कोटी कोटी प्रणाम !
तेजस्वी विचारांनी ओतप्रोत हिंदु धर्मप्रसारक : स्वामी विवेकानंद
इंग्रजांचे वर्चस्व असतांना भारतभूमी व हिंदु धर्म यांच्या उद्धारासाठी अहर्निश चिंता वहाणारी आणि तन, मन, धन व प्राण याच उद्धारकार्यासाठी अर्पण करणारी काही नवरत्ने भारतात होऊन गेली. त्यांपैकी एक दैदिप्यमान रत्न म्हणजे स्वामी विवेकानंद. धर्मप्रवर्तक, तत्त्वचिंतक, विचारवंत व वेदान्तमार्गी राष्ट्रसंत इत्यादी विविध नात्यांनी विवेकानंदांचे नाव सर्व जगात प्रसिद्ध आहे. ऐन तारुण्यात संन्यासाश्रमाची दीक्षा घेऊन हिंदु धर्माचे प्रसारक बनलेल्या तेजस्वी व ध्येयवादी व्यक्तीमत्त्वाची आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त `आंतरराष्ट्रीय युवकदिन' साजरा करण्यात येतो. स्वातंत्र्यानंतर भारतभूमी व हिंदु धर्म यांची झालेली दुरवस्था रोखण्यासाठी आजही स्वामी विवेकानंद यांच्या तेजस्वी विचारांची गरज आहे, याची जाणीव भारतवासीयांना व्हावी, यासाठीच हा लेखप्रपंच !
संकलक -
श्री. चेतन राजहंस,
रामनाथी, गोवा.
स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ. स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकात्यात झाला. बालपणापासून विवेकानंदांच्या वर्तणुकीत दोन गोष्टी प्रकर्षाने दृष्टोत्पत्तीस येऊ लागल्या. त्या म्हणजे ते वृत्तीने श्रद्धाळू व कनवाळू होते व दुसरे म्हणजे ते बालपणात कोणतेही साहसी कृत्य बेधडकपणे करत. स्वामी विवेकानंदांचे संपूर्ण कुटुंब अध्यात्ममार्गी असल्यामुळे बालपणात त्यांच्यावर धर्मविषयक योग्य संस्कार झाले. १८७० (१९७० चूक) साली त्यांना ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या शाळेत पाठवण्यात आले. शाळेत असतांनाच अभ्यासाबरोबर विवेकानंदांनी बलोपासनाही केली बालपणात स्वामी विवेकानंदांमध्ये स्वभाषाभिमान होता, हे दर्शवणारा एक प्रसंग. इंग्रजी शिक्षणाच्या वेळी त्यांनी ``ही गोर्यांची म्हणजे जेत्याची भाषा मी मुळीच शिकणार नाही.'' असे म्हणून सुमारे ७-८ महिने ती भाषा शिकण्याचेच नाकारले. पुढे नाईलाजास्तव ते इंग्रजी शिकले. विवेकानंदांनी मॅट्रिकच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून त्यांच्या कुळाची व शाळेची कीर्तीध्वजा उंचावली. पुढे कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी महाविद्यालयातून त्यांनी `तत्त्वज्ञान' या विषयात एम्.ए. केले.
गुरुभेट व संन्यासदीक्षा
नरेंद्राच्या घरी लहानाचे मोठे झालेले त्यांचे नातेवाईक डॉ. रामचंद्र दत्त हे रामकृष्णांचे भक्त होते. धर्मभावनेने प्रेरित होऊन नरेंद्राच्या मनात लहानपणीच तीव्र वैराग्य उत्पन्न झालेले पाहून डॉ. दत्त एकदा त्यांना म्हणाले, ``भाई, धर्मलाभ हेच जर तुझ्या जीवनाचे उद्दिष्ट असेल, तर तू ब्राह्मोसमाज वगैरेंच्या भानगडीत पडू नकोस. तू दक्षिणेश्वरीला श्रीरामकृष्णांकडे जा.'' एके दिवशी त्यांचे शेजारी श्री. सुरेंद्रनाथ यांच्याकडेच श्री रामकृष्ण परमहंसांचे त्यांना दर्शन झाले. सुरुवातीचे काही दिवस श्री रामकृष्ण नरेंद्रनाथांना आपल्यापासून क्षणभरही दूर ठेवू इच्छित नसत. त्यांना जवळ बसवून अनेक उपदेश करत. ते दोघेच असतांना त्यांची आपापसांत खूप चर्चा होत असे. श्री रामकृष्ण त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या कार्याचा भार नरेंद्रनाथांवर सोपवणार होते. एके दिवशी श्री रामकृष्णांनी एका कागदाच्या कपट्यावर लिहिले, `नरेंद्र लोकशिक्षणाचे कार्य करील.' काहीसे आढेवेढे घेत नरेंद्रनाथ त्यांना म्हणाले, ``हे सारे माझ्याने होणार नाही.'' श्री रामकृष्ण त्यांना लगेच दृढपणे म्हणाले, ``काय ? होणार नाही ? अरे तुझी हाडं हे काम करतील.'' पुढे श्री रामकृष्णांनी नरेंद्रनाथांना संन्यासदीक्षा देऊन त्यांचे नामकरण `स्वामी विवेकानंद' असे केले.
धर्मप्रसाराच्या कार्याला सुरुवात : रामकृष्ण मठाची स्थापना
श्री रामकृष्णांच्या महासमाधीनंतर स्वामी विवेकानंदांनी आपले एक गुरुबंधू तारकनाथ यांच्या मदतीने कोलकात्याजवळील वराहनगर या भागात एक पडक्या इमारतीत मठाची स्थापना केली. तत्पूर्वी त्या जागेत भुतांचा वावर आहे, असा लोकप्रवाद होता. विवेकानंदांनी श्रीरामकृष्णांनी वापरलेल्या वस्तू आणि त्यांच्या भस्मास्थींचा कलश त्या ठिकाणी नेऊन ठेवला आणि त्यांचे भक्त तेथे राहू लागले.
स्वामी विवेकानंद यांनी गाजवलेली सर्वधर्मपरिषद
शिकागोला जाण्याविषयी पूर्वसूचना
एके दिवशी रात्री अर्धवट जागे असतांना स्वामी विवेकानंदांना एक अद्भुत स्वप्न पडले. श्री रामकृष्ण ज्योतिर्मय देह धारण करून समुद्रावरून पुढे जात आहेत व स्वामीजींना आपल्या मागे येण्यास खुणावत आहेत. क्षणार्धात स्वामीजींचे डोळे उघडले. त्यांचे हृदय अवर्णनीय आनंदाने भरून आले. त्याबरोबरच त्यांना `जा', अशी देववाणी सुस्पष्टपणे ऐकू आली. परदेशी जाण्याचा संकल्प दृढ झाला. एकदोन दिवसांतच प्रवासाची सारी तयारी पूर्ण झाली.
धर्मपरिषदेसाठी रवाना
३१ मे १८९३ रोजी `पेनिनशुलर' बोटीने मुंबईचा किनारा सोडला. १५ जुलैला कॅनडातील व्हँकुव्हर बंदरात येऊन स्वामीजी पोहोचले. तेथून आगगाडीने अमेरिकेतील प्रख्यात अशा शिकागो महानगरात आले. आयोजित धर्मपरिषद ११ सप्टेंबर रोजी होणार असल्याचे त्यांना समजले. धर्मपरिषदेत भाग घेण्यासाठी आवश्यक असलेले परिचयपत्र त्यांच्याजवळ नव्हते. त्यात पुन्हा प्रतिनिधी म्हणून नाव नोंदवण्याची मुदतही उलटून गेली होती. परदेशात स्वामीजी जेथे कुठे जात, तेथे त्यांच्याकडे लोक आकृष्ट होत. पहिल्याच दिवशी हार्वर्ड विद्यापीठातील ग्रीक भाषेचे प्रा. जे.एच्. राईट हे स्वामीजींशी चार तास बोलत बसले. स्वामीजींच्या प्रतिभेने व बुद्धीमत्तेने ते इतके मुग्ध झाले की, धर्मपरिषदेत प्रतिनिधी म्हणून प्रवेश मिळवून देण्याची सारी जबाबदारी त्या प्राध्यापकांनी स्वत:वर घेतली.
शिकागो सर्वधर्मपरिषदेत विवेकानंदांचा सहभाग
श्रेष्ठतम अशा हिंदु धर्माची ओळख या सुवर्णभूमीतील सत्पुरुषाने जगाला करून देणे हा दैवी योगच होता. अमेरिकेतील शिकागो येथे ११ सप्टेंबर १८९३ रोजी झालेल्या सर्वधर्मपरिषदेच्या माध्यमातून सार्या जगाला आवाहन करणारे स्वामी विवेकानंद हिंदु धर्माचे खरे प्रतिनिधी ठरले. सोमवार, ११ सप्टेंबर १८९३ रोजी सकाळी धर्मगुरूंच्या मंत्रोच्चारानंतर संगीतमय वातावरणात धर्मपरिषदेचा शुभारंभ झाला. व्यासपीठावर मध्यभागी अमेरिकेतील रोमन कॅथलिक पंथाचे धर्मप्रमुख होते. स्वामी विवेकानंद हे कोणत्याही एका विशिष्ट पंथाचे प्रतिनिधी नव्हते. ते सार्या भारतवर्षातील सनातन हिंदु वैदिक धर्माच्या प्रतिनिधीच्या नात्याने या परिषदेस आले होते. या परिषदेस सहा ते सात हजार स्त्री-पुरुष उपस्थित होते. अध्यक्षांच्या सूचनेनुसार व्यासपीठावरील प्रत्येक प्रतिनिधी आपली अगोदरच तयार केलेली भाषणे वाचून दाखवत होते. स्वामीजींनी आपले भाषण लिहून आणले नव्हते. शेवटी गुरूंचे स्मरण करून स्वामीजी आपल्या जागेवरून उठले. `अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो' या शब्दांनी सुरुवात करून त्यांनी सभेला संबोधित केले. त्यांच्या चैतन्यपूर्ण आणि ओजस्वी वाणीने सारे मंत्रमुग्ध झाले. या शब्दांत अशी काही अद्भुत शक्ती होती की, स्वामीजींनी ते शब्द उच्चारताच हजारो स्त्री-पुरुष आपल्या जागीच उठून उभे राहिले आणि त्यांनी टाळयांचा प्रचंड कडकडाट केला. लोकांचा हर्षध्वनी आणि टाळया थांबता थांबेनात. स्वामीजींच्या त्या भावपूर्ण शब्दांतील जिव्हाळयाने सार्या श्रोत्यांची हृदये स्पंदित झाली. `भगिनींनो आणि बंधूंनो' या शब्दांनी सार्या मानवजातीला आवाहन करणारे स्वामी विवेकानंदच एकमेव वक्ते होते.
