Advertisement

Sunday, June 28, 2009

`स्त्री मुक्‍ती'

स्त्रीधारेला पुरुषधारेत विलीन करून तिला मुक्‍तीची अधिकारिणी बनवणे, हा विवाहसंस्थेचा एक उद्देश आहे !


आधुनिक स्त्रीवादी
`जहाल व सौम्य स्त्रीवाद आणि स्त्रीमुक्‍ती', हे सर्व अर्थशून्य शब्दांचे बुडबुडे आहेत. ही सगळी साम्यवादी भाषा आहे. हा स्त्रीवादी प्रकार, म्हणजे स्त्री-जीवन उद्ध्वस्त करणारे सगळे राजकारणच आहे. इथे कुठेही स्त्रीचा गौरव किंवा सन्मान होत नाही. साम्यवादी व सामाजिक बांधिलकी असणार्‍यांनी आपली संघटना आणि चळवळ यांना सोयीचे करून इतिहास व साहित्य यांचे बीभत्स विकृतीकरण केले आहे. या विकृतीकरणालाच `इतिहासाचे पुनर्वाचन' असे मोठे गोड नाव दिले आहे.

कुटुंब-व्यवस्था तोडण्याचे ध्येय बाळगणारी सध्याच्या काळातील चळवळ !
`स्त्री ही कुटुंब-व्यवस्थेचा कणा आहे. वेदकालात प्रथम पूजेचा मान `सरस्वती (नदी), भारती (भरतकुलाची अधिष्ठात्री देवता) व इला (पहिला सम्राट मनू याची कन्या)' या तिघींना होता. तो गणनायक गणपतीला नव्हता. सध्याच्या काळात जी `स्त्री-मुक्‍तीची' चळवळ होत आहे, तिचे ध्येय कुटुंब-व्यवस्था तोडण्याचे आहे, जोडण्याचे नाही. `तिच्यावर होणारे अत्याचार थांबले पाहिजेत, ती शक्‍ती आहे, याची जाणीव तिला करून दिली पाहिजे', हे खरे; पण स्त्री-मुक्‍तीच्या नावाखाली कुटुंब-व्यवस्था मोडणे, ही चळवळ होता कामा नये. कुटुंब-संस्था मोडली की, गृहसौख्य संपले.' - श्री. श्रीपाद दत्तात्रय कुलकर्णी (हिंदू कोणास म्हणावे ?)

स्त्रीमुक्‍तीवाल्यांनो, हे लक्षात घ्या !
`आमची समस्या स्त्रीमुक्‍ती वा स्त्रीस्वातंत्र्य वा स्त्रियांचे पुरुषीकरणही नाही. हे जग द्वंद्वात्मक आहे. पारतंत्र्याच्या उदरात स्वातंत्र्य आहे, तर स्वातंत्र्याच्या पोटात पारतंत्र्य आहे. स्त्रीस्वातंत्र्य, समान हक्क वगैरेत स्वभावसिद्ध स्त्रीचे पारतंत्र्य आम्हाला दिसू नये का ? तेव्हा आधुनिक काळाला योग्य अशी जुने काही न सोडता, `स्त्री जीवनाची उभारणी कशी करायची', हा विचार आम्ही केला पाहिजे. कशाला त्या पाश्चात्त्यांची उसनवारी करता ? कशाला त्यांची थुंकी झेलता ? आमच्या थोर पूर्वजांनी जे स्त्रीजीवनाचे वळण, जे महत्त्व प्रतिपादिले आहे, जो आचारधर्म दिला आहे, त्याचे संशोधन करा. त्या भांडवलाचा उपयोग करा ! आमच्या उज्ज्वल स्त्रीजीवनाने सगळे जग मुग्ध होईल, असे काहीतरी करा ! जरा विचार तर करा !'

