसभा म्हणजे दोन तृतीयांश बसपवाले ! मायावती सांगतील, तेच यांचे मत ! `मोहनदास गांधींचे राजधानीतील स्मारक अर्थात राजघाटासाठी जेवढा पैसा काँग्रेसवाल्यांनी उधळला, त्यापेक्षा हा कमीच आहे', असेही मायावतींचे उद्‌गार ! म्हणजे तुम्ही पैसा उधळा, आम्हीही उधळतो, ही मायावतींची मानसिकता ! उंदरांच्या होणार्‍या सुळसुळाटामुळे उत्तरप्रदेश हे उंदरांचे राज्य म्हणून समजले जाते. मायावती नावाचं मांजर या राज्याचे प्रमुख ! मग या मांजराच्या गळयात घंटा बांधणार कोण ?

Sunday, June 28, 2009

निधर्मी समाजवादी संस्कृतीने स्त्रीवर्गाचे भयंकर अवमूल्यन करणे

``मातृसमान स्त्रीवर या स्वतंत्र भारतात बलात्कार व्हावा ? आई-वडील, बहीण, भाऊ, आजी अशी सगळी नाती आम्ही अबाधित ठेवली होती. आज तुमच्या या निधर्मी समाजवादी संस्कृतीने स्त्रीवर्गाचे किती भयंकर अवमूल्यन केले ? लक्षावधी वर्षांपासून आम्ही जपलेली संस्कृती, भक्‍ती, प्रेम, ते मातृवात्सल्य यांना तुम्ही तिलांजली दिलीत. हर हर !'' - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्‍ताहिक सनातन चिंतन, १३.११.२००८)

`पब भरो' म्हणणार्‍या काँग्रेसच्या महिला (अ)कल्याण अध्यक्षा रेणुका चौधरी !

`काँग्रेसच्या महिला कल्याण अध्यक्षा रेणुका चौधरी म्हणतात, ``पब भरो !'' त्यांचा उदोउदो केला जातो; कारण त्या सोनिया गांधी यांच्या शेजारी बसतात. कर्नाटकातील काँग्रेसच्या सौ. निर्मला व्यंकटेश यांनी एका अहवालात केंद्र शासनाला कळवले, `पब बंद करा.' तेव्हा त्यांना निलंबित करण्यात आले. रेणुका चौधरी यांच्यासारख्या महिला कल्याण अध्यक्षा असतील, तर हिंदु महिलांचे अकल्याण होईल !' - श्री. प्रमोद मुतालिक

एका हातात मद्याचा पेला आणि एका हातात मित्राचा हात हातात घेऊन या पबमधून बाहेर पडलेल्या मुलीला बाहेर पडलेल्या रेणुका चौधरी त्यांची सून करून घ्यायला तयार होतील का ?

स्त्री धर्म व पु.भा. भावे

दहा उपाध्यायांच्या तुलनेत एक आचार्य श्रेष्ठ. शंभर आचार्यांपेक्षा पिता श्रेष्ठ व सहस्र पित्यांच्या तुलनेत एक माता श्रेष्ठ आहे.