``हिंदु समाज पददलित असेल; पण घृणास्पद नाही. तो दीन असेल, दु:खी असेल; पण बहुमूल्य अशा पारमार्थिक संपत्तीचा उत्तराधिकारी आहे. धर्माच्या क्षेत्रात तो जगद्गुरु होऊ शकतो, अशी त्याची योग्यता आहे.'' अशा शब्दांत हिंदु धर्माची महती वर्णन करून अनेक शतकांनंतर स्वामी विवेकानंदांनी हिंदु समाजाला त्याच्या सीमा किती विस्तृत आहेत, हे दाखवून दिले. स्वामीजींनी कोणत्याही धर्माची निंदानालस्ती किंवा टीका केली नाही. कोणत्याही धर्माला त्यांनी क्षुद्र म्हटले नाही. परकीयांकडून देण्यात आलेली घृणास्पद वागणूक व अपमान यांचा चिखल उडालेल्या हिंदु धर्माला त्यांनी तेथून बाजूला काढले आणि त्याच्या मूळ तेजस्वी रूपासह जागतिक सर्वधर्मपरिषदेत सर्वोच्च आसनावर विराजमान केले. या परिषदेत हिंदुस्थानाबद्दल बोलतांना ते म्हणतात, ``हिंदुस्थान ही पुण्यभूमी आहे, कर्तव्यभूमी आहे, हे निखालस सत्य आहे. ज्याला अंतर्दृष्टीचे व आध्यात्मिकतेचे माहेरघर म्हणता येईल, तर ते म्हणजे हिंदुस्थान होय ! प्राचीन काळापासून इथे अनेक धर्मसंस्थापकांचा उदय झाला. त्यांनी परमपवित्र व सनातन अशा आध्यात्मिक सत्याच्या शांतीजलाने लाही-लाही होणार्या जगाला तृप्त केले आहे. जगात परधर्माबद्दलची सहिष्णुता व जिव्हाळा फक्त याच भूमीत अनुभवता येतो.''
प्रवचनांद्वारे प्रसारकार्य
परदेशात भारताचे नाव उज्ज्वल करून कोलकात्यात परतल्यावर नागरिकांनी स्वामीजींचे मोठ्या प्रमाणावर स्वागत केले. `माझ्या मोहिमेची योजना', `भारतीय जीवनात वेदान्त', `आमचे आजचे कर्तव्य', `भारतीय महापुरुष', `भारताचे भवितव्य' यांसारख्या विषयांवर त्यांनी व्याख्याने देण्यास सुरुवात केली. स्वामी विवेकानंद यांनी परदेशी व स्वदेशी दिलेल्या व्याख्यानांतून आपली मते वेळोवेळी ओजपूर्ण भाषेत मांडली. स्वामी विवेकानंदांच्या या विचारांचा फार मोठा परिणाम झाला. परदेशातही त्यांनी वेदान्ताच्या वैश्विक वाणीचा प्रचार केला होता. त्यामुळे आर्यधर्म, आर्यजाती, आर्यभूमी यांना जगामध्ये प्रतिष्ठा लाभली.
`परहितार्थ सर्वस्वाचे समर्पण म्हणजेच खरा संन्यास', हे वचन सार्थ !
भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीबद्दल गाढ अभिमान असला, तरी त्यात शिरलेल्या अनिष्ट रूढी, परंपरा, जातीभेद यांसारख्या हीन गोष्टींवर त्यांनी भाषणांतून कडाडून हल्ला चढवला व निद्रिस्तांना गदागदा हालवून जागे केले. अशा वेळी ते सौदामिनीच्या अभिनिवेशाने समाजातील निष्क्रीयतेवर प्रहार करत आणि आपल्या देशबांधवांना जागे होण्यासाठी कळकळीचे आवाहन करत. निराकार समाधीत मग्न रहाण्याची स्वत:ची स्वाभाविक प्रवृत्ती बाजूला सारून त्यांनी सर्वसामान्य लोकांच्या सुखदु:खाचा ऐहिक पातळीवरही विचार केला आणि त्यांच्यासाठी झटले व `परहितार्थ सर्वस्वाचे समर्पण म्हणजेच खरा संन्यास', हे वचन सार्थ केले.
स्वामी विवेकानंद यांच्या अमेरिकेच्या दौर्यातील काही प्रसंग
१८८४ च्या जुलै महिन्यात स्वामी विवेकानंदजी ग्रीन एकरला गेले. विविध पंथ व अनेक मते असलेल्या लोकांच्या सहवासात दोन आठवडे घालविणे; यात काटेकोर असा कोणताही कार्यक्रम नाही. तर मुक्त संवाद व मोकळेपणाने होणारी चर्चा अशी ग्रीन एकरमधील `समर कँप'ची अभिनव कल्पना होती. ही कल्पना सुचलेले सारा फार्मर यांनी पुढाकार घेऊन हा मेळावा आयोजित केला. शहरी गोंगाटापासून दूर आणि निर्सगाच्या अधिक जवळ जाणारे ते रमणीय स्थान होते. तेथील एका पाईन वृक्षाखाली स्वामीजी बसत आणि श्रोत्यांबरोबर संवाद साधीत असत. त्यांनी तेथे बायबल व कुराणातले विचार सांगितले. वेदांत व अद्वैत तत्त्वज्ञान यांवर ते बोलले. लोकाग्रहास्तव रोज ८ ते ९ तास ते बोलत असत. बौद्धिक थकवा हा शारीरिक थकव्यापेक्षा नेहमीच बलवान असतो. त्यामुळे प्लायमाऊथ येथील एका संमेलनाचे निमंत्रण येताच त्यांनी ते स्वीकारले. तेथून न्यूयॉर्क, अँनिस्क्वॅम करीत मॅग्रोलिया या सागरतटावर असलेल्या छोट्या गावी त्यांनी मुक्काम केला. काही काळ विश्रांति घेऊन ते बॉस्टनला आले. तिथे श्रीमती सारा बुल या स्वामीजींच्या व्यक्तिमत्त्वामुळे भारावून गेलेल्या महिलेकडे त्यांनी मुक्काम केला. तिने त्यांना पाचशे डॉलर्स भेट म्हणून दिले. त्यांनी ते नम्रपणे नाकारले. भारतातल्या सर्व गरिबांचे दारद्र्य दूर होण्याइतके पैसे अमेरिकेतून मिळणार नाहीत, हे त्यांनी केव्हाच ओळखले होते. प्रारंभी अमेरिकेतून भक्कम आर्थिक साहाय्य भारतात पाठविता आले तर पहावे, असा त्यांचा विचार होता. पुढे त्यांनी तो विचार बाजूला ठेवला. अमेरिकेतला पैसा तिथे असलेल्या गरजू लोकांसाठी प्राधान्याने वापरला जावा, हा संन्याससुलभ विचार त्यांच्या मनात आला. अनेक ठिकाणी त्यांनी पैसा स्वीकारायला नकार दिला. याबद्दल एकदा तेच म्हणाले, ``चांगल्या कार्यासाठीसुद्धा संन्याशाने पैसा गोळा करणे योग्य नाही, असे मनूने म्हटले आहे. मोहातून सुटून पुन्हा मायेच्याच पाशात संन्याशाने शिरू नये. म्हणूनच आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी असे जे नियम केले आहेत ते योग्यच आहेत. रहाणे-जेवण व प्रवासावर खर्च होतच असे. पैशाला अनेक वाटा मिळतात. त्यामुळे खूप आग्रह झाल्यावर ते पैसे स्वीकारत असत. तसेच सारा बुलकडूनही अखेरीस ते पाचशे डॉलर्स त्यांनी स्वीकारले. तेथून बॅल्टिमोरला जाऊन ते ब्रुकलीन येथे आले. तेथे त्यांनी वेदान्त व अध्यात्म यावर चार-पाच व्याख्याने दिली. उपनिषदांमधील विचार व त्यावरील स्वामीजींचे विवेचन ऐकून ऐकणारे भारावून जात असत. ब्रुकलीनमध्ये पंडिता रमाबाई सर्कल होते. अशी पंचावन्न सर्कल्स त्या बाईंनी उभी केली होती. मुळात हिंदु ब्राह्मण असलेल्या रमाबाईंनी इंग्लंडमध्ये आपल्या कन्येसह ख्रिस्ती पंथ स्वीकारला. प्रथम मुंबईत व पुढे पुण्यात त्यांनी `शारदा सदन' या नावाने शाळा चालू केल्या. या शाळांमध्ये ख्रिस्ती पंथाचा छुपा प्रचार चालतो, अशी शंका लोकमान्य टिळक यांना आली व पुढे ती खरी ठरली. रमाबाई या हुशार व कर्तबगार होत्या यात शंकाच नाही; पण रमाबाई सर्कल्स उभी करण्यासाठी