पुरुषप्रधान हिंदु व्यवस्थेवर आक्रमण करणार्‍या स्त्रियांचे समाजद्रोही भाष्य
`स्त्री ही पुरुषाची दासी आहे', असे सांगून पुरुर्षैंाधान हिंदु व्यवस्थेवर आक्रमण करतांना त्या मूर्ख, बेअकली स्त्रिया सांगतात, `विवाहसंस्थाच कालबाह्य झाली आहे. स्त्रीला आपले व्यक्‍तीमत्व फुलवण्याकरिता विवाहाची गरज नाही. ती स्वतंत्र आणि एकटी राहू शकते. मातृत्व हाच तिचा जन्मसिद्ध हक्क असल्याने तिने तो बजावण्यापुरताच पुरुषाचा आधार घ्यावा.' विश्‍वाला जाळून टाकणार्‍या कालकुटेपेक्षा भयंकर असे विषारी फुत्कार त्या टाकत आहेत. स्त्रीमुक्‍ती, प्रगती, सुधारणा व पुरोगामित्व या आवरणाखाली अशी समाजद्रोही भाष्ये त्या करत आहेत, इतकेच नव्हे, तर काही मस्तवाल व उन्मादी स्त्रियांनी तसा प्रयोगही केला आहे' - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

स्त्रीने स्वत:च्या ऐहिक सुखासाठी तथाकथित मुक्‍तीचा विचार करणे, म्हणजे अविचारच असणे
`आपल्या राष्ट्राच्या अवनतीच्या दोन मुख्य कारणांमध्ये एक कारण `आपली भारतीय स्त्री आपले मातृत्व विसरली', हे आहे. आपल्या महाभारत, पुराणादी इतिहासाच्या ग्रंथांवरून आणि त्या मार्गाचा आदर्श ठेवून वागणार्‍या कलीयुगातील स्त्रियासुद्धा परमपदाला प्राप्‍त झालेल्या दिसतात. आपल्या इतिहासात चुडाला, महालसा यांसारख्या महापतिव्रतांची फार मोठी उदाहरणे देता येतील. त्यांनी आपला उद्धार करून घेऊन आपली पातिव्रत्याची भूमिका किंचितसुद्धा न सोडता आपल्या पतींचा उद्धार केला आहे. तेव्हा आपल्या संस्कृतीने स्त्रीला केव्हाच बद्ध केलेले नाही, फक्‍त मोठमोठे संत आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राष्ट्रपुरुष यांची ती जन्मदात्री असल्यामुळे तिची मानसिक उन्नती होणे अपरिहार्य ठरते आणि ती होण्याला धर्माचरण कारणीभूत होत असते. त्यामुळे तिला जास्तीतजास्त विधीनिषेधांनी जखडून ठेवले आहे. ही बंधने तिच्या मुक्‍तीसाठी आहेत. असे असतांना `ती बद्ध नसून नित्य शुद्ध, बुद्ध असा आत्माच आहे', अशी तिला अनुभूती यावी, हे कारण असतांना विनाकारण आणखी ऐहिक सुखाची आशा दृष्टीपुढे ठेवून तिच्या तथाकथित मुक्‍तीसाठी प्रयत्‍न करणे, हा अविचारच होय.' - प.पू. काणे महाराज, नारायणगाव



`स्त्री मुक्‍ती' म्हणजे काय ?


१९७४ साली टोरान्टो येथे आंतरराष्ट्रीय समाज-विज्ञान परिषदेत `स्त्री मुक्‍ती'ची कल्पना जन्माला आली. पूर्वी इंग्लडमध्ये स्त्रियांनी मतदानाच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याचा त्यावर प्रभाव होता. कालांतराने हे पाश्चात्त्य विचारांचे लोण भारतात आले.
स्त्री व पुरुष समान आहेत, त्यामुळे त्यांच्या कामांचे वर्गीकरण लिंगभेदाने होता कामा नये. साहित्य, कला, उद्योग, राजकारण इत्यादी क्षेत्रांत आतापर्यंत पुरुषवादी भूमिकेतून विचार करण्यात आला, तो विचार स्त्रीवादी भूमिकेतून होणे गरजेचे आहे, अशा प्रकारची भूमिका स्त्री मुक्‍ती चळवळीतून पुढे आली. भारतात इंग्रजी शिक्षण सुरू झाल्यानंतर स्त्रियाही शिकू लागल्या. हिंदु धर्मातील धर्माचरण ही `अन्यायकारक बंधने' आहेत, असे वाटणे सुरू झाले. आगरकर, कर्वे आदी सुधारकांनी स्त्रियांना पुढे शिकण्याला प्रोत्साहन दिले. त्यानंतर विभक्‍त कुटुंबपद्धती, स्त्रियांचे अर्थार्जन व पुढे स्त्री-पुरुष समानता या अंगाने हा विषय येत गेला. ताराबाई शिंदे यांचा `स्त्री-पुरुष तुलना' हा लेख इत्यादी साहित्यातून भारतातील स्त्रीवादी लिखाणाला सुरुवात झाली.