स्त्री जातीकडे जननी स्वरूपात पहा, असे भावे पोटतिडिकीने सांगतात. स्त्री ही सर्व अर्थाने सृजनशील आहे; म्हणून नवी सृष्टी निर्माण क्षमतेचा दावा जे करतात, त्या साहित्यिकांनी स्त्रीची महती गायली पाहिजे, असे उपदेशिणारे निबंधच्या निबंध भावे यांनी लिहिले आहेत. स्त्री निर्मिती करते, संरक्षण करते आणि संवर्धनही करते. एवढेच म्हणून भावे थांबत नाहीत, तर विविध प्रकारे स्त्रीची थोरवी ते समजावून सांगतात. अशा प्रकारे स्त्रीची महती सांगणार्‍या या थोर साहित्यिकाचे `स्त्री धर्म'विषयीचे विचार येथे देत आहोत.
स्त्री धर्माचा गांभिर्याने विचार
स्त्री धर्माचा विचार साहित्यिकांमध्ये पुरुषोत्तम भास्कर भावे यांनी गांभिर्याने, तळमळीने आणि सामर्थ्याने केला तसा आणखी काही मोठ्या लेखकांनी केला असता, तर तस्लीमा नसरीन यांना आश्रय मागायला आल्या असतांना भारतातून हाकलून देण्याचे माजोरीपण सरकारला दाखविता आले नसते. भावे यांच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष आहे. ते साजरे करण्यात स्त्रियांनी विषेशत्वाने पुढाकार घ्यायला हवा. भाव्यांनी तेवढे त्यांच्यासाठी निश्चितपणे केले आहे. मोहनदास गांधींनी देशाचे दोन तुकडे होतांना सोयिस्करपणे डोळे मिटून घेतले, तेव्हा अवघे आकाश हिंदु स्त्रियांच्या आक्रंदनाने ओले झाले होते. ते आर्त स्वर ज्या अगदी मोजक्या लोकांना ऐकू आले, त्यात भावे होते. सावरकरांना त्या किंकाळया ऐकू आल्या. मुंज्यांना ऐकू आल्या. हेडगेवारांना त्या किंकाळया ऐकून मरणप्राय यातना झाल्या. भावे तरुण होते. अशा वेळी शिवाजीचा मावळा जसा वागला असता, तसे भावे यांचे आचरण झाले. ते तडक नौखालीत पोहोचले. तेथे त्यांनी अपमानीत हिंदु भगिनींची प्रत्यक्ष भेट घेतली. विचारपूस केली. द्रौपदीच्या मोकळया केसांची जशी कृष्णाला कधीही विस्मृती झाली नाही, तसे जिहादी प्रवृत्तीने हिंदु स्त्रियांशी जे बीभत्स वर्तन केले, ते महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. असे वचन या पुरुषोत्तमाने त्यांना दिले. हे अत्याचार अनुत्तरीत राहू देणे म्हणजे त्या पापात वाटेकरी होणे होय, हे भावे मानीत होते. म्हणून एकेका हिंदु स्त्रीने बंगालमध्ये काय भोगले आहे, ते महाराष्ट्राला कळवण्याचे काम या सहृदय सारस्वताने केले. ``रक्‍त आणि अश्रू'' हा निबंधसंग्रह आणि ``नौका'' हा कथासंग्रह साक्ष आहेत.
तिसर्‍या पिढीचा सर्वश्रेष्ठ कादंबरीकार अशा शब्दात भावे यांचा गौरव ना.सी. फडके यांनी केला आहे. आधुनिक मराठी नवकथेच्या चार शिल्पकारांपैकी एक भावे आहेत. ते भाषाप्रभु आहेत. भावे यांच्या लेखणीतून आपण अवतीर्ण व्हावे, असे शब्दांना वाटत असावे, इतकी त्यांची झुंबड भावे यांनी लेखणीला हात लावला की होते. अशा या लेखकाच्या स्त्री विषयक मतांनी मराठी साहित्यात एक तेजस्वी परंपरा निर्माण केली आहे.

स्त्रीला शक्‍ती देणारे भावे यांचे लिखाण
भावे यांचे व्यक्‍तिमत्त्व एकसंध आहे. ते विघटन सहन करू शकत नाही. म्हणून स्त्रीच्या मानमर्यादांना ते अतिशय हळूवारपणे आणि साक्षेपाने जपतात. भारताला जे स्वातंत्र्य मिळाले ते शुचिर्भूत नाही, हे सांगण्याचे धाडस भावे करतात. ते आपले पवित्र आणि प्रथम कर्तव्य आहे, असे भावे यांना वाटते. शत्रूच्या रक्‍ताचे सिंचन करून स्वातंत्र्य मिळवण्याची जगरहाटी आहे. या विषयावर सावरकर आणि गांधी अशा दोन गटांत भारताचे राजकारण स्पष्टपणे विभागले गेले आहे. `शत्रूचे रक्‍त सांडणार नाही', अशी शपथ गांधींनी हिंदूंना घ्यावयास लावल्यामुळे त्यांच्या स्वातंत्र्याच्या सोहळयाला त्यांच्या स्त्रियांच्या करूण आणि केविलवाण्या किंकाळयांचे पार्श्‍वसंगीत लाभले. स्त्री भयमुक्‍त आणि मानार्ह होत नाही, तोपर्यंत भारतीय स्वातंत्र्याला निर्भेळ स्वरूप प्राप्‍त होत नाही, असे भावे मानीत होते. स्त्रीला शक्‍ती देणे या विचाराचे अस्तर भावे यांच्या सर्व ललित आणि वैचारिक लेखनाला आहे, असे वाटते ते त्यामुळेच.

