अल्लाउद्दीन खिलजीने चितौडवर स्वारी केली. राणी पद्मीनीच्या सौंदर्याची ख्याती त्याला माहीत होती. त्याने तिला भेटायला येण्याचा आदेश दिला. तिने सांगितले, मी भेटायला येईन; पण बरोबर हजार दासींना घेऊन येईन. हजार मेणे आणि त्यांना वाहणारे चार जण जेव्हा खिलजीच्या दारात आले, तेव्हा त्या मेण्यांतून कोणी सुंदर्या नव्हे, तर सैनिक आणि चार वाहून नेणारे यांची शस्त्रे बाहेर पडली आणि त्याच्यावर हल्ला केला ! दुसर्यांदा खिलजीने चितौडवर हल्ला केला. तेव्हा ती म्हणाली प्राणपणाने लढा ! जेव्हा गड हातचा जाणार असे दिसू लागले, तेव्हा राणी पद्मिनीने आठ हजार स्त्रियांसह अग्नीसमर्पण केले !
नाशिक येथे आपल्या जावेवर महजबखानाने केलेले अत्याचार जिजाऊंनी पाहिले. ज्या राज्यात हिंदु स्त्री सुरक्षित राहू शकेल, असे हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी क्षात्र व धर्म तेज असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांनी घडवले. स्त्रियांवर भीषण अत्याचार होत असतांना हिंदु स्त्रियांनी आपल्या कुटुंबाचे संगोपन करून त्या कुटुंबातील पुरुषांचे मनोधैर्य वाढवून त्यांना शत्रूनाशार्थ उद्युक्त केले. सर्व हिंदु सरदार मुसलमान सुलतानाकडे नांग्या टाकून लाचार झाले असतांना केवळ एक जिजाऊ पुढे आली. तिने अतिशय योजनाबद्ध पद्धतीने शिवबाची शारीरिक व मानसिक जडणघडण केली. त्याची प्राणांतिक लढा देण्याची तयारी करवून घेतल्यामुळे त्याने स्वत:ला संघर्षमय जीवनात झोकून दिले. सदैव क्षात्रधर्म जागवणार्या या माऊलीने कर्तबगार पुत्र घडवण्यासाठी आवश्यक ते सर्व केले. पुढे हिंदवी स्वराज्यात एकाही मुगल सरदाराची हिंदु स्त्रीकडे मान वर करून बघण्याची हिंमत झाली नाही !
केवळ स्वत:चे राज्य टिकवण्यासाठी नव्हे, तर राष्ट्राच्या आणि धर्माच्या अस्मितेसाठी प्राणार्पणाने लढून केवळ २३ व्या वर्षी कुडीत प्राण असतांना स्वत:ला अग्नीसमर्पण करणारी झाशीची राणी ! झाशीच्या राणीने मरतांना सांगितलं, ``हा भारतीय स्त्रीचा देह आहे. याची विटंबना होऊ देऊ नका. या देहाला कुणाचाही स्पर्श होऊ देऊ नका !'' आणि तिने चीतेत उडी घेतली. तोफांची सलामी नाही. भा.रा. तांबे म्हणतात `रे हिंद बांधवा, थांब या स्थळी । अश्रू दोन ढाळी, ही पराक्रमाची ज्योत मावळे, इथे झाशीवाली ।।' (संदर्भ : सोलापूर येथील हिंदु जनजागृती समितीच्या `रणरागिणी' या महिला शाखेच्या उद्घाटन सोहळयातील वक्त्यांचे मार्गदर्शन)
स्वातंत्र्यसेनानी स्त्रियांचे सशस्त्र लढ्यातील बलिदान विसरू नका !
