Advertisement

Showing posts with label bharat. Show all posts
Showing posts with label bharat. Show all posts

Wednesday, November 19, 2008

भारत सर्वत्रच्या हिंदूंचा आधारस्तंभ केव्हा होणार ?

जगभरातील हिंदूंच्या सुरक्षिततेबाबतची विदारक स्थिती बदलण्यासाठी हिंदुनिष्ठ राज्यकर्त्यांची गरज ओळखा !

दोन दिवसांपूर्वी अमेरिकेतील एक भारतीय हिंदु तरुण श्री. फलुरी शशांक याच्यावर गोळया झाडण्यात आल्या. अमेरिकेतील भारतीय व त्याहून अधिक हिंदू, वर्णभेदाचे शिकार होत असल्याची ही काही पहिलीच घटना नाही. या दोन-तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये अपर्णा जिनागा, टी. सौम्या व ए. श्रीनिवास या भारतीय हिंदूंची हत्या करण्यात आली. या घटना वर्णद्वेषामुळे होत आहेत, असा प्राथमिक अंदाज आहे. परदेशात शिक्षणासाठी अथवा इतर कारणासाठी जाणार्‍या भारतीय हिंदूंचे जीवन तेथे सुरक्षित नसते, हे या घटनांतून लक्षात येते. हे केवळ अमेरिकेतील भारतीय हिंदूंपुरतेच मर्यादित आहे, या भ्रमात कोणी राहू नये. १५ सप्टेंबर रोजी सोमालियातील चाच्यांनी `स्टॉल्ट वेलर' या जहाजाचे अपहरण केले होते. या जहाजामध्ये १८ भारतीय खलाशी होते. चाच्यांना खंडणी दिल्यानंतर या जहाजावरील खलाशांची १६ नोव्हेंबर रोजी सुटका करण्यात आली. यात मुख्य बाब म्हणजे जहाजावरील भारतीय खलाशांची माहिती मिळवण्यासाठी त्यांच्या नातेवाइकांना भारताचे जलवाहतूक मंत्रालय, `एन्.यु.एस्.आय' आदी ठिकाणी हेलपाटे घालावे लागले. ही बाब खरोखर चिंता करायला लावणारी आहे. यावरून परदेशात अडकलेल्या भारतियांच्या सुरक्षिततेबद्दल काँग्रेस सरकारला कोणतेही सोयर-सुतक उरलेले नाही, हेच दिसून येते.

ज्यूंना इस्रायलचा आधार वाटतो, हिंदूंना भारताचा आधार वाटत नाही ! भारतातील मिझोरम व त्रिपुरा येथील राज्यांमध्ये वास्तव्य करणारी नेई मेनशी ही जमात `ज्यू' आहे. या जमातीतील काही लोकांनी इस्रायलशी संपर्क केल्यावर या जमातीला इस्रायलमध्ये सामावून घेण्याची घोषणा इस्रायल सरकारने केली. जानेवारी महिन्यात एका विशेष विमानाने या जमातीतील सर्व लोक इस्रायलला रवाना होणार असून त्यांचे स्वागत इस्रायलचे पंतप्रधान करणार आहेत. या घटनेवरून जगाच्या पाठीवर कुठेही ज्यू लोक वास्तव्य करत असतील, तर त्यांना इस्रायलचा आधार वाटतो. पर्यटनासाठी विविध देशांमध्ये जाणार्‍या इस्रायलमधील प्रत्येक नागरिकावर तेथील गुप्‍तचर यंत्रणेचे बारीक लक्ष असते. असे करण्यामागे तो नागरिक जिथे जाईल, तिथे सुरक्षित असावा, हा दृष्टीकोन असतो. इस्रायल सरकार नागरिकांची एवढी काळजी घेते; म्हणून तेथील नागरिकही देशासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यासाठी नेहमीच सज्ज असतात. या कारणामुळेच इस्रायल पॅलिस्टीनी दहशतवाद्यांना पुरून उरला आहे. आता या उलट स्थिती जगभरातील हिंदूंची आहे. मागील वर्षी अफगाणिस्तानमध्ये कामासाठी गेलेल्या सूर्यनायारण या हिंदू कर्मचार्‍याला अफगाणिस्तानमधील दहशतवाद्यांनी पकडून त्यांचा शिरच्छेद केला. अफगाणिस्तान तसेच आखाती देशांमध्ये कामाच्या निमित्ताने जाणार्‍या हिंदूंच्या वाट्याला येणार्‍या भोगांबद्दल कितीही लिहिले, तरी कमी पडणार ! असे असतांना त्यांच्याबद्दल कोणालाही कळवळा वाटत नाही !

