भ्रष्टाचार निर्मूलनासाठी प्रत्येक व्यक्तीने साधनेने सत्त्वप्रधान व नैतिकदृष्ट्या बलशाली होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही !
भ...भ... भारताचा व भ....भ...भ्रष्टाचाराचा हे समीकरण आता भारतियांनाच नव्हे, तर जगालाही नवीन नाही. ग्रामसभेच्या कट्ट्यापासून ते संसदेच्या खुर्च्यांपर्यंत बोकाळलेल्या भ्रष्टाचाराची झळ क्रीडा, शिक्षण, आरोग्य, सांस्कृतिक, व्यावसाय, उद्योग अशा सर्व क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. समाजात कुठल्याही बाबतीत नेहमी समर्थक व विरोधक अशा दोन प्रकारच्या प्रवृत्ती किंवा गट पहायला मिळतात. त्यामुळे भ्रष्टाचाराच्याही बाबतीत तसे असणे ओघाने आलेच. अर्थात् कोणाचा काय मार्ग असू शकतो, याचा मात्र नेम नाही ! नुकतीच `दी वीक' या इंग्रजी मासिकाने `देशाविषयी काहीतरी इच्छिणार्या नागरिकांना भ्रष्टाचारामुळे प्रतिबंध होतो का ?', याविषयी मते मागवली होती. त्यातील ४८ टक्के नागरिकांनी होकारार्थी उत्तर दिले, तर २९ टक्के नागरिकांनी नकारार्थी उत्तर दिले. २३ टक्के नागरिक कोणतीही भूमिका घेण्यास अपयशी ठरले. येथे होकारार्थी व नकारार्थी उत्तर देणार्यांबाबत सांगायचे म्हणजे ते भ्रष्टाचार रोखण्यासाठी कार्यरत आहेत; पण ज्यांची गटवारी देशासाठी काही तरी करू इच्छिणार्यांमध्ये आहे, अशांना भ्रष्टाचाराचे भयाण वास्तव दैनंदिन जीवनात अनुभवास येत असतांना, त्याविषयी उत्तर न सांगता येणे, हे लज्जास्पद आहे ! अशांकडून भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन होईल, ही अपेक्षा नाही !
भ्रष्टाचाराच्या समूळ उच्चाटनाचा उपाय !
स्वातंत्र्यानंतर भारतीय राजकारणात स्वार्थी प्रवृत्तींचा शिरकाव झाला. राष्ट्राच्या प्रगतीपेक्षा वैयक्तिक हित राजकारण्यांनी जोपासण्यास सुरुवात केली. आज भ्रष्टाचाररूपी राक्षसाची पाळेमुळे अगदी खोलवर रुजली गेली आहेत. देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत श्रीमती इंदिरा गांधी यांनी `भ्रष्टाचार हा जगभर चालतो', असे भ्रष्टाचाराचे समर्थन करणारे विधान केले होते. देशाच्या उच्च नेत्याच्या या विधानामुळेच भ्रष्टाचाराला राजमान्यता मिळाल्यासारखेच झाले. त्यामुळे आता तो शिष्टाचार झाला आहे. त्यामुळे तो बदलण्याचा प्रयत्न, तर सोडाच; पण विचारही करणे आज हास्यविनोदाचा विषय बनतो. हे समाजाच्या नैतिकतेचे अध:पतन आहे ! भ्रष्टाचाराच्या समस्येचे समूळ उच्चाटन अशक्य आहे. लाच देणार्यांच्या किंवा घेणार्यांच्या मनात लाच घेऊ किंवा देऊ नये, असा विचार का येत नाही ? किंबहुना तो आणण्यासाठी काय करू शकतो, याची उत्तरे शोधणे म्हणजे खर्या अर्थाने भ्रष्टाचाराच्या निर्मूलनासाठी कार्य केल्यासारखे होईल. यासाठी जनतेची मानसिकता, मनोवृत्ती बदलणे गरजेचे आहे व मनातील विचारांत सकारात्मक बदल करण्यासाठी व्यक्ती सत्त्वप्रधान व नैतिकदृष्ट्या बलशाही होणे गरजेचे आहे. ते होण्यासाठी आध्यात्मिक साधनेशिवाय दुसरा पर्याय असूच शकत नाही, हेही तितकेच खरे !
निगडीत वृत्त : लोकहो भ्रष्टाचार रोखा
अमेरिकेतील इंडियन नॅशनल ओव्हरसीज काँग्रेसकडून हिंदुत्ववादी संघटनेवरील खटला मागे ! : 2008-10-13
कनिष्ठ अभियंता आणि लिपिक यांना लाच घेतांना अटक : 2008-10-07
भ्रष्टाचारी लिपीकाला पाठीशी घालणार्या तहसीलदारावर कारवाई करा - दीपक सावंत : 2008-07-26
तक्रारी नाहीत, तर शासन पवनचक्क्यांबाबत चौकशी का करत आहे ? - अरविंद सावंत : 2008-07-26
आर्थिक खर्चाचे अहवाल दाबून ठेवून भ्रष्टाचार करू नका - नितीन गडकरी : 2008-07-23
अहमदाबाद येथे लाच स्वीकारणार्या तीन आयकर अधिकार्यांना अटक : 2008-06-05
अनधिकृत बांधकाम करणार्यांना पालिका अधिकारीच पाठीशी घालतात ! - सुभाष सावंत : 2008-03-17
नोयडा भूखंड घोटाळ्याच्या प्रकरणी प्रशासकीय अधिकार्यांच्या निवासस्थानांवर धाडी : 2008-01-12
मध्यान्ह आहार योजनेसाठी ४ हजार कोटी रुपये : 2008-01-11
लाचखोर उपनिबंधक व लिपिक यांस अटक : 2007-11-29
Thursday, November 13, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
We common people cant make a change. We are helpless !!!
ReplyDeletei don't agree with u, a comman man can change the whorld, nothing is impossible, just we have to some responsibility about our country. Think, Gandhiji, Bhagat singh, Savarkar and so many freedom fighters are comman man if they think like u then we doesn't get independence. So be brave.
ReplyDeleteभ्रष्टाचाराच्या समस्येचे समूळ उच्चाटन अशक्य आहे. लाच देणार्यांच्या किंवा घेणार्यांच्या मनात लाच घेऊ किंवा देऊ नये, असा विचार का येत नाही ? किंबहुना तो आणण्यासाठी काय करू शकतो, याची उत्तरे शोधणे म्हणजे खर्या अर्थाने भ्रष्टाचाराच्या निर्मूलनासाठी कार्य केल्यासारखे होईल. यासाठी जनतेची मानसिकता, मनोवृत्ती बदलणे गरजेचे आहे व मनातील विचारांत सकारात्मक बदल करण्यासाठी व्यक्ती सत्त्वप्रधान व नैतिकदृष्ट्या बलशाही होणे गरजेचे आहे. ते होण्यासाठी आध्यात्मिक साधनेशिवाय दुसरा पर्याय असूच शकत नाही, हेही तितकेच खरे !
So do sadhna and make u r self a true indian spiritually and mentally healthy indain , u can chaange the whole world.