लेखकाने मोठ्या चारित्र्याची माणसे निर्माण करावीत !
भारतावरील हिंदूंचे प्रभुत्व कमी किंवा नाहीसे झाले तरी चालेल; परंतु इस्लामला अप्रतिहत प्रतिष्ठा मिळवून देण्याचा विडा गांधी या व्यक्‍तीने आणि काँग्रेस या पक्षाने उचलल्यामुळे स्वतंत्र भारतातही मंदिर आणि महिला या दोन मानबिंदूंवर सतत तीक्ष्ण आघात होणार, हे ओळखून भावे यांनी मोठ्या युद्धाची व्यूहरचना करावी तसे आपले लिखाण निर्माण केले आहे. माणसाला देवत्वाची भूक असते, ती त्याची सार्वभौम आणि मूलभूत भूक असते. ती जर जागविली, तर माणूस क्षुद्र वर्तन करणार नाही, अशी ग्वाही भावे देतात. लेखकाने विकृत वासना चाळवू नयेत, तर मोठ्या चारित्र्याची माणसे उभी करावीत, असा आग्रह भावे धरतात. समाजात गटारे असतात आणि त्यावर लिहिण्याचे स्वातंत्र्य लेखकाला आहे; पण गटारी साहित्याचा पंथ बनणार याची काळजी त्याने घेतली पाहिजे. त्यासाठी समाजात गंगा आहे, ती पवित्र आहे. जीवनदायिनी आहे, हे सांगत रहाणे हे लेखकाचे काम आहे, असे भावे टाहो फोडून सांगतात. तेव्हा फुटलेले धरण सांधण्यासाठी धौम्य साधूंचा शिष्य आरूणी आडवा पडला आहे, असा भास होतो.

स्त्री जातीकडे जननी स्वरूपात पहा !
स्त्री जातीकडे जननी स्वरूपात पहा, असे भावे पोटतिडिकीने सांगतात. स्त्री ही सर्व अर्थाने सृजनशील आहे; म्हणून नवी सृष्टी निर्माण क्षमतेचा दावा जे करतात, त्या साहित्यिकांनी स्त्रीची महती गायली पाहिजे, असे उपदेशिणारे निबंधच्या निबंध भावे यांनी लिहिले आहेत. स्त्री निर्मिती करते, संरक्षण करते आणि संवर्धनही करते. एवढेच म्हणून भावे थांबत नाहीत, तर विविध प्रकारे स्त्रीची थोरवी ते समजावून सांगतात. स्त्री पुरुषाकडे केवळ पती म्हणून पहात नाही, तर मुलगा म्हणूनही पहाते, स्त्रीला केवळ पलंगप्रेम नको असते, तर तिला पाळण्यातले प्रेमही हवे असते, हे पुरुषांनी विशेषत: लेखकांनी विसरू नये, असे भावे आवर्जून लक्षात आणून देतात. जगात ठोकरा खाऊन आपण घरी परततो, तेव्हा आपली अत्यंत आतुरतेने वाट पहाणारे आपल्या आईचे, पत्‍नीचे डोळे उपस्थित असतात, हे आपले केवढे परमभाग्य आहे, हे भावे ध्यानात आणून देतात आणि त्याप्रती कृतज्ञ रहा, असे बजावतात.