हिंदूंच्या जिवाची किंमत शून्य आहे का ?
सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांची भेट घेतली होती. त्या वेळी परराष्ट्र धोरणांवर चर्चा होण्याऐवजी कंधमलमधील दंगलींमध्ये होरपळलेल्या ख्रिस्त्यांच्या मुद्यांवर अधिक चर्चा झाली. डॉ. सिंग हे फ्रान्समध्ये अणूकरारावर स्वाक्षरी करण्यासाठी गेले असता फ्रान्सचे पंतप्रधान सरकोझी यांनी डॉ. सिंग यांची कंधमलमधील ख्रिस्त्यांवरील तथाकथित अत्याचारांच्या पार्श्‍वभूमीवर कानउघाडणी केली होती ! यावर डॉ. सिंग यांनी काहीही भाष्य न करता त्यांना ख्रिस्त्यांच्या सुरक्षिततेचे आश्‍वासन दिले होते. भारतातील कंधमलमधील छोट्याशा जिल्ह्यात वास्तव्य करणार्‍या ख्रिस्त्यांची दखल जगभरातील ख्रिस्तीराष्ट्रे घेतात, तर अमेरिकेमधील वर्णद्वेषामुळे बळी पडणार्‍या हिंदूंची दखल मात्र कोणीही घेत नाहीत ! काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे नूतन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पंतप्रधान डॉ. सिंग यांना दूरध्वनी केला होता. त्या वेळी डॉ. सिंग यांनी त्यांना भारतात येण्याचे निमंत्रण दिले. या दोघांमधील दूरध्वनीवरील संभाषणामध्ये, `अमेरिकेतील हिंदू वर्णद्वेषाचे शिकार होत आहेत', याबद्दल डॉ. सिंग ओबामा यांना ठणकावून सांगू शकले असते; मात्र सिंगसाहेबांना हिंदूंच्या जिवाची किंमत कळते कुठे ?

भारत हे हिंदूंचे माहेरघर होणे आवश्यक !
मलेशिया, पाकिस्तान, बांगलादेश येथील हिंदू नरकयातना सहन करत आहेत. हे हिंदू मदतीसाठी याचना करत आहेत; मात्र त्यांच्या मदतीला धावून जाण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. इस्रायलची स्थापना झाल्यानंतर तेथील सरकारने जगभरातील ज्यूंना इस्रायलमध्ये येण्याची हाक दिली. जगभरातील हिंदूंची विदारक स्थिती पहाता आता भारत हे हिंदूंचे माहेरघर होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रथम भारतावर राज्य करणारे राज्यकर्ते हिंदुनिष्ठ हवेत. असे राज्यकर्ते केवळ वैचारिक क्रांतीनेच मिळू शकतात !

Thursday, November 13, 2008

भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करा !

भ्रष्टाचार निर्मूलनासाठी प्रत्येक व्यक्‍तीने साधनेने सत्त्वप्रधान व नैतिकदृष्ट्या बलशाली होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही !
भ...भ... भारताचा व भ....भ...भ्रष्टाचाराचा हे समीकरण आता भारतियांनाच नव्हे, तर जगालाही नवीन नाही. ग्रामसभेच्या कट्ट्यापासून ते संसदेच्या खुर्च्यांपर्यंत बोकाळलेल्या भ्रष्टाचाराची झळ क्रीडा, शिक्षण, आरोग्य, सांस्कृतिक, व्यावसाय, उद्योग अशा सर्व क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. समाजात कुठल्याही बाबतीत नेहमी समर्थक व विरोधक अशा दोन प्रकारच्या प्रवृत्ती किंवा गट पहायला मिळतात. त्यामुळे भ्रष्टाचाराच्याही बाबतीत तसे असणे ओघाने आलेच. अर्थात् कोणाचा काय मार्ग असू शकतो, याचा मात्र नेम नाही ! नुकतीच `दी वीक' या इंग्रजी मासिकाने `देशाविषयी काहीतरी इच्छिणार्‍या नागरिकांना भ्रष्टाचारामुळे प्रतिबंध होतो का ?', याविषयी मते मागवली होती. त्यातील ४८ टक्के नागरिकांनी होकारार्थी उत्तर दिले, तर २९ टक्के नागरिकांनी नकारार्थी उत्तर दिले. २३ टक्के नागरिक कोणतीही भूमिका घेण्यास अपयशी ठरले. येथे होकारार्थी व नकारार्थी उत्तर देणार्‍यांबाबत सांगायचे म्हणजे ते भ्रष्टाचार रोखण्यासाठी कार्यरत आहेत; पण ज्यांची गटवारी देशासाठी काही तरी करू इच्छिणार्‍यांमध्ये आहे, अशांना भ्रष्टाचाराचे भयाण वास्तव दैनंदिन जीवनात अनुभवास येत असतांना, त्याविषयी उत्तर न सांगता येणे, हे लज्जास्पद आहे ! अशांकडून भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन होईल, ही अपेक्षा नाही !

