आळंदी (जिल्हा पुणे), ४ जुलै (वार्ता.) - आज भारतात धर्मांतर जोरात सुरू आहे. आपण त्याला विरोध केला पाहिजे. भारतात आज विदेशी कंपन्या आल्या आहेत व त्या पुन्हा एकदा भारत तोडण्याचे काम करत आहेत, त्याच्यापासूनही आपण सावध राहिले पाहिजे, असे आवाहन प.पू. आसारामजी बापू यांनी येथे केले. आळंदी जवळील केळगाव येथे योग वेदांत समितीतर्फे ३० जून, १ आणि २ जुलै या दिवशी बापूजींचा दर्शन व सत्संगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संपूर्ण दिवस चालू असणार्या या सोहळयाचा तीन दिवसांत लक्षावधी भक्तांनी लाभ घेतला.
स्वस्थ, सुखी आणि संयमीत जीवन केवळ भारतीय संस्कृतीच देऊ शकते !
``स्वस्थ, सुखी व संयमीत जीवन केवळ भारतीय संस्कृती देऊ शकते'', असा गुरुपौर्णिमेचा संदेश प.पू. आसारामजी बापू यांनी भक्तांना मार्गदर्शन करतांना दिला. ते पुढे म्हणाले, ``गुरूंच्या सत्संगाचे महत्त्व अनन्य साधारण आहे. हिंदु धर्माची महानता आत्म्याची जागृती करण्यातच आहे. गुरूंची सेवा म्हणजे त्यांची शारीरिक सेवा नसून, त्यांचे कार्य व संदेश समाजात पोहोचवणे ही आहे.''
सनातनला माझा सदैव पाठिंबा आणि आशीर्वाद !
याप्रसंगी पुणे येथील `दैनिक सनातन प्रभात'चे प्रतिनिधी सर्वश्री धीरज बेंगरुट, उमेश निकम आणि पराग गोखले यांनी बापूजींची भेट घेऊन त्यांना `दैनिक सनातन प्रभात'ची वैशिष्ट्ये सांगितली. तसेच पुणे जिल्ह्यातील हिंदूंची स्थिती, देवता आणि धर्म यांचे होणारे विडंबन, संतांची बदनामी, धर्मांतर अशा विविध विषयांची माहिती दिली. त्यावर बापूजींनी सांगितले, ``तुमचे कार्य खूप चांगले आहे. आमचा त्यास संपूर्ण पाठिंबा व आशीर्वाद आहे. आपल्याला सर्वांना मिळून हे कार्य करायचे आहे. धर्मद्रोह्यांच्या विरुद्ध आपण सदैव सज्ज राहून त्यांना धडा शिकवला पाहिजे.''
No comments:
Post a Comment