आधुनिक भारतीय स्त्रीवादी दृष्टीकोन
पाश्चात्त्य शिक्षणाच्या व साहित्याच्या प्रभावामुळे हिंदु धर्म प्रतिगामी, जुनाट विचारांचा, संकुचित आहे, हिंदु धर्मात स्त्रियांवर बंधने घातली आहेत, तिला दासी व भोग्य वस्तू बनवले आहे, स्त्रीला कोणतेही स्वातंत्र्य दिलेले नाही, अशा प्रकारचे (गैर)समज पसरवण्यात येऊन भारतात स्त्री मुक्‍तीची चळवळ पसरली. त्यात प्रामुख्याने साम्यवादी व समाजवादी साहित्यिक, तथाकथित सामाजिक कार्यकर्ते व बुद्धीवादी प्राध्यापक यांचा मोठा हात होता. प्रत्यक्षात हिंदु धर्माचा कोणताही अभ्यास न करता, कोणत्याही प्रकारचे धर्माचरण किंवा साधना न करता धर्मात सांगितलेल्या गोष्टी चुकीच्या आहेत, असे वारंवार सांगणे व त्यावर टीका करून त्याचे आचरण न करणे म्हणजे स्वातंत्र्य उपभोगणे, बंधनांच्या पलीकडे जाणे अशा संकल्पना स्त्रीवादी साहित्यातून आणि विचारातून रुजवण्यात आल्या.

मुक्‍तीऐवजी अध:पतन !
क्षुल्लक कारणावरून घटस्फोट घेणे, लग्न न करता परपुरुषाबरोबर रहाणे, देहप्रदर्शन करणारे कपडे घालणे इ. गोष्टी करणे म्हणजे खरोखरच स्वतंत्र व सुखी होणे आहे का ? घरात व घराबाहेर स्त्रियांवर होणारे अन्याय, अपमान, तिला सहन करावे लागणारे दु:ख व तिला होणारे कौटुंबिक व सामाजिक त्रास, घटस्फोट, स्त्री भू्रण हत्या, हुंडाबळी यांसारख्या अनेक समस्यांवरची उत्तरे व तिला हवे असणारे सुख तिने सर्व नैतिक व सामाजिक बंधने जुगारून मनाला हवे तसे वागले म्हणजे मिळणार आहे का, याचा गांभिर्याने व सखोल विचार केला पाहिजे.

हिंदु धर्मातच स्त्री `मुक्‍ती'चा खरा मार्ग सांगितला आहे !
उलटपक्षी हिंदु धर्माने स्त्रीला सांगितलेली कर्तव्ये, तिला आचारावयास सांगितलेला धर्म, यांतून तिच्यात येणारे त्याग, नम्रता इत्यादी गुण आणि अहं व मन यांचा लय इत्यादी गोष्टी तिला कष्टदायक वाटल्या तरी अंतिमत: तिला स्वत:ला, कुटुंबाला व पर्यायाने राष्ट्राला सुखकारक, उन्नतीदर्शक व उद्धार करणार्‍या असतात, हे लक्षात घेतले पाहिजे.



मनूने स्त्रीवर बंधने घातली का ?