भ्रष्टाचाराच्या समूळ उच्चाटनाचा उपाय !
स्वातंत्र्यानंतर भारतीय राजकारणात स्वार्थी प्रवृत्तींचा शिरकाव झाला. राष्ट्राच्या प्रगतीपेक्षा वैयक्‍तिक हित राजकारण्यांनी जोपासण्यास सुरुवात केली. आज भ्रष्टाचाररूपी राक्षसाची पाळेमुळे अगदी खोलवर रुजली गेली आहेत. देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत श्रीमती इंदिरा गांधी यांनी `भ्रष्टाचार हा जगभर चालतो', असे भ्रष्टाचाराचे समर्थन करणारे विधान केले होते. देशाच्या उच्च नेत्याच्या या विधानामुळेच भ्रष्टाचाराला राजमान्यता मिळाल्यासारखेच झाले. त्यामुळे आता तो शिष्टाचार झाला आहे. त्यामुळे तो बदलण्याचा प्रयत्‍न, तर सोडाच; पण विचारही करणे आज हास्यविनोदाचा विषय बनतो. हे समाजाच्या नैतिकतेचे अध:पतन आहे ! भ्रष्टाचाराच्या समस्येचे समूळ उच्चाटन अशक्य आहे. लाच देणार्‍यांच्या किंवा घेणार्‍यांच्या मनात लाच घेऊ किंवा देऊ नये, असा विचार का येत नाही ? किंबहुना तो आणण्यासाठी काय करू शकतो, याची उत्तरे शोधणे म्हणजे खर्‍या अर्थाने भ्रष्टाचाराच्या निर्मूलनासाठी कार्य केल्यासारखे होईल. यासाठी जनतेची मानसिकता, मनोवृत्ती बदलणे गरजेचे आहे व मनातील विचारांत सकारात्मक बदल करण्यासाठी व्यक्‍ती सत्त्वप्रधान व नैतिकदृष्ट्या बलशाही होणे गरजेचे आहे. ते होण्यासाठी आध्यात्मिक साधनेशिवाय दुसरा पर्याय असूच शकत नाही, हेही तितकेच खरे !

निगडीत वृत्त : लोकहो भ्रष्टाचार रोखा

अमेरिकेतील इंडियन नॅशनल ओव्हरसीज काँग्रेसकडून हिंदुत्ववादी संघटनेवरील खटला मागे ! : 2008-10-13
कनिष्ठ अभियंता आणि लिपिक यांना लाच घेतांना अटक : 2008-10-07
भ्रष्टाचारी लिपीकाला पाठीशी घालणार्‍या तहसीलदारावर कारवाई करा - दीपक सावंत : 2008-07-26
तक्रारी नाहीत, तर शासन पवनचक्क्यांबाबत चौकशी का करत आहे ? - अरविंद सावंत : 2008-07-26
आर्थिक खर्चाचे अहवाल दाबून ठेवून भ्रष्टाचार करू नका - नितीन गडकरी : 2008-07-23
अहमदाबाद येथे लाच स्वीकारणार्‍या तीन आयकर अधिकार्‍यांना अटक : 2008-06-05
अनधिकृत बांधकाम करणार्‍यांना पालिका अधिकारीच पाठीशी घालतात ! - सुभाष सावंत : 2008-03-17
नोयडा भूखंड घोटाळ्याच्या प्रकरणी प्रशासकीय अधिकार्‍यांच्या निवासस्थानांवर धाडी : 2008-01-12
मध्यान्ह आहार योजनेसाठी ४ हजार कोटी रुपये : 2008-01-11
लाचखोर उपनिबंधक व लिपिक यांस अटक : 2007-11-29