स्त्रीचा मानभंग तिच्या जिव्हारी लागणे
`सहदेवा, थोडा अग्नि आण...' हा भावे यांनी ऐन पंचविशीत लिहिलेला आणि `रक्‍त आणि अश्रू'मध्ये समाविष्ट झालेला अजरामर लेख वाचला की, स्त्रीचा मानभंग त्यांच्या किती जिव्हारी लागतो, हे कळते. धर्मराजाच्या बुद्धीमांद्यामुळे आणि व्यसनाधीनतेमुळे द्रौपदी पणाला लागली, असे भावे सांगतात तेव्हा त्याच्या पलीकडे जाऊन भावे यांना बरेच काही सांगायचे असते. इस्लामला भारतीय भावविश्‍वात हिंदु धर्माइतकीच प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, हा गांधींचा आग्रह म्हणजे न सुटणारे व्यसन आहे आणि त्यांचा इतिहासाचा अनभ्यास म्हणजे त्यांचे बुद्धीमांद्य आहे आणि त्यामुळे हिंदु स्त्रीचे कुलीनत्व टिकून रहाणे कठीण आहे, असे भविष्य भावे करतात. `बंगाल, एक करपून गेलेले कुसुम' या त्याच संग्रहातील १९३६ मध्ये लिहिलेल्या लेखात बलात्कारित हिंदु स्त्रियांच्या नेभळट, नपुंसक प्रतिक्रियांचा धिक्कार करून परिणामी पुढील दहा वर्षांत हिंदूंना मोजता येणार नाहीत इतके बलात्कार करण्याचा उन्माद जिहादी लोकांना चढेल, हे नमूद करून ठेवतात.

भावे म्हणतात `स्त्री कधी हीन नसते !'
राम गणेश गडकरी यांच्या सिंधु, लतिका, शिवांगी अशा सर्व नायिका भावे यांना अतिशय आवडतात. सिंधूची पतिपरायणता ही अंधश्रद्धा आहे, या टीकाकारांच्या मतांचा भावे खरपूस समाचार घेतात. गडकरी यांनी हीन पुरुष रंगवले; पण हीन स्त्री रंगविली नाही; कारण स्त्री हीन नसते, असे भावे सांगतात. त्या दृष्टीने या भावे जन्मशताब्दी वर्षात त्यांचे समग्र साहित्य सावकाशीने वाचले पाहिजे.

आधुनिकता आणि धर्माचरण यांचा योग्य समन्वय साधा !

आधुनिक जीवनपद्धतीमुळे धर्माने सांगितलेल्या गोष्टी बंधने वाटू शकतात. इथे धर्माचरणामुळे मिळणारे अनन्यसाधारण लाभ लक्षात घ्या ! धर्माचरणाच्या कृती केल्याशिवाय त्याचे लाभ अनुभवता येणार नाहीत.

बरेचदा परिस्थितीमुळे धर्माचरण करणे अशक्यच असल्याची काही उदाहरणे दिली जातात; परंतु धर्माचरण करणे शक्य असूनही आपण करत नाही, कारण धर्माचरणाचे महत्त्व आपण जाणलेले नाही ! धर्माचे महत्त्व एकदा जाणले की आधुनिकतेच्या नावाखाली धर्मातील गोष्टी `बंधने' नसून त्या अधिक सोयीच्या व अत्यावश्यक कशा आहेत, हे लक्षात येईल.

पुरुषाच्या आधाराशिवाय रहाणे अशक्य असल्याचे सांगणारी तथाकथित पुरोगामी महिला !

सावधान ! सावधान !

`मुंबईची एक सिनेमा नटी, नीना गुप्‍ता हिने रिचर्ड्स नावाच्या एका क्रिकेटपटूकडून अपत्य प्राप्‍त करून घेतले आणि उजळ माथ्याने ती जगासमोर वावरू लागली. तिचा उदो उदो झाला. वर्ष-सहा महिन्यांतच तिने आपली चूक जाहीर केली. पत्रकार परिषदेत तिने सांगितले, ``मी भयंकर चूक केली. स्त्रीला जसे मूल हवे, तसाच पुरुषाचाही आधार अपरिहार्य आहे. स्त्रीवर्गाने यापुढे माझ्यासारखा प्रमाद करू नये.''
स्त्रीमुक्‍ती आंदोलनवाल्यांची या विधानावर दातखिळी बसली, ती अजून उघडली नाही.'
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्‍ताहिक सनातन चिंतन, वर्ष १ ले, अंक २१, पृष्ठ २)

`स्त्री मुक्‍ती'

स्त्रीधारेला पुरुषधारेत विलीन करून तिला मुक्‍तीची अधिकारिणी बनवणे, हा विवाहसंस्थेचा एक उद्देश आहे !