स्त्रियांचा कैवारी मनु ! :
`मनु आणि स्त्री' या विषयावर अ.भा. महिला परिषदेच्या परिसंवादाला तरुण गुरुदेव उपस्थित होते. `मनूने स्त्रीला पुरुषाची दासी केले आहे.' `स्त्रीची भयंकर पिळवणूक करणारा मनु.....' वगैरे वगैरे, अशी आधुनिक विदुषींची भाषणे झाली. अध्यक्षांनी गुरुदेवांना विनंतीनुसार बोलण्याची परवानगी दिली.
गुरुदेव गंभीर वाणीने म्हणाले, ``मनुसारखा स्त्रीवर परम र्ैंोम करणारा, परम कनवाळू महापुरुष जगात अन्य कोणीही नाही', असे हक्ल्से, नित्से, ऑपेन्सी व अन्य पाश्चात्त्य चिंतक सांगतात. मनु आणि अन्य सर्व स्मृतीकार पंचमहापापे सांगतात, त्यातील पाचवे महापाप, महापातकी संसर्ग म्हणजे चार प्रकारची महापापे करणार्‍याशी संसर्ग ठेवणारा त्यांच्यासारखाच महापापी होतो. चारही प्रकारची महापातके करणारा असा महापातकी आहे. त्याची वयात आलेली कन्या आहे. तिचे भवितव्य काय ? तिने आजन्म अविवाहीतच रहायचे का ? स्मृतीकार सांगतात, ``महापातक्याच्या मुलीशी कुणालाही विवाह करता येईल; मात्र तिने विवाहाआधी तीन दिवस उपवास केला पाहिजे व पित्याकडून कोणतीही संपत्ती किंवा वस्त्रही स्वीकारू नये.

तिने ब्राह्मणसभेत जाहीर करावे की, तिचा यापुढे पितृकुलाशी कोणताही संबंध
रहाणार नाही. (मनु. ३/२६१)
`पतित व्यक्‍तीची कन्या कधीही पतित मानली जाऊ नये', असे स्मृतीकार नि:संदिग्ध सांगतात; कारण ती परगामिनी, म्हणजे दुसर्‍या कुळात जाणारी आहे.
स्त्री सद्‌भावना, मनूचा अतीउदार दृष्टीकोन असलेली आणखी कितीतरी वचने गुरुदेवांनी सांगितली. त्यांना पाच मिनिटे वेळ दिला होता; परंतु ते पंचवीस मिनिटांपेक्षा अधिक वेळ बोलले, हे कुणाच्याही ध्यानी आले नाही.' - (घनगर्जित, जानेवारी २००७)

स्त्रीसंदर्भात मनूची वचने :
`ज्या मनूवर आज आसूड उगारला आहे, तो सांगतो,
१. `देवाच्या इच्छेने पतीला भार्या मिळते. स्वत:च्या इच्छेने नव्हे.
२. तिच्याशी धर्माने वागले, तर देवाच्या इच्छेनुसार वर्तन घडते.
३. पती पत्‍नीची उपेक्षा करीत असेल, उपजीविका चालवीत नसेल, तर उपजीविकेकरता तिने व्यवसाय करावा.
४. कुठलेही धर्मकार्य स्त्रीविना होऊ शकत नाही. स्त्रीही धर्मांगी आहे, स्वामिनी आहे.
५. पुरुषाने कमाई करायची व पत्‍नीच्या स्वाधीन करायची. खर्चही तिनेच करायचा. (केवढी दूरदृष्टी ?)
६. पित्यापेक्षाही माता ही सहस्रपट श्रेष्ठ आहे.
७. स्त्रीच्या ठिकाणी, वात्सल्य, र्ैंोम, भाव-भक्‍ती सहज आहे.
८. आक्रमक, अरेरावी, अहंगंड पुरुषाला भावकोमल, र्ैंोमळ, वत्सल स्त्रीच वळणावर आणू शकते.
स्त्री-मुक्‍तीचा महिमा धर्माने, महापुरुषांनी मुक्‍तकंठाने गायिला आहे.'
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी ( घनगर्जित, एप्रिल, २००७)


No comments:

Post a Comment