त्यांनी अमेरिकेत भारतीय स्त्रियांवर होणार्या अत्याचाराचे अतिरंजित व अवास्तव चित्र उभे केले. त्यातून सहानुभूति निर्माण होऊन लोकांनी त्यांना पैसे दिले. या सर्कलच्या ब्रुकलीन येथील अध्यक्षा जेन्स मॅक्कीन या विवेकानंदावर खवळल्या. त्यांनी हिंदु स्त्रियांची भयानक अवस्था `ईगल' या वृत्तपत्रात प्रसिद्ध केली. त्यावरून सर्व हिंदु पुरुष वाईट व त्यांचा धर्म वाईट असे चित्रे उभे करण्याचा प्रयत्न केला. यावर स्वामीजी एका जाहीर भाषणात म्हणाले, ``स्त्रियांच्या दुरवस्थेची उदाहरणे भारताप्रमाणे अन्य ख्रिस्ती देशांतही आढळतात. म्हणून तो पंथच वाईट, असे आम्ही म्हणत नाही. `यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:' हा उदात्त विचार फक्त आमच्या संस्कृतीनेच दिला आहे. काही रूढी या उद्भवलेल्या प्रसंगांतून निर्माण झाल्या, हे खरे आहे. क्वचित् स्त्रिया सती जातात; पण त्यात जबरदस्ती नसते. सती जाऊ इच्छिणार्या स्त्रीच्या हातावर प्रथम एक फुललेला निखारा ठेवला जातो. वेदनेचा स्वर वा पिळवटलेला चेहरा दिसला तर अशा स्त्रीला सती जाऊ देत नाहीत. यातही क्वचितच कुठे गैरप्रकार होत असेल तर ती मानवी दुर्बलता आहे. सती जाणार्या स्त्रीच्या पायावर सर्व जण डोके टेकतात. तिच्या स्मृत्यर्थ्य समाधि बांधली जाते. यात नम्र भाव असतो. अमेरिकेत व युरोपात लक्षावधी स्त्रियांना चेटक्या ठरवून जिवंत जाळले गेले. त्याबद्दल कोणीच काही बोलत नाही. मूर्तिपूजकांना सर्रास चेटके ठरविण्यात आले. दहा स्त्रियांमागे एका पुरुषाला जाळले जात असे. हे सर्व चर्चच्या पाठिंब्यावर चालत होते. दगड मारून वा यातना देऊन रक्तबंबाळ झालेली स्त्री जळतांना ओरडू नये म्हणून तिच्या तोंडात लाकडाचा तुकडा ठेवला जात असे. ती मरतांना भोवताली असणारे हसत व नाचत असत. याला क्रौर्याशिवाय दुसरे काय म्हणता येईल ? पण म्हणून ख्रिस्ती पंथ वाईट आहे, अघोरी आहे असे मी म्हणत नाही. भारताने जगाला वैद्यक, गणित, ज्योतिष, संगीत, महाकाव्य, व्याकरण व सर्वात महत्त्वाचे म्हणजे धर्म व अध्यात्म दिले. ही सर्व प्रगति येशू व बुद्ध यांच्यापूर्वीच झाली हे लक्षात ठेवा.'' सतीबद्दल स्वामीजी जे सांगत होते तसेच अनुभव एल्फिन्स्टनसारख्या इंग्रजानेसुद्धा दिले आहेत. आता मॅक्कीनबाईंनी बालविधवा व स्वामीजींची निंदा यावरच लक्ष केंद्रित केले. व्यक्तिगत निंदेला स्वामीजी उत्तर देत नसत. हॉजेन्ससारखा विद्वान मॅक्कीनना उत्तर द्यायला पुढे सरसावला. त्यांनी `ईगल'बरोबर अन्य वृत्तपत्रांतून लेख लिहिले. भारत व भारतीयांचे श्रेष्ठत्व यावर लिहितांना त्यांनी मॅक्समुल्लर, थॉमस मन्रो, सॅम्युअल जॉन्सन व एल्फिन्स्टन आदींचे उद्गार उद्धृत केले. त्यांच्या ग्रंथातली अवतरणे दिली. स्वामीजी ख्रिस्ती पंथाच्या विरोधात नाहीत, याची त्यांना जाणीव होती. मात्र स्वामीजींच्या देश व धर्माबद्दल कोणी निंदा केली, तर ते खवळतात आणि ते स्वाभाविकही होते, असे डॉक्टर जेन्ससारख्या कित्येक उदारमतवाद्यांचे मत होते. अखेर मॅक्कीनबाईंनी स्वामीजींवर टीकाप्रहार करणे बंद केले. ब्रुकलीनहून स्वामीजी न्यूयॉर्कला आले. तिथे त्यांनी वेदान्ताचे वर्ग घेतले. या वर्गांना खूप गर्दी होत असे. वर्गांसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. स्वेच्छेने स्वीकारली जाणारी रक्कम स्वीकारली जात असे. पैसे कमी पडू लागले की, स्वामीजी एखादे सार्वजनिक भाषण करत असत. दिवसभर व्याख्याने, शंकासमाधान, विविध ग्रथांचे वाचन व लेखन यामध्येच वेळ जात असे. प्रकृतीकडे लक्ष द्यायलासुद्धा त्यांच्याकडे वेळ नव्हता. परिणामी ते आजारी पडले. न्यूयॉर्कपासून सव्वाशे किलोमीटर अंतरावर लेगेट यांचे `रिजले मॅनॉर' हे घर होते. गजबजाटापासून दूर व शांत असलेले ते स्थान स्वामीजींना आवडले. त्यांनी त्या ठिकाणी काही दिवस विश्रांति घेतली. न्यूयॉर्कच्या उत्तरेला सेंट लॉरेन्स नदीत अनेक छोटी बेटे होती. `त्यांना आयलंड पार्क', `सहस्रद्वीप उद्यान' म्हटले जात असे. वेदान्ताच्या न्यूयार्कमधील वर्गाला येणार्या कु. डचर यांची तेथे प्रशस्त वास्तु होती. डोंगर, झाडी व सभोवती पाणी असे ते रम्य ठिकाण होते. त्या ठिकाणी स्वामीजी पावणेदोन महिने राहिले. तेथील वर्गात बारा-पंधरा जिज्ञासु तरुण व तरुणी होते. सकाळी व दुपारी वर्ग चालत असत. त्या वर्गांत बायबल, नारद भक्तिसूत्रे, उपनिषदे, भगवद्गीता, भक्तिमार्ग, अवतार, श्री रामकृष्ण, शारदामाता आदि अनेक विषयांवर स्वामीजी बोलत असत. एका पावसाळी रात्री कोणीतरी दार ठोठावले. कु. डचरने दार उघडले. दारात दोन स्त्रिया पूर्ण भिजलेल्या अवस्थेत होत्या. त्या दोघी डेट्रॉईटहून आल्या होत्या. डचरने दोघींना आत घेतले. एवढे होईपर्यंत स्वामीजी वरच्या खोलीतून खाली आले. त्यांना पहाताच एक जण म्हणाली, ``पृथ्वीच्या पाठीवर आज येशू िख्र्तास् असता तर त्याला जे आम्ही म्हटले असते तेच तुम्हाला सांगतो. आम्हाला उपदेश करा. त्यासाठीच आम्ही येथे आलो आहोत.'' स्वामीजी हसून म्हणाले, ``तुम्हाला मोक्ष देण्याचे सामर्थ्य असते, तर किती बरे झाले असते!'' मेरी फंकी व ख्रिस्तीन ग्रीनस्टीडेल या दोन विद्यार्थिनी दुसर्या दिवसापासून नियमितपणे वर्गात येऊ लागल्या. वर्गातल्या काही जणांना स्वामीजींना दीक्षा दिली. यात मेरी व िख्र्चाश्नचासुद्धा समावेश होता. या वर्गाव्यतिरिक्त भारतात पत्रे पाठविणे, ग्रंथलेखन व वाचन यातच स्वामीजींचा वेळ जात असे. क्वचित् कधी त्यांना स्वयंपाक करायची लहर येत असे. भरपूर मसाला घालून त्यांनी केलेले पदार्थ झणझणीत असत; पण अध्यात्मावर बोलणारा हा भगव्या कपड्यांतला साधु आपल्यासाठी पाकसिद्धि करतो आहे, हीच गोष्ट शिष्यांसाठी अपूर्व वाटणारी होती. त्यामुळे त्यांच्या हातचे पदार्थ तिखट असले, तरी हाशहुश करीत सर्व जण त्यावर ताव मारीत. अशा वेळी स्वामीजी सर्वांबरोबर अगदी खेळमळीने व बरोबरीच्या नात्याने वागत असत.
(श्री. सच्चिदानंद शेवडे यांचा आगामी ग्रंथ `नरेंद्र ते विवेकानंद' यामधून साभार)
विवेकानंद व्हावेसे वाटते का ?