आधुनिक स्त्रीवादी
`जहाल व सौम्य स्त्रीवाद आणि स्त्रीमुक्‍ती', हे सर्व अर्थशून्य शब्दांचे बुडबुडे आहेत. ही सगळी साम्यवादी भाषा आहे. हा स्त्रीवादी प्रकार, म्हणजे स्त्री-जीवन उद्ध्वस्त करणारे सगळे राजकारणच आहे. इथे कुठेही स्त्रीचा गौरव किंवा सन्मान होत नाही. साम्यवादी व सामाजिक बांधिलकी असणार्‍यांनी आपली संघटना आणि चळवळ यांना सोयीचे करून इतिहास व साहित्य यांचे बीभत्स विकृतीकरण केले आहे. या विकृतीकरणालाच `इतिहासाचे पुनर्वाचन' असे मोठे गोड नाव दिले आहे.

कुटुंब-व्यवस्था तोडण्याचे ध्येय बाळगणारी सध्याच्या काळातील चळवळ !
`स्त्री ही कुटुंब-व्यवस्थेचा कणा आहे. वेदकालात प्रथम पूजेचा मान `सरस्वती (नदी), भारती (भरतकुलाची अधिष्ठात्री देवता) व इला (पहिला सम्राट मनू याची कन्या)' या तिघींना होता. तो गणनायक गणपतीला नव्हता. सध्याच्या काळात जी `स्त्री-मुक्‍तीची' चळवळ होत आहे, तिचे ध्येय कुटुंब-व्यवस्था तोडण्याचे आहे, जोडण्याचे नाही. `तिच्यावर होणारे अत्याचार थांबले पाहिजेत, ती शक्‍ती आहे, याची जाणीव तिला करून दिली पाहिजे', हे खरे; पण स्त्री-मुक्‍तीच्या नावाखाली कुटुंब-व्यवस्था मोडणे, ही चळवळ होता कामा नये. कुटुंब-संस्था मोडली की, गृहसौख्य संपले.' - श्री. श्रीपाद दत्तात्रय कुलकर्णी (हिंदू कोणास म्हणावे ?)

स्त्रीमुक्‍तीवाल्यांनो, हे लक्षात घ्या !
`आमची समस्या स्त्रीमुक्‍ती वा स्त्रीस्वातंत्र्य वा स्त्रियांचे पुरुषीकरणही नाही. हे जग द्वंद्वात्मक आहे. पारतंत्र्याच्या उदरात स्वातंत्र्य आहे, तर स्वातंत्र्याच्या पोटात पारतंत्र्य आहे. स्त्रीस्वातंत्र्य, समान हक्क वगैरेत स्वभावसिद्ध स्त्रीचे पारतंत्र्य आम्हाला दिसू नये का ? तेव्हा आधुनिक काळाला योग्य अशी जुने काही न सोडता, `स्त्री जीवनाची उभारणी कशी करायची', हा विचार आम्ही केला पाहिजे. कशाला त्या पाश्चात्त्यांची उसनवारी करता ? कशाला त्यांची थुंकी झेलता ? आमच्या थोर पूर्वजांनी जे स्त्रीजीवनाचे वळण, जे महत्त्व प्रतिपादिले आहे, जो आचारधर्म दिला आहे, त्याचे संशोधन करा. त्या भांडवलाचा उपयोग करा ! आमच्या उज्ज्वल स्त्रीजीवनाने सगळे जग मुग्ध होईल, असे काहीतरी करा ! जरा विचार तर करा !'