१९२० ते १९३० या दशकात शेकडो मुलींनी स्वातंत्र्याच्या सशस्त्र चळवळीत स्वत:ला झोकून दिले. न्यायाधीश मि. स्टिव्हनसन स्त्रियांची छळवणूक करण्यात पटाईत होता. शांती बोस आणि सुनीती चौधरी शांतपणे त्याच्या कचेरीत गेल्या आणि त्यांनी स्वबळावर या टिप्परच्या जिल्हा न्यायाधिशावर गोळया झाडल्या. बीना दासने १९२२ साली बंगालचा गव्हर्नर स्टॅनले जॅक्सनवर गोळया झाडण्याचा प्रयत्न केला. तिला नऊ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली. १९३२ मध्ये चितगाँग सशस्त्र लुटीच्या खटल्यात क्रांतीकारांना शिक्षा झाली. त्यानंतर सहा महिन्यांनी प्रीतीलता वाडेदार व तिच्या सहकार्यांनी क्लबवर बाँब टाकून गोळीबार करून आक्रमण केले. तिचे साथीदार पळून जाऊ शकले. मात्र पुरुषी पोषाख केलेली प्रीतीलता क्लबबाहेर मृत स्थितीत सापडली. तिने सायनाईड खाल्ले होते. यानंतर स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र लढ्यातील स्त्रियांचा सहभाग वाढतच गेला. अंबिका चक्रवर्ती व कल्पना दत्त यांना आजन्म कारवासाची शिक्षा झाली. कौंटुंबिक सुखाला तिलांजली देऊन स्वेच्छेने असिधाराकात स्वीकारलेल्या अशा या क्रांतीकारक स्त्रियांचे बलिदान भारतीय मुलींना नेहमीच प्रेरणादायी ठरेल ! - (संदर्भ : क्षितीजावरील शलाका, लेखिका : शारदा साठे)
अत्याचार सोसूनही नैतिकता शाबूत राखणार्या काश्मिरी हिंदु महिला म्हणजे भारताच्या आदर्श इतिहासातील सोनेरी पान !
`काश्मिरी हिंदूंवर इस्लामी भयोत्पादाची अनेक संकटे कोसळली. निर्वासितांच्या छावण्यांतील जीवनाने तर सर्वांची परवड केली, तरी आमच्या हिंदु स्त्रियांनी, विशेषत: तरुण मुलींनी आपली नैतिकता शाबूत राखली. कोणाला त्याबद्दल बोलायलासुद्धा काही वाव ठेवला नाही.' - डॉ. (सौ.) शक्ती भान खन्ना, उपाध्यक्षा, पनून कश्मीर. (दैनिक सनातन प्रभात, १४.१०.२००७)
`२०० रुपये घ्या आणि हिंदु मुलींना बाटवा' असा आदेश मुसलमानांकडून काढण्यात आला आहे. संभाजीनगरमध्ये नुकताच एका शिक्षिकेजवळ कबुलीजबाब देतांना एका मुसलमान विद्यार्थ्यांने हे उघड केले. हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळयात अडकवण्यासाठी त्यांनी `लव्ह जिहाद' पुकारले आहे. हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळयात अडकवून त्यांचे धर्मांतर करण्यासाठी मुसलमानांनी मोठी चळवळ उभारली आहे आणि त्याला शेकडो हिंदु मुली बळी पडत आहेत. त्यासाठी त्यांना लाखांहून अधिक किमतीची गाडी, हवे तेव्हा इंधन व पैसे दिले जातात. ३०० हून अधिक मुली अशा धर्मांतरीत झाल्या आहेत.
मुसलमान चित्रपट अभिनेत्यांचे अंधानुकरण केले जात आहे. कोल्हापूर येथे हनिफ नावाच्या मुलाने बहिणीच्या हिंदु मैत्रिणीशी संधान साधून तिच्या नावाने `क्रेडीट कार्ड' काढून अनेक व्यापार्यांना गंडा घातला. आता तो व ती हिंदु मुलगी तुरुंगात आहेत. विदर्भात कपड्यांच्या दुकानात कपडे बदलण्याच्या खोलीत छुपे छायाचित्रक बसवून हिंदु मुलींची अब्रू विकली जात आहे. जळगावमध्ये १३ मुसलमान मुलांना हिंदु मुलींना फसवल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. नांदेडमध्ये हिंदूंनी `बहना भाग मत जाना' असे आंदोलन सुरू केले आहे. हिंदु मुलींना फसवून लग्न झाल्यावर त्यांना मोलकरीण म्हणून घरात ठेवले जात आहे. अशा अत्याचारग्रस्त महिला आता बाहेर पडून पत्रकार परिषदा घेत आहेत. हे केवळ भारतातच सुरू आहे, असे नव्हे, तर अशा प्रकारचा आदेश लंडनमध्येही काढल्याने तेथील पोलिसांनी पालकांना सतर्क केले आहे व `हिंदु मुलींनो, सापळयात अडकू नका' असे आवाहन केले आहे !
No comments:
Post a Comment