संकलक : श्री. संजय हरिश्चंद्र देशमुख, पनवेल
``दांभिकता, धर्मांधता आणि लबाडी यांच्या मी अगदी विरुद्ध आहे. अनैतिक विचारांना किंवा दुष्कृत्यांना जराही स्थान देऊ नका. माझ्या शूर पुत्रांनो, पुढेच चला. लक्ष्मीसह किंवा लक्ष्मीशिवाय, सहकार्यांबरोबर किंवा त्यांच्याशिवाय. तुमच्याजवळ प्रेम आहे ना ? तुमच्याजवळ परमेश्वर आहे ना ? मग, तुम्ही सर्वशक्तिमान आहात. बढते रहो ! कार्याची सर्व जबाबदारी तुमच्या शिरावर आहे, असे समजून काम करा. काळ मोठ्या आशेने तुमच्याकडे बघत आहे. भारताचे भवितव्य तुमच्याच हाती आहे. तुमचं सर्वस्व या कार्यात ओता. बाष्कळ बडबड आणि सण-समारंभ करण्याचे हे दिवस नाहीत. माझ्या मुलांनो, आता कामाला लागा.'' ही अपेक्षा आहे स्वामी विवेकानंद यांची. सध्याच्या तरुणांनाही त्यांचे हे आवाहन आजही स्फूर्ति देणारे, दिशा देणारे आहे. स्वामी विवेकानंद यांनी अगदी तरुण वयातच हिंदु धर्म व देश यांसाठी केलेले कार्य आजच्या तरुणांना आदर्श असेच आहे. मात्र आजची परिस्थिति पहाता, हा आदर्श कोणत्या तरुणाला आपल्यापुढे ठेवावासा वाटतो ?, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी सर्वेक्षण करण्याची आवश्यकता नाही. आजचा तरुण पाहिला, तर त्याच्यापुढे आदर्श आहे, तो आपल्या गाडीखाली गरिबांना चिरडणारा व ऐश्वर्या रायला छळून दाऊदच्या आशीर्वादाने चित्रपटसृष्टीत सहज काम व नाव मिळवणारा सलमान खान व असेच अन्य सिनेअभिनेते, सतत जाहिरातीतून झळकणारा सचिन तेंडुलकर व इतर क्रिकेटपटू, गुंड, राजकारणी यांचा. मध्यंतरी ह्रतिक रोशन याची छायाचित्रे असलेल्या वह्यांची विक्री धडाक्याने होत असल्याबद्दल अनेक शिक्षणतज्ञांनी चिंता व्यक्त केली होती व काहींनी पालकांना अशा वह्या खरेदी न करण्याचे आवाहन केले होते. आजचा पालक सुजाण व जागरूक असल्याचे शिक्षणतज्ञांचे मत आहे. मात्र त्या वेळी याच `सुजाण' पालकांनी वरील चिंता करणार्या शिक्षणतज्ञांच्या आवाहनाला पाने पुसली. समाजाच्या याच उदासीनतेमुळे ३१ डिसेंबर कसा साजरा करायचा, मित्र-मैत्रिणींना वाढदिवसाची पार्टी कशी द्यायची, भेट काय द्यायची, डिस्को-पबमध्ये कोणाला घेऊन जायचे, असे व अशा अनेक गोष्टी हीच आजच्या तरुणांची दैनंदिनी असते. याच्या मुळाशी जाण्यासाठी आजच्या पालकांची मानसिकताही बघायला हवी. जवळजवळ प्रत्येक पालकालाच आपल्या मुलाने डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावे, असे वाटते. सध्या झपाट्याने बदलत चाललेल्या युगात आता अनेक `सुजाण' पालक आपल्या मुलांत रात्रंदिवस सचिन तेंडुलकर, मिलिंद सोमण, तर आपल्या मुलींमध्ये ऐश्वर्या राय बघत असतात. आपल्या घरात सिनेगिते गाणारे गायक, हिंदी चित्रपटातील अभिनेते, जाहिरातीतून झळकण्यासाठी मॉडेल एवढेच काय मिस इंडिया, मिस युनिव्हर्स व मिस वर्ल्ड निपजावेत, अशी कामना करणार्या माता कमी नाहीत. किती पालकांना आपल्या पाल्याने संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, स्वामी विवेकानंद, गांधीजी यांचा आदर्श समोर ठेवून तसे व्हावेसे वाटले, तर चालणार आहे ? क्रमिक पाठ्यपुस्तकातच काय ती या आदर्श पुरुषांची चित्रे आजच्या पिढीला दिसतात. (तीही निधर्मीवादाचे पुरस्कर्ते काढून टाकण्याच्या मागे लागले आहेत.) छत्रपति शिवाजी महाराजांबद्दल आदर आहे, असे सांगणार्या किती जणांना आपल्या मुलाने सध्या चाललेल्या मोगलाईच्या विरोधात बंड पुकारावयास हवे असे वाटते. किती जणांना आपल्या मुलाने भगतसिंह, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारखे अन्यायकारी राजवट संपवण्यासाठी क्रांतीचे रणशिंग फुंकायला हवे असे वाटते. याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला, तर आज अशी स्थिति आहे की, आपल्याच काय पण शेजारच्या घरातही असे कोणी होणे नको. अशा उच्च आदर्शांची ओळख करून द्यायलाही पालक घाबरतात, इतकी स्वार्थी मनोवृत्ति झालेली आहे. देव, संत यांची छायाचित्रे, संस्कारानुसार नमस्कार करणे, देवळे व संतांचे मठ यांसारखी आध्यात्मिक ठिकाणे ही मन:शांतीसाठी व आपले इप्सित साध्य करण्यासाठी त्यांच्यापुढे मान तुकवणार्या भाविकांसाठी असतात, अशीच आजची परिस्थिति आहे. भोगवादाकडे जाणार्या संस्कृतीचा पुरस्कार करणार्या आजच्या समाजाला शाळा व महाविद्यालये यांतून नीतिमत्तेचा आदर्श पाठ घालून देण्याची क्षमता असणारे हिंदु धर्मानुसार शिक्षण द्यायला हवे. मात्र असे करण्यास विरोध करणार्या व सातत्याने जातीयवादाचा पुरस्कार करून स्वत:ला निधर्मीवादी म्हणवून घेतांना जात्यंध शिक्षणप्रणाली राबवू इच्छिणार्या निधर्मीवादी राजकारण्यांच्या हेतुचाही आज विचार करायला हवा. स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करतांना त्यांच्या तसबिरीपुढे, पुतळयापुढे मान तुकवतांना त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काय करायची आपली तयारी आहे, याची आपल्या मनाशी उजळणी करून आज प्रामाणिकपणे सत्याला सामोरे जायला हवे. नुसताच स्वामी विवेकानंदांच्या छायाचित्रांना हार घालून काही होणार नाही. त्यांना हवे ते देशासाठी अर्पण करण्याची तयारी तरुणांनी दाखवायला हवी. ज्यांच्याकडे अशी आदर्श पिढी घडवण्याची क्षमता आहे, त्यांना पुढे आणायला हवे. विवेकानंदांना हवा होता `क्रांति घडवण्याच्या प्रखर जिद्दीने पेटलेला, धगधगता अग्निकुंड स्वत:मध्ये प्रज्वलित असणारा देशभक्त तरुण. ज्यांच्या नुसत्या सहवासानेही, बोलण्यानेही त्यांच्या सभोवतालचे शेकडो जण धगधगते निखारे बनून क्रांतिकुंडात समर्पण करण्यास तयार व्हावेत.' यासाठी त्यांनी सांगितलेला मार्ग आचारणात आणावयास हवा. तो म्हणजे ``कर्म आणि भक्तीतून स्वत:ला पवित्र बनवा, भारताने आतापर्यंत फार सोसले आहे. सनातन धर्माला फार हाल सहन करावे लागले आहेत. श्रीरामकृष्णांच्या पायाशी बसल्यानेच भारताची उन्नति साधेल. त्यांचे जीवन आणि त्यांची शिकवण यांचा संपूर्ण देशभर प्रसार करायला हवा. हिंदु समाजातील प्रत्येक थरापर्यंत तो पोहोचायला हवा.''
परमेश्वराची मदत सर्वात मोठी !
``ही स्थिति अत्यंत निराशाजनक आहे, त्यात शंकाच नाही; पण त्याची मला थोडक्यात कल्पना द्या. या मरतमढ्यात तुम्ही प्राण फुंकू शकणार आहात का ? याची सारी नीति लयाला गेली आहे. याला काही भवितव्यच उरलेले नाही आणि जो याचे भले करेल त्याची मानगूट धरायलाही हा मागेपुढे पहात नाही. पाय रोवून खंबीरपणे उभे रहा. सत्याचाच नेहमी विजय होतो. काय होईल हे बघायला आपण असू किंवा नसू; पण आज ना उद्या हे घडणारच. आपल्या देशाच्या धमन्यांमधून आता उत्साहाचे वारे वाहू द्या. काम करणे एवढेच आपल्या हाती आणि मुख्य म्हणजे स्वत:शी प्रामाणिक रहा. दृढमूल आणि प्रामाणिक रहा. मग सारं काही ठीक होईल. अशा प्रकारचे शंभर युवक जरी देशाच्या विविध भागांत मी पाठवू शकलो, तर कार्यपूर्तीच्या समाधानाने मी सुखाने मरू शकेन. आपण कुणाची मदत मागणार नाही आणि मिळाली, तर अव्हेरणारही नाही. आपण त्या सर्वश्रेष्ठ शक्तीचे गुलाम आहोत. क्षुद्र लोकांनी आणलेल्या अडथळयांकडे साफ दुर्लक्ष करा. पुढे चला ! युगानुयुगांच्या लढ्यांमधून चारित्र्य घडत असते. हिंमत हरू नका. सत्याचा एक शब्दसुद्धा कुणी दडपून टाकू शकणार नाही. आज ना उद्या त्याचे दर्शन होईलच. सत्य अविनाशी आहे, सद्गुण अविनाशी आहेत, पावित्र्यही शाश्वत आहे. वत्सा, मला एक सच्चा माणूस द्या. कोणी तुम्हाला मदत करतो कि नाही याची पर्वा करू नका. कुठल्याही मानवी मदतीपेक्षा परमेश्वर मोठा नाही काय ?'' - स्वामी विवेकानंद
समर्पित युवक हवेत ! - स्वामी विवेकानंद
संकलक : मंदार मांजरेकर, ठाणे.
माणसे हवीत ! सुदृढ, उत्साही, श्रद्धावान आणि समर्पित माणसे हवीत !
माझा युवा पिढीवर फार विश्वास आहे. या युवकांमधूनच मला हवी असलेली माणसे मिळतील. सिंहाच्या हृदयाची ही माणसे सर्व प्रश्नांवर उत्तरे शोधून काढतील. मी ध्येय निश्चित केले आहे आणि त्याला जीवन वाहिले आहे. जर माझ्या आयुष्यात मला यश मिळाले नाही, तर माझ्याहून श्रेष्ठ कोणीतरी पुढे येईल आणि माझे कार्य यशस्वी करून दाखवील. मी अंत:करणपूर्वक परिस्थितीशी घेतलेली झुंज, हेच माझे श्रेय आहे. तुमच्यात सर्व शक्ति वास करत आहे. अशी श्रद्धा तुमच्यापैकी प्रत्येकाच्या मनात जागी होऊ दे ! मग तुम्ही सर्व हिंदुस्थान चैतन्याने भारून टाकाल आणि त्यानंतर बंधूंनो, जगातील सर्व राष्ट्रांमध्ये जाल आणि त्या त्या राष्ट्रांच्या घडणीमध्ये हिंदु तत्त्वांचे फार मोठे योगदान कराल ! हिंदुस्थानातील आणि अन्यत्र असलेल्या प्रत्येक वंशाचे चैतन्य आपण जागविले पाहिजे. यासाठी मला युवक हवे आहेत ! जे सुकुमार आहे; शक्तिपूर्ण, आरोग्यपूर्ण आणि कुशाग्र बुद्धियुक्त आहे, तेच परमेश्वराजळ जाते असे वेदवचन आहे. म्हणून उठा ! स्वत:चे भवितव्य ठरविण्याचा क्षण हाच आहे. जोपर्यंत तुम्हामध्ये तारुण्याची तडफ आहे, जोवर तुम्ही थकले- भागलेले, फिटलेले, गळालेले असे झालेला नाहीत. उलट तारुण्याच्या उत्साहाने आणि टवटवीने मुसमुसलेले आहात तोपर्यंतच निश्चिय करा ! उठा, काम करा ! नुकतेच उमलेले, न हाताळलेले, वास न घेतलेले पुण्यच ईश्वराच्या चरणी अर्पण करायचे असते ! हीच शुभ घडी आहे. म्हणून श्रेष्ठ आदर्श डोळयासमोर ठेवा आणि त्यासाठी सर्वस्व समर्पण करा. हाच दृढ निश्चय होऊ दे ! सुजनांच्या रक्षणासाठी जो पुन: पुन: अवतार धारण करता झाला, तो भगवान् श्रीकृष्ण आपल्याला आशीर्वाद देवो. आपली ईप्सिते पूर्ण करो.