पुरुषप्रधान हिंदु व्यवस्थेवर आक्रमण करणार्‍या स्त्रियांचे समाजद्रोही भाष्य
`स्त्री ही पुरुषाची दासी आहे', असे सांगून पुरुर्षैंाधान हिंदु व्यवस्थेवर आक्रमण करतांना त्या मूर्ख, बेअकली स्त्रिया सांगतात, `विवाहसंस्थाच कालबाह्य झाली आहे. स्त्रीला आपले व्यक्‍तीमत्व फुलवण्याकरिता विवाहाची गरज नाही. ती स्वतंत्र आणि एकटी राहू शकते. मातृत्व हाच तिचा जन्मसिद्ध हक्क असल्याने तिने तो बजावण्यापुरताच पुरुषाचा आधार घ्यावा.' विश्‍वाला जाळून टाकणार्‍या कालकुटेपेक्षा भयंकर असे विषारी फुत्कार त्या टाकत आहेत. स्त्रीमुक्‍ती, प्रगती, सुधारणा व पुरोगामित्व या आवरणाखाली अशी समाजद्रोही भाष्ये त्या करत आहेत, इतकेच नव्हे, तर काही मस्तवाल व उन्मादी स्त्रियांनी तसा प्रयोगही केला आहे' - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

स्त्रीने स्वत:च्या ऐहिक सुखासाठी तथाकथित मुक्‍तीचा विचार करणे, म्हणजे अविचारच असणे
`आपल्या राष्ट्राच्या अवनतीच्या दोन मुख्य कारणांमध्ये एक कारण `आपली भारतीय स्त्री आपले मातृत्व विसरली', हे आहे. आपल्या महाभारत, पुराणादी इतिहासाच्या ग्रंथांवरून आणि त्या मार्गाचा आदर्श ठेवून वागणार्‍या कलीयुगातील स्त्रियासुद्धा परमपदाला प्राप्‍त झालेल्या दिसतात. आपल्या इतिहासात चुडाला, महालसा यांसारख्या महापतिव्रतांची फार मोठी उदाहरणे देता येतील. त्यांनी आपला उद्धार करून घेऊन आपली पातिव्रत्याची भूमिका किंचितसुद्धा न सोडता आपल्या पतींचा उद्धार केला आहे. तेव्हा आपल्या संस्कृतीने स्त्रीला केव्हाच बद्ध केलेले नाही, फक्‍त मोठमोठे संत आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राष्ट्रपुरुष यांची ती जन्मदात्री असल्यामुळे तिची मानसिक उन्नती होणे अपरिहार्य ठरते आणि ती होण्याला धर्माचरण कारणीभूत होत असते. त्यामुळे तिला जास्तीतजास्त विधीनिषेधांनी जखडून ठेवले आहे. ही बंधने तिच्या मुक्‍तीसाठी आहेत. असे असतांना `ती बद्ध नसून नित्य शुद्ध, बुद्ध असा आत्माच आहे', अशी तिला अनुभूती यावी, हे कारण असतांना विनाकारण आणखी ऐहिक सुखाची आशा दृष्टीपुढे ठेवून तिच्या तथाकथित मुक्‍तीसाठी प्रयत्‍न करणे, हा अविचारच होय.' - प.पू. काणे महाराज, नारायणगाव



`स्त्री मुक्‍ती' म्हणजे काय ?


१९७४ साली टोरान्टो येथे आंतरराष्ट्रीय समाज-विज्ञान परिषदेत `स्त्री मुक्‍ती'ची कल्पना जन्माला आली. पूर्वी इंग्लडमध्ये स्त्रियांनी मतदानाच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याचा त्यावर प्रभाव होता. कालांतराने हे पाश्चात्त्य विचारांचे लोण भारतात आले.
स्त्री व पुरुष समान आहेत, त्यामुळे त्यांच्या कामांचे वर्गीकरण लिंगभेदाने होता कामा नये. साहित्य, कला, उद्योग, राजकारण इत्यादी क्षेत्रांत आतापर्यंत पुरुषवादी भूमिकेतून विचार करण्यात आला, तो विचार स्त्रीवादी भूमिकेतून होणे गरजेचे आहे, अशा प्रकारची भूमिका स्त्री मुक्‍ती चळवळीतून पुढे आली. भारतात इंग्रजी शिक्षण सुरू झाल्यानंतर स्त्रियाही शिकू लागल्या. हिंदु धर्मातील धर्माचरण ही `अन्यायकारक बंधने' आहेत, असे वाटणे सुरू झाले. आगरकर, कर्वे आदी सुधारकांनी स्त्रियांना पुढे शिकण्याला प्रोत्साहन दिले. त्यानंतर विभक्‍त कुटुंबपद्धती, स्त्रियांचे अर्थार्जन व पुढे स्त्री-पुरुष समानता या अंगाने हा विषय येत गेला. ताराबाई शिंदे यांचा `स्त्री-पुरुष तुलना' हा लेख इत्यादी साहित्यातून भारतातील स्त्रीवादी लिखाणाला सुरुवात झाली.

आधुनिक भारतीय स्त्रीवादी दृष्टीकोन
पाश्चात्त्य शिक्षणाच्या व साहित्याच्या प्रभावामुळे हिंदु धर्म प्रतिगामी, जुनाट विचारांचा, संकुचित आहे, हिंदु धर्मात स्त्रियांवर बंधने घातली आहेत, तिला दासी व भोग्य वस्तू बनवले आहे, स्त्रीला कोणतेही स्वातंत्र्य दिलेले नाही, अशा प्रकारचे (गैर)समज पसरवण्यात येऊन भारतात स्त्री मुक्‍तीची चळवळ पसरली. त्यात प्रामुख्याने साम्यवादी व समाजवादी साहित्यिक, तथाकथित सामाजिक कार्यकर्ते व बुद्धीवादी प्राध्यापक यांचा मोठा हात होता. प्रत्यक्षात हिंदु धर्माचा कोणताही अभ्यास न करता, कोणत्याही प्रकारचे धर्माचरण किंवा साधना न करता धर्मात सांगितलेल्या गोष्टी चुकीच्या आहेत, असे वारंवार सांगणे व त्यावर टीका करून त्याचे आचरण न करणे म्हणजे स्वातंत्र्य उपभोगणे, बंधनांच्या पलीकडे जाणे अशा संकल्पना स्त्रीवादी साहित्यातून आणि विचारातून रुजवण्यात आल्या.

मुक्‍तीऐवजी अध:पतन !
क्षुल्लक कारणावरून घटस्फोट घेणे, लग्न न करता परपुरुषाबरोबर रहाणे, देहप्रदर्शन करणारे कपडे घालणे इ. गोष्टी करणे म्हणजे खरोखरच स्वतंत्र व सुखी होणे आहे का ? घरात व घराबाहेर स्त्रियांवर होणारे अन्याय, अपमान, तिला सहन करावे लागणारे दु:ख व तिला होणारे कौटुंबिक व सामाजिक त्रास, घटस्फोट, स्त्री भू्रण हत्या, हुंडाबळी यांसारख्या अनेक समस्यांवरची उत्तरे व तिला हवे असणारे सुख तिने सर्व नैतिक व सामाजिक बंधने जुगारून मनाला हवे तसे वागले म्हणजे मिळणार आहे का, याचा गांभिर्याने व सखोल विचार केला पाहिजे.

हिंदु धर्मातच स्त्री `मुक्‍ती'चा खरा मार्ग सांगितला आहे !
उलटपक्षी हिंदु धर्माने स्त्रीला सांगितलेली कर्तव्ये, तिला आचारावयास सांगितलेला धर्म, यांतून तिच्यात येणारे त्याग, नम्रता इत्यादी गुण आणि अहं व मन यांचा लय इत्यादी गोष्टी तिला कष्टदायक वाटल्या तरी अंतिमत: तिला स्वत:ला, कुटुंबाला व पर्यायाने राष्ट्राला सुखकारक, उन्नतीदर्शक व उद्धार करणार्‍या असतात, हे लक्षात घेतले पाहिजे.



मनूने स्त्रीवर बंधने घातली का ?

स्त्रियांचा कैवारी मनु ! :
`मनु आणि स्त्री' या विषयावर अ.भा. महिला परिषदेच्या परिसंवादाला तरुण गुरुदेव उपस्थित होते. `मनूने स्त्रीला पुरुषाची दासी केले आहे.' `स्त्रीची भयंकर पिळवणूक करणारा मनु.....' वगैरे वगैरे, अशी आधुनिक विदुषींची भाषणे झाली. अध्यक्षांनी गुरुदेवांना विनंतीनुसार बोलण्याची परवानगी दिली.
गुरुदेव गंभीर वाणीने म्हणाले, ``मनुसारखा स्त्रीवर परम र्ैंोम करणारा, परम कनवाळू महापुरुष जगात अन्य कोणीही नाही', असे हक्ल्से, नित्से, ऑपेन्सी व अन्य पाश्चात्त्य चिंतक सांगतात. मनु आणि अन्य सर्व स्मृतीकार पंचमहापापे सांगतात, त्यातील पाचवे महापाप, महापातकी संसर्ग म्हणजे चार प्रकारची महापापे करणार्‍याशी संसर्ग ठेवणारा त्यांच्यासारखाच महापापी होतो. चारही प्रकारची महापातके करणारा असा महापातकी आहे. त्याची वयात आलेली कन्या आहे. तिचे भवितव्य काय ? तिने आजन्म अविवाहीतच रहायचे का ? स्मृतीकार सांगतात, ``महापातक्याच्या मुलीशी कुणालाही विवाह करता येईल; मात्र तिने विवाहाआधी तीन दिवस उपवास केला पाहिजे व पित्याकडून कोणतीही संपत्ती किंवा वस्त्रही स्वीकारू नये.

तिने ब्राह्मणसभेत जाहीर करावे की, तिचा यापुढे पितृकुलाशी कोणताही संबंध
रहाणार नाही. (मनु. ३/२६१)
`पतित व्यक्‍तीची कन्या कधीही पतित मानली जाऊ नये', असे स्मृतीकार नि:संदिग्ध सांगतात; कारण ती परगामिनी, म्हणजे दुसर्‍या कुळात जाणारी आहे.
स्त्री सद्‌भावना, मनूचा अतीउदार दृष्टीकोन असलेली आणखी कितीतरी वचने गुरुदेवांनी सांगितली. त्यांना पाच मिनिटे वेळ दिला होता; परंतु ते पंचवीस मिनिटांपेक्षा अधिक वेळ बोलले, हे कुणाच्याही ध्यानी आले नाही.' - (घनगर्जित, जानेवारी २००७)

स्त्रीसंदर्भात मनूची वचने :
`ज्या मनूवर आज आसूड उगारला आहे, तो सांगतो,
१. `देवाच्या इच्छेने पतीला भार्या मिळते. स्वत:च्या इच्छेने नव्हे.
२. तिच्याशी धर्माने वागले, तर देवाच्या इच्छेनुसार वर्तन घडते.
३. पती पत्‍नीची उपेक्षा करीत असेल, उपजीविका चालवीत नसेल, तर उपजीविकेकरता तिने व्यवसाय करावा.
४. कुठलेही धर्मकार्य स्त्रीविना होऊ शकत नाही. स्त्रीही धर्मांगी आहे, स्वामिनी आहे.
५. पुरुषाने कमाई करायची व पत्‍नीच्या स्वाधीन करायची. खर्चही तिनेच करायचा. (केवढी दूरदृष्टी ?)
६. पित्यापेक्षाही माता ही सहस्रपट श्रेष्ठ आहे.
७. स्त्रीच्या ठिकाणी, वात्सल्य, र्ैंोम, भाव-भक्‍ती सहज आहे.
८. आक्रमक, अरेरावी, अहंगंड पुरुषाला भावकोमल, र्ैंोमळ, वत्सल स्त्रीच वळणावर आणू शकते.
स्त्री-मुक्‍तीचा महिमा धर्माने, महापुरुषांनी मुक्‍तकंठाने गायिला आहे.'
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी ( घनगर्जित, एप्रिल, २००७)