उत्तिष्ठत ! जाग्रत ! प्राप्य वरान् निबोधत !
उठा ! जागे व्हा ! आणि आपली ध्येयसिद्धि झाल्याविना थांबू नका ! (`हिंदुतेजा, जाग रे!' या पुस्तकात स्वामी विवेकानंद यांनी युवकांना उद्देशून वरील मार्गदर्शन केले आहे.)
राष्ट्र धर्माधिष्ठित जीवनप्रणाली स्वीकारलेले पाहिजे - स्वामी विवेकानंद
`तरुणांनो, जर हे राष्ट्र जिवंत रहावं अशी आपली धडपड असेल, तर हे राष्ट्र पूर्णपणे हिंदुधर्मधिष्ठीत जीवनप्रणाली स्वीकारलेली असले पाहिजे.' तरुणांनो माझा भार, माझा विश्वास तुमच्यावर आहे. भावनाशील युवकांनो, माझा कार्यभार तुम्ही उचला, वीर व्हा, श्रद्धासंपन्न व्हा, चारित्र्याचं तेज आणि वीर्य जागृत करून उत्साहानं कार्यप्रवृत्त व्हा. माझं कार्य माझ्या कल्पनेला मागं टाकून पुढे जावं, मी केवळ एक निमित्त झालो आहे. तुम्ही ते पूर्ण करा, पण त्यासाठी.... कुठलंही मोठं काम करण्यासाठी पहिली आणि सर्वात मोठी गरज असते ती बळशाली संघटनेची. आपली अशी एक संघटना स्थापन व्हावी अशी माझी कल्पना आहे. `हिंदुधर्मतत्त्वांचा प्रसार आणि सेवाकार्य' हाच तिचा प्रमुख उद्देश असेल. शौर्य आणि धैर्य हीच तुमची संपत्ति आहे; म्हणून तुम्ही काय केवळ स्वत:साठीच जगावं ? जगाच्या-समाजाच्या कल्याणासाठीही त्याग करायला तुम्हीच पुढं आलं पाहिजे.
धर्मच खरा राष्ट्राचा आधार !
धर्मच खरा राष्ट्राचा आधार, धर्म बाजूला सारला तर जगायचे कशाच्या जीवावर ? धर्म म्हणजे समाजकल्याण, धर्म म्हणजे सामाजिक बांधीलकी, धर्म म्हणजे समाज नियंत्रण, धर्म म्हणजे एका विशाल परिवारात प्रेम आणि आपुलकीने राहण्याची हमी, धर्म म्हणजे आत्मविकास, समाजविकास आणि राष्ट्राचा उत्कर्ष करण्याचा परवाना. या हिंदुधर्माची धर्मतत्वे म्हणजे केवळ कोरडे कर्मकांड आणि विधीनिषेधाची खिचडी नको. आम्हाला आमची संस्कृति आहे, धर्म आहे, आचार-विचारदेखील आहेत. फक्त आज जे दिसतयं ते त्याची विकृत बाजू. ही बाजू बदलण्यासाठी खर्याखुर्या अभ्यासाची आवश्यकता आहे. नुसताच अभ्यास नाहीत, तर तसा आचार समाजाला शिकवायला हवा. अर्थात् हे काम सोपे नाही. तर त्याच्यासाठी सर्व समर्पित अशा तरुणांची बळकट संघटना हवी. - संकलक : कु. अमित अनंत कडत, भाणसोळी, कर्जत.
स्वामी विवेकानंद यांची शिकवण
बालमित्रांनो, तुम्हाला स्वामी विवेकानंद माहीत असतीलच. ते रामकृष्ण परमहंस यांचे परमशिष्य होते. अध्यात्माची ध्वजा दाही दिशांना फडकवीत त्यांनी आयुष्यभर अध्यात्मप्रसार केला. परदेशातदेखील त्यांच्या प्रवचनांना प्रचंड गर्दी होत असे. अमेरिकन जनतेला तर त्यांच्या वाणीने वेड लावले होते. एकदा एक गृहस्थ त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, ``महाराज, मला वाचवा. माझ्यातील दुर्गुणांमुळे माझे जगणे नरकमय झालेले आहे. कितीही प्रयत्न केले तरी वाईट सवयी काही सुटत नाहीत. त्यासाठी मला काहीतरी उपाय सांगा.'' अशी विनवणी करीत ते गृहस्थ रडू लागले. त्या गृहस्थांशी काहीही न बोलता विवेकानंदांनी आपल्या एका शिष्याला बोलावून त्याच्या कानात काहीतरी सांगितले. थोड्या वेळाने त्या गृहस्थांना घेऊन ते बागेत फिरायला गेले. वाटेत पहातात तर काय, एक शिष्य एका झाडाला मिठी मारून बसला आहे व सारखा `अरे, मला सोड, मला सोड', असे म्हणून झाडाला लाथा मारत आहे. झाडाला तर त्यानेच धरून ठेवले होते. हे पाहून ते गृहस्थ हसू लागले व म्हणाले, ``महाराज, काय वेडा माणूस आहे. स्वत:च झाडाला धरले आहे आणि वर `मला सोड, मला सोड', असे म्हणत आहे. मला तर तो वेडाच वाटतो.'' विवेकानंद हसले व म्हणाले, ``तुमची अवस्था पण तशीच आहे, असे तुम्हाला वाटत नाही का ? दुर्गुणांना तुम्हीच धरून ठेवले आहे आणि ते सुटत नाहीत म्हणून तुम्ही ओरड करता.'' हे ऐकून ते गृहस्थ थोडे ओशाळले. थोडे पुढे चालून गेल्यावर एक माळी झाडांना खत घालीत असलेला दिसला. खताला दुर्गंध येत होता. त्या गृहस्थांनी नाकाला रुमाल लावला. विवेकानंद हसले. थोडे पुढे गेले. अनेक झाडांवर वेगवेगळी फुले उमललेली होती. त्यांचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. ते गृहस्थ श्वास भरभरून सुगंध घेऊ लागले. त्यांचे मन प्रसन्न झाले. विवेकानंद अजूनही स्मित हास्य करीत होते. त्या गृहस्थांना थोडे आश्चर्यच वाटले. `हा माणूस वेडा तर नाही ना ? मी केवढी गंभीर समस्या घेऊन आलो आहे आणि हा तर हसतो आहे. आपली थट्टा तर करीत नाही ना ?' असा विचार त्यांच्या मनात आला. शेवटी त्यांनी विवेकानंदांना विचारले, ``महाराज, आपण का हसत आहात ? माझे काही चुकले का ?'' विवेकानंद म्हणाले, ``या वनस्पती, फुलेझाडे मानवाच्या दृष्टीने कितीतरी अप्रगत, मागासलेली आहेत; पण तीदेखील मिळणार्या खताच्या दुर्गंधीचे रूपांतर सुगंधात करतात. सर्वांना तो सुगंध वाटतात अगदी काहीही हातचे राखून न ठेवता! पण एवढ्या प्रगल्भ बुद्धीचा विकसित मानव मात्र आपल्या दुर्गुणांचे सद्गुणात रूपांतर करू शकत नाही. ही फुले कोणत्याही परिस्थितीत, डोलतांना, हसतांना, अगदी खुडून घेतली तरीही सुगंध पसरवितात. आपला गुणधर्म सोडत नाहीत; पण माणूस मात्र जराशा झुळकीसरशी दोलायमान होतो.'' हे ऐकून ते गृहस्थ वरमले. त्यांना आपली चूक कळली. ते समाधानाने तेथून बाहेर पडले. बालमित्रांनो, आपल्यालाही आपल्यातले दुर्गुण नाहीसे करायचे असतील, तर त्या माणसाने जसे आपणहूनच झाड सोडणे आवश्यक होते, तसे आपले दुर्गुण आपणच सोडायला हवेत. भगवंताच्या नामाने आपली वृत्ति आंतरबाह्य बदलते. विवेकानंदांनी दाखवून दिल्याप्रमाणे आपणही सुगंध पसरविणार्या फुलांप्रमाणे आपल्या दुर्गुणांचे सद्गुणांत रूपांतर करू शकतो. स्वामी विवेकानंदांनी स्वत: साधना केली होती व म्हणूनच ते त्या गृहस्थांचे दु:ख दूर करू शकले. आपल्या प्रखर साधनेमुळेच मरगळलेल्या समाजाला दिशा देऊ शकले. आजही कन्याकुमारी येथे असलेले स्वामी विवेकानंदांचे स्मारक त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाची ग्वाही देते. - डॉ. (सौ.) मीता पाटील, इचलकरंजी सत्संग.
विवेकानंदांचे विचारधन - `हिंदुधर्म' हाच जगातला सर्वश्रेष्ठ धर्म !
स्वामी विवेकानंद जेव्हा शिकागोला गेले आणि ११ सप्टेंबरला धर्म परिषदेत उभे राहिले, काहीही माहिती नाही, समितीचा पत्ता नाही, जाण्याची व्यवस्था नाही, तरीही ते कसेतरी गेले. परमात्म्याला एखाद्याकडून कार्य करवून घ्यायचे असतांना तो असे लौकिकातील अडथळे बाजूला टाकतो आणि विचारवंत साधकास आपल्या ध्येयापर्यंत जाऊन पोहोचवतो. इतिहास हा पुराणामध्ये आहे. त्याच्या मागे वेदांमध्ये आहे. वेद भौतिक आहेत. ज्ञान सर्वांपरी उपनिषदांत आहे आणि ते उपनिषदे मांडणारे विवेकानंद जगाने गौरवले आहेत, म्हणून `हिंदुधर्म' जगातला सर्वश्रेष्ठ धर्म आहे, असे सप्टेंबर १८९३ मध्ये अमेरिकेच्या शिकागो येथील धर्म परिषदेत मानले.
हिंदूंनो, धर्म सोडला, तर तीन पिढ्यांतच नष्ट होऊनजाल !
हिंदूनो, हे नीट लक्षात ठेवा की, तुम्ही जर धर्म सोडून देऊन, जडालाच सर्वस्व मानणार्या पाश्चात्य सभ्यतेच्या मागे धावला, तर तीन पिढ्यांतच तुम्ही नष्ट होऊन जाल. हिंदूंनी धर्म सोडला की, हिंदूजातीच्या जीवनाचा कणाच मोडला म्हणून समजा. ज्या पायावर या जातीचा सुविशाल प्रसाद उभारला गेला आहे तो पायाच भग्न झाला, असे समजा आणि याचा परिणाम म्हणजे संपूर्ण सर्वांगीण ध्वंस. - स्वामी विवेकानंद
(`स्वामी विवेकानंद - राष्ट्राला आवाहन' या ग्रंथातून)
हिंदूंच्या अशा अतिसहिष्णू वृत्तीमुळे आज आपल्याच देशात हिंदू अल्पसंख्यांक होत आहेत.
`खबरदार ! हिंदु धर्मावर टीका कराल, तर समुद्रात फेकून देईन !' अशी गर्जना करणार्या स्वामी विवेकानंदांनी असा विचार कधीच केला नाही.
धर्मांतराच्या संदर्भात स्वामी विवेकानंदांचे विचार
स्वामी विवेकानंद यांनी तर धर्मांतरणावर कठोर टीका करतांना एकदा म्हटले, ``हिंदु समाजातून एक व्यक्ती मुसलमान किंवा ख्रिश्चन बनली, याचा अर्थ असा नाही की, एक हिंदु कमी झाला, याउलट हिंदु समाजाचा एक शत्रू वाढला.''
जन्महिंदूंनो, हिंदु धर्माचे महत्त्व जाणून घ्या !
जेव्हा कोणी मनुष्य आपल्या पूर्वजांविषयी लज्जित होऊ लागतो, तेव्हा समजावे की, त्याचा शेवट जवळ आला आहे. जरी मी हिंदु जातीचा एक नगण्य घटक आहे, तरी मला आपल्या जातीचा व पूर्वजांचा अभिमान आहे. ज्या लोकांनी हिंदुधर्म सोडून अन्य धर्म स्वीकारला आहे, त्यांना पुन्हा हिंदुधर्मात अवश्य आणले पाहिजे. जर आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष केले, तर आपली संख्या उत्तरोत्तर घटत जाईल; म्हणून हे आवश्यकच आहे. मी आधुनिक सुधारकांना सांगू इच्छितो की, त्यांनी इकडे-तिकडे भटकण्याची आवश्यकता नाही. उलट आपल्या पूर्वजांनी समग्र मानवजातीच्या उन्नतीसाठी ज्या सर्वांगसुंदर रचना दिलेल्या आहेत, त्यांचा अवलंब करून त्यांचे उद्दिष्ट सतत सृष्टीत परिणत केले पाहिजे. माझे तुम्हाला आवाहन आहे की, मनुष्य जातीच्या एकत्व आणि ईश्वरत्वाच्या वेदान्तिक आदर्शाच्या अधिकाधिक जवळ पोहोचण्यासाठी कार्य करा. मला अशा एका देशाची व्यक्ति होण्याचा अभिमान आहे, ज्याने या पृथ्वीवरील समस्त पीडित आणि शरणागत जाती तसेच निरनिराळया धर्मांतील बहिष्कृत पंथीयांना आश्रय दिला आहे. तरुणांना एकत्र आणा आणि संघटित करा ! महान त्यागानेच महान कार्य संभव आहे. माझ्या वीर, श्रेष्ठ, उदात्त बंधूंनो, आपले खांदे कार्यचक्राला लावून टाका. कार्यचक्राला जोडून घ्या. थांबू नका, मागे पाहू नका. नावासाठी ना यशासाठी, वैयक्तिक अहंकार फेकून द्या आणि कार्य करा ! - स्वामी विवेकानंद (पाथेय कण, जानेवारी २००५)
चैतन्यमय भारताची जगाला आवश्यकता - स्वामी विवेकानंद
प्रत्येक व्यक्तीमध्ये एक प्राणभूत तत्त्व असते. बाह्यत: दिसणारा माणूस हा त्या प्राणभूत तत्त्वाची अभिव्यक्ति असतो. जणू त्याच्या रूपाने, त्याच्या भाषेत ते अमूर्त तत्त्व व्यक्त होत असते. तसेच प्रत्येक राष्ट्रालासुद्धा एक प्राणभूत तत्त्व असते. ज्या वेळी त्या प्राणभूत तत्त्वाची जगाला असलेली आवश्यकता संपेल, त्या वेळी त्या राष्ट्राचे अस्तित्वही संपेल. अंतर्बाह्य दु:ख, दारिद्र्य, अत्याचार यांनी भारत पिडलेला असूनसुद्धा अजूनही तो चैतन्यमय, जिवंत आहे. याचे कारण म्हणजे भारतातील प्राणभूत तत्त्वाची अद्याप जगाला आवश्यकता आहे!
जहाल, बुद्धिमान आणि धडाडीचे तरुण हवेत ! - स्वामी विवेकानंद
``आपल्याला काही अनुयायी हवेत जहाल, तरुण, बुद्धिमान आणि धडाडीचे. मृत्यूच्या जबड्यात जायला न कचरणारे आणि सागरसुद्धा पोहून जाण्याची जिगर असलेले, असे शेकडो तरुण, तरुणी आपल्याला पाहिजेत. मग या समाजालाच काय पण या विश्वासालाही आश्चर्यकारक धक्के आपण देऊ. कर्मशून्य बडबड आणि कोरड्या समारंभांनी काय होणार ? तुमचे चारित्र्य प्रथम घडवा मग मी तुमच्याबरोबर आहेच. आपल्याला २००० संन्यासी हवेत. स्त्री आणि पुरुष - गृहस्थ नको, लक्षात ठेवा संन्यासी हवेत आणि आपण चमत्कार करून दाखवू. तुमची निष्क्रियता सोडून द्या आणि चांगले कंबर कसून उभे रहा. फक्त स्वत:च्या विलासी जीवनाचा विचार करणार्याला आणि आळसात दिवस घालविणार्याला नरकातसुद्धा जागा नाही. उठा ! उठा ! भरती सुरू झालेली आहे. पुढे व्हा ! स्त्री आणि पुरुष, इतकेच काय पण चांडाळही त्याच्या दृष्टीने पवित्रच होय. पुढे जा ! नाव आणि कीर्ति, भक्ति आणि मुक्ति यांचा विचार करायला आता वेळच नाही.
आपला सामाजिक दोष
स्वामी विवेकानंदांनी एके ठिकाणी म्हटले आहे, `आपला सामाजिक दोष आपण भव्यदिव्य असे काही करीत नाही, हा नसून आपल्या आवाक्यातीलही करत नाही, हा आहे !'
`मी एकटा काय करणार ?' मनोवृत्ती
`मी एकटा काय करणार ?' अशी काहींची वृत्ती असते. (स्वामी विवेकानंद म्हणतात, ``कोणी भव्यदिव्य करत नाही म्हणून नाही, तर हिंदु आवाक्यातील कृती करत नाहीत म्हणून क्रांती होत नाही.'')
दानाचा अहंकार नको
दुसर्याला मदत करणे, यात जो हुशारकी समजतो, त्याला स्वामी विवेकानंद सांगतात की, एखाद्या भिकार्याला दोन-पाच पैसे देऊन त्याच्यावर उपकार केल्याबद्दल तुम्हाला गर्व होत असेल, तर मुळीच देऊ नका; कारण ९ कि.मी. खोल असणार्या प्रशांत महासागराच्याही तळाशी असलेल्या आपल्या भक्तांचे संरक्षण व पालनपोषण करण्यास भगवंत समर्थ आहे. आपण एखाद्या याचकावर उपकार केले, तर आपण उपकार करीत नसून आपणच त्याच्याकडून उपकृत होत असतो; म्हणजे तोच आपल्यावर उपकार करीत असतो.
गुरूंशिवाय ज्ञान नाही ! - स्वामी विवेकानंद
अँडॅमला वर्जित फल खाऊन ज्ञान प्राप्त झाले. `नोहा'ला जिहोवाच्या कृपेने समाजविज्ञान प्राप्त झाले. भारतात असे मानण्यात आले आहे की, प्रत्येक शास्त्राची एक अधिष्ठात्री देवता आहे. प्रत्येक शास्त्राचा उगम देवता किंवा सिद्ध पुरुष यांच्यापासून झालेला आहे. चांभाराच्या विद्येपासून ते आध्यात्मिक ज्ञानापर्यंत सर्वकाही देवतेच्या किंवा सिद्ध पुरुषाच्या कृपेवरच अवलंबून असते. `गुरूंशिवाय ज्ञान नाही.' गुरुकृपेने गुरूंच्या साक्षात् मुखातून व गुरु-शिष्यपरंपरेनेच ज्ञान प्राप्त होऊ शकते. ज्ञानप्राप्तीसाठी दुसरा मार्ग नाही.
(हिंदुधर्म आणि श्रीरामकृष्ण व इतर लेख या पुस्तकातून साभार)
साधना अनिवार्य असणे
कोणतीही कृती करायची असल्यास त्यासाठी ईश्वरी अधिष्ठान असणे आवश्यक आहे. स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे, `झाडाचे पानही ईश्वराच्या इच्छेशिवाय हलत नाही.' त्यामुळे आपण देवाचे भक्त झालो, तरच देव आपल्या मदतीला येईल. त्यामुळे सत्याचा अंगिकार करून व ईश्वराला शरण जाऊन कोणतीही कृती केल्यास देव नक्कीच मदत करतो. `मी माझ्या भक्तांचे रक्षण करतो' या श्रीकृष्णाच्या वचनाप्रमाणे आपण सर्वजण भक्त होण्यासाठी प्रयत्न करूया.
जगन्नियंता
स्वामी विवेकानंदांनीही म्हटले आहे, `जर साधी खुर्ची हलवतांनाही आपल्याला जर शक्ती लागते, तर एवढे मोठे विश्व चालवतांना शक्तीचा पुरवठा करणारा जगन्नियंता असायलाच हवा.'
ऐहिक प्रगती साधतांना सुखाच्या प्रमाणात दु:ख येते, हे मनुष्याने लक्षात घेणे गरजेचे !
स्वामी विवेकानंद सांगतात, `जे मज्जातंतू सुखाच्या संवेदना जिवापर्यंत वाहून नेतात, तेच मज्जातंतू दु:खाच्याही संवेदना वाहून नेत असतात. जसजशी ऐहिक किंवा वैज्ञानिक प्रगती झाली व अनेक सुखाची साधने मानवाला उपलब्ध झाली, तसतशी मानवी मज्जातंतू सुखाच्या संवेदना वाहून नेण्यासाठी जास्त संवेदनाशील होत आहेत; मात्र जास्त संवेदनाशील झालेल्या मज्जातंतूंद्वारे मानवाला सुखाच्या प्रमाणामध्ये आता तेवढ्या तीकातेचे दु:खही अनुभवणे अपरिहार्य झाले आहे.' याचा अर्थ मानवाने विज्ञान किंवा ऐहिक प्रगतीला नाकारावे, असा नसून हे सत्य जाणत असतांना मानवाने जर आनंदप्राप्तीसाठी प्रयत्न केला नाही, तर त्याला प्रचंड दु:खही सहन करावे लागेल, याचे भान असावे एवढेच.
स्वामी विवेकानंदांची तथाकथित समाजसुधारकांना चपराक !
इ.स. १८८७ मध्ये सामाजिक परिषद भरली. त्या परिषदेचे उद्घाटन न्या. रानड्यांनी केले. त्या वेळी विवेकानंदांनी त्याच परिषदेत गर्जना केली, ``माझ्यासमोर हिंदु समाज सुधारणासंबंधीचे उद्घाटनाचे भाषण आहे. रानडे आणि इतर समाजसुधारकहो, या तुमच्या `समाजसुधारणा' आंग्लाळलेल्या भारताच्या आहेत. समाजसुधारकहो ! हे विसरू नका की, आपल्या हिंदुसमाजाच्या समस्या तुम्ही अथवा तुमचे पाश्चात्त्य गुरु अजूनही आकळू शकत नाही. मग त्या सोडवणे, तर फार दूरच ! हिंदु समाजाच्या समस्या सोडविणार्यांनी ध्यानी घ्यावे की त्यांच्या सुधारणांना धर्मशास्त्रांचे भक्कम अधिष्ठान असले पाहिजे.'' (Complete works of Swami Vivekananda Centenary Vol. IV) (संदर्भ : हिंदु बांधवा । जागा राहा ।। रात्र वैर्याची आहे ।।, पृ. २०. प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (नारायणानंदनाथ).)
विद्रोहींना चपराक !
हिंदुद्वेष्ट्यांना स्वामी विवेकानंद यांनी सुनावले होते, ``हिंदु धर्माची निंदा कराल, तर समुद्रात फेकीन.'' हिंदु धर्मावर चिखलफेक करणार्यांवर आता हाच उपाय करावा लागेल.
बुद्धीप्रामाण्यवादांची संकुचित बुद्धी
याच बुद्धीप्रामाण्यवाद्यांची निरर्थक दांभिकता आणि युक्तीवादाबद्दल स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली एक गोष्ट आपण बघूया. एकदा एका ज्योतिषाचा मुलगा त्याला विचारतो, ``ज्योतिषाच्या आधारे मला चॉकलेट कधी मिळणार, ते सांगा.'' त्यावर ज्योतिषीबाबा त्याला म्हणतात, ``ज्योतिष तुला चॉकलेट कधी मिळेल, हे सांगू शकत नाही.'' त्यावर मुलगा लगेचच म्हणतो, ``यावरूनच कळतं की, तुमचं ज्योतिष थोतांड आहे.'' गोष्टीतील या मुलाप्रमाणेच हल्लीचे बुद्धीप्रामाण्यावादी हिंदु धर्म, शास्त्र आणि अध्यात्म यांना व्यापक पद्धतीने समजून न घेता आणि त्यांचे महत्त्व न जाणता स्वत:च्या संकुचित विचारसरणीमधून त्यांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या खोट्या बुद्धीला पटेल ते आणि तेवढच खरं. बाकी सर्व अंधश्रद्धा, असे ते म्हणतात.
इतर विचारधन
`गर्वसे कहो हम हिंदू है!' अशी विवेकानंदांनी दिलेली हाक देण्याचा पुन्हा प्रसंग ओढवला आहे.
पृथ्वीप्रलय झाला आणि मूठभर हिंदू जिवंत राहिले, तरी ते रामाच्या आणि सीतेच्या चरित्रायनाने प्रतिसृष्टी निर्माण करतील, असा विश्वास स्वामी विवेकानंदांनी व्यक्त केला आहे.
फक्त स्वत:च्या विलासी जीवनाचा विचार करणार्याला आणि आळसात दिवस घालविणार्याला नरकातही जागा नाही !- स्वामी विवेकानंद
भारतातील प्राणभूत तत्त्वाची अद्याप जगाला आवश्यकता आहे ! - स्वामी विवेकानंद
स्वामी विवेकानंद म्हणतात - ``आयुष्य ही चैनीची वस्तु नसून कर्तव्याचा यज्ञ आहे.''
स्वामी विवेकानंदांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वर्णन `या वसुंधरेने असा क्षत्रिय गेल्या पाच हजार वर्षांत जन्माला घातलेला नाही', असे केले आहे.
स्वामी विवेकानंद ज्यांनी एकट्याने गेल्या दोन शतकांपूर्वी प्रचंड मोठी ख्रिस्ती आक्रमणांची लाट रोखून धरली. त्यांचा संदेश आहे, ``समाजामध्ये होणारे परिवर्तन हे मोठ्या चमत्काराने होत नसते, तर सामान्य माणसाने आपल्या कुवतीमध्ये असलेली कृती केल्यामुळे या समाजामध्ये परिवर्तन होत असते.'' आपण काय करणार आहात, ते ठरवा व आतापासून त्या दिशेने चालण्याची सुरुवात करा !
स्वामी विवेकानंदांनी म्हटले होते, ``मला प्रत्येकाबद्दल अशा प्रकारची एक श्रद्धा वाटायला हवी'' आणि त्यांनी ते म्हणत असतांना पुढे म्हटले होते; ``पण इस्लाम किंवा ख्रिस्ती सर्वांबद्दल असे म्हणत नाहीत. त्यांचा बंधुत्वाचा जो विचार आहे, तो विचार जगासाठी नाही. त्यांचा बंधुत्वाचा विचार हा केवळ त्यांच्या धर्मांतल्या लोकांकरता आहे. जे माझ्या धर्मात आले, ते माझे बंधू. जे माझ्या धर्मांत आलेले नाहीत, त्याला ख्रिस्ती लोकांचा शब्द आहे `माय हारवेस्ट'. ते पीक मला काढायचे आहे, ते पीक मला माझ्या घरात आणायचे आहे. अगदी हा शब्द मिशनर्यांकडून वापरला जातो आणि हे पीक जरी आणता न आले, तरी या पिकाची नासाडी, तरी करता आली पाहिजे.''
स्वामी श्री विवेकानंदांना एकदा एका विद्वानाने हिणवले, `तुम्ही स्वत: ब्रह्मज्ञानी असतांना, तुमच्या प्रवचनांमधून लोकांना सतत वेदांत (निर्गुणाचे ज्ञान) सांगत असतांना, कालिमाता या सगुण देवतेच्या मूर्तीचे भजन-पूजन करण्यात नित्य धन्यता मानणारे श्रीरामकृष्ण यांना तुमचे गुरु कसे मानता ?' यावर श्रीस्वामींनी उत्तर दिले, ``मला मिललेले ब्रह्मज्ञान हे मला माझ्या सद्गुरूंच्या चरणसेवेच्या प्रभावाने मिळालेले असून, तेच ज्ञान व ते देण्याची क्षमता श्री कालिमातेचे भजन- पूजन करूनच माझ्या सद्गुरूंना मिळाली आहे.''
स्वामी श्री विवेकानंदांचे स्मारक
सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांकडून प्राप्त ज्ञान
`स्वामी विवेकानंद' असे नाव सांगणार्या एका अज्ञात शक्तीने सनातनचे ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. धनंजय राजहंस यांच्या माध्यमातून दिलेले ज्ञान येथे देत आहोत.
`गुरु-शिष्य' परंपरा
भारतीय जीव अज्ञानामुळे स्वत:ला शरीर, मन अथवा बुद्धी समजत असला, तरी गुरु-शिष्य परंपरेमुळे त्याला आत्मस्वरूपाची ओळख होणे व सद्गुरूंच्या थोर शिकवणीनुसार त्याने मोक्षप्राप्ती हे ध्येय गाठणे
माझा पुढील विचाररूपी संदेश तुम्ही बर्याच वेळा माझ्या छायाचित्राखाली अंकीत केलेला पाहिला असेल. तो संदेश असा आहे -
`उठा, मृगराजांनो, उठा आणि आपण मेंढरे आहोत हा वृथा भ्रम झाडून टाका ! तुम्ही सिंहाची लेकरे आहात, हे सदैव लक्षात असू द्या ! तुम्ही जरा-मरणरहीत, मुक्त आणि नित्यानंदस्वरूप आत्मा' आहात.'
भावार्थ : भारतीय बांधवांना मी हे आवाहन व्यष्टी साधनेच्या संदर्भात केलेले होते. अखिल विश्वात केवळ एकच अशी योनी आहे, जिला ईश्वराने `सार-असार' विवेकबुद्धी दिलेली आहे. ही विवेकबुद्धी म्हणजे मानवाला ईश्वरी कृपेने प्राप्त झालेले वरदान आहे. ही बुद्धी मनुष्याला मनुष्यजन्माची इतीकर्तव्यता सातत्याने शिकवित असते. एवढेच नव्हे, तर त्याला त्याच्या जीवनातील अंतिम ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करवून घेते. त्याला अंतिम ध्येय गाठल्याशिवाय चैन पडू देत नाही. मला अभिप्रेत असलेला `मेंढरू' या शब्दाचा अर्थ असा आहे.
१. मेंढरू हा अत्यंत अल्पबुद्धी असलेला चतु:ष्पाद प्राणी आहे.
२. बुद्धीचा भाग कमी असल्याने मेंढरू विनाकारण कशालाही धडक मारून स्वत:च्या शक्तीचा अपव्यय करीत असते.
३. अल्पबुद्धीमुळे एखाद्या मेंढराने चुकून खोल खाईत उडी मारली, तर त्याच्या मागून येणारी मेंढरे त्या खाईत उड्या मारतात. भारताची थोर, उज्ज्वल संस्कृती आणि परंपरा यांचा अभ्यास प्रत्येक भारतियाने न केल्यामुळे आज त्याची अवस्थाही मेंढरांसारखी झाली आहे. त्यामुळे मी भारतीय मनुष्याला `मेंढरू' ही उपमा दिली आहे. त्याला प्राप्त झालेल्या श्रेष्ठ अशा मनुष्यजन्माचे तो सार्थक करीत नसल्याने त्याला त्याच्या स्वस्वरूपाची (आत्मस्वरूपाची) ओळख पटावी, यासाठी मी हे आवाहन केलेले आहे. `सिंह व मेंढरू' या रूपकात्मक गोष्टीतून मी `गुरु-शिष्य' परंपरेचे रहस्य उलगडून दाखवू इच्छितो.
रूपकात्मक गोष्ट : एक धनगर रोज सकाळी मेंढ्या घेऊन जंगलात जात असे. एके दिवशी त्याला एक छावा (बाल्यावस्थेतील नर सिंह) मेलेल्या सिंहीणीजवळ बसलेला दिसला. त्या धनगराला त्या छाव्याची दया येते व तो त्याला आपल्या घरी घेऊन येतो. छावा दिवसा-मासाने मोठा होत युवराज होतो. त्याचे पालनपोषण मेंढराप्रमाणे झाल्यामुळे व तो नेहमी मेंढरांच्या सहवासात राहिल्यामुळे तो स्वत:चे अस्तित्व विसरून गेलेला असतो. एकदा युवराज सिंह अन्य मेंढ्यांसोबत चरत असल्याचे जंगलातील सिंह पहातो. त्याला आश्चर्य वाटते. तो त्या युवराज सिंहावर झडप घालून त्याला दूरवर नेतो. यावर घाबरून युवराज सिंह त्या सिंहाकडे दयेची भीक मागतो. सिंह त्याला अभय देतो व एका तळयावर नेतो. तेथे सिंह त्याला पाण्यात त्याचे प्रतिबिंब न्याहाळण्यास सांगतो. स्वत:चे प्रतिबिंब पाहिल्यावर त्याला खूप आनंद होतो. त्यावर सिंह म्हणतो, `थोड्या वेळापूर्वी तू स्वत:ला मेंढरू समजत होतास. आता कळले ना, तू मेंढरू नसून सिंह आहेस.' स्वत:ला मेंढरू समजणार्या त्या युवराज सिंहाला स्वत:च्या स्वस्वरूपाची ओळख केवळ त्या जंगलातील सिंहामुळे झाली. तात्पर्य : मनुष्ययोनीत जन्माला आलेला प्रत्येक भारतीय जीव हा जरी अज्ञानामुळे स्वत:ला मी म्हणजे शरीर समजत असला, तरी भारतातील गुरु-शिष्य परंपरेमुळे त्याला आत्मस्वरूपाची ओळख होऊन तो `मी म्हणजे आत्मा' या चिरंतन सत्यापर्यंत पोहोचू शकतो. केवळ एवढ्यावरच समाधानी न राहाता तो सद्गुरूंच्या थोर शिकवणीनुसार `आत्मानो मोक्षार्थं जगद्धिताय च !' या अंतिम ध्येयाकडे वाटचाल करत मोक्षप्राप्ती हे ध्येय गाठतो.
निद्रिस्त हिंदूंना जागवणारे स्वामी विवेकानंद !
श्री. धनंजय राजहंस
आज सनातन धर्मावर धर्मद्रोह्यांचे असंख्य हल्ले होत असूनही त्याविरुद्ध अवाक्षरही न काढणार्या निद्रिस्त हिंदूंना जागे करण्यासाठी स्वामी विवेकानंदांच्या तेजस्वी विचारांची नितांत आवश्यकता आहे. सनातनचे देवद आश्रमातील साधक श्री. धनंजय राजहंस यांना सूक्ष्मातील स्वामी विवेकानंद यांचे `राष्ट्र आणि धर्म' यांच्या संबंधातील विचार प्राप्त झाले. ते पुढे देत आहोत.
उत्तिष्ठत ! जाग्रत !! प्राप्य वरान्निबोधत !!!
सर्वप्रथम मी माझा परिचय करून देतो. मी नरेंद्रनाथ दत्त म्हणून कोलकाता येथे १२.१.१८६३ रोजी जन्माला आलो. ईश्वरी नियोजनानुसार पुढे माझा संपर्क माझे सद्गुरु प्रभु श्रीरामकृष्ण परमहंस यांच्याशी झाला. सद्गुरूंचे परमपवित्र सान्निध्य प्राप्त झाल्यावर व गुरुचरणी ज्ञानप्राप्तीचे धडे गिरविल्यावर `शिष्य' म्हणून माझे नामकरण `स्वामी विवेकानंद', असे झाले. सद्गुरूंच्या कृपाशीर्वादामुळे मी केवळ भारतातच नव्हे, तर अखिल विश्वात सनातन हिंदु धर्माचे तेज प्रस्थापित करण्यात यशस्वी झालो. ११.९.१८९३ रोजी अमेरिकेतील शिकागो या शहरात आयोजित केलेल्या `सर्वधर्म परिषदे'त मी सनातन हिंदु धर्मासंबंधीचे विचार `भारतातील एक धर्मप्रतिनिधी' म्हणून मांडले होते. हे विचार त्या वेळी अखिल विश्वातून आलेल्या सर्व धर्मप्रतिनिधींच्या कौतुकास पात्र ठरले. भारतात परतल्यावर मी प्रत्येक भारतीय युवकासाठी एक प्रमुख विचार (संदेश) नेहमी मांडत होतो. तो विचार तुम्हाला बर्याच वेळा माझ्या छायाचित्राखाली अंकित केलेला दिसत असेल. त्यामध्ये मी भारतीय युवकांना एक आवाहन व्यष्टी व समष्टी साधनेच्या संदर्भात एकत्रितरीत्या केलेले होते. ते म्हणजे, उत्तिष्ठत ! जाग्रत !! प्राप्य वरान्निबोधत !!! अर्थ : उठा ! जागे व्हा !! वर प्राप्त करून आत्मज्ञान प्राप्त करा !!! या आवाहनाचा भावार्थ व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या संदर्भात असा आहे.
भावार्थ
व्यष्टी साधनेच्या संदर्भात
अ. उत्तिष्ठत : हे भारतातील युवकांनो, उठा ! जागे व्हा ! तुम्ही स्वत:तील आत्म्याची अमर्याद शक्ती अज्ञानामुळे हरवून बसला आहात.
आ. जाग्रत : अज्ञानामुळे लोप पावलेली आत्म्याची अमर्याद शक्ती वैयक्तिक साधनेने जागृत करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा.
इ. प्राप्य वरान्निबोधत : आत्मसाक्षात्कार होत नाही, तोपर्यंत तुमचे प्रयत्न थांबवू नका. (या संदर्भातील सुस्पष्ट अशा वेगळया आवाहनात्मक संदेशाचा विचार मी नंतर मांडणारच आहे.)
समष्टी साधनेच्या संदर्भात
अ. उत्तिष्ठत : हे भारतीय युवकांनो, उठा ! जागे व्हा ! महान भारतीय परंपरेचा अभिमान बाळगून सनातन हिंदु धर्माचा अभ्यास करा व तीच परंपरा आत्मसात करण्याचा प्रयत्न करा !
आ. जाग्रत : सनातन हिंदु धर्माच्या तेजाची झळाळी, तुमच्या दुर्लक्षामुळे कोमेजून चालली आहे. ही झळाळी परत आणण्यासाठी जागृत रहा !
इ. प्राप्य वरान्निबोधत : केवळ एवढ्यावरच थांबू नका, संपूर्ण विश्वात सनातन हिंदु धर्माचे तेज प्रस्थापित केल्याशिवाय शांत बसू नका. मी त्या वेळी केलेल्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन ज्या जिवांनी त्या काळात विशेष प्रयत्न केले, ते पुढील जन्मात हेच ध्येय उराशी बाळगून सेवेला लागले आहेत. - स्वामी विवेकानंद (श्री. धनंजय राजहंस यांच्या माध्यमातून)
भारताची आदर्श संस्कृती व परंपरा
भारताची थोर व आदर्श संस्कृती आणि परंपरा भारतियांच्या मन:पटलावर सातत्याने बिंबावी, यासाठी ईश्वरी नियोजनानुसारच भारताच्या राजमुद्रेची निर्मिती झालेली आहे. भारताच्या चलनी नोटेवर व नाण्यावर ती अंकीत केलेली आहे. या राजमुद्रेचा अभिमान प्रत्येक भारतियाला असायला हवा. भारताच्या राजमुद्रेचा अभ्यास सहसा कोणी नीटपणे करतांना आढळत नाही. आजचे नीतीभ्रष्ट व नतद्रष्ट राज्यकर्तेही यासंबंधी शालेय क्रमिक पाठ्यपुस्तकांतून माहिती देत नाहीत. भ्रष्ट राज्यकर्त्यांना त्यांच्या भ्रष्ट राज्यव्यवस्थेत त्यामुळे बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे. भारताच्या राजमुद्रेचा आशय सर्वसामान्यांना कळावा, यासाठी त्याचा विस्तारीत अर्थ मी येथे देत आहे.
भारताची राजमुद्रा
१. राजमुद्रेतील चिन्हे
अ. चार दिशांना तोंड करून उभे असलेले सिंह (यात मध्यभागी समोर तोंड करून असलेल्या सिंहाच्या मागे आणखी एक सिंह आहे; परंतु चित्र पहातांना तीनच सिंह दिसतात.)
आ. त्याच्या खाली एक चक्र
इ. शेवटी `सत्यमेव जयते ।' हे घोषवाक्य
२. राजमुद्रेतील चिन्हांचा अभ्यास
२ अ. चार दिशांना तोंड करून उभे असलेल्या सिंहांची वैशिष्ट्ये : भारताच्या राजमुद्रेसाठी सिंह या प्राण्याचीच निवड का करण्यात आली, सिंहाची वैशिष्ट्ये कोणती आहेत, ते आपण पाहूया.
२ अ १. शूर व पराक्रमी : सिंह हा प्राणी शूर व पराक्रमी आहे. अ. भारत हा सिंहासारख्या शूर व पराक्रमी योद्ध्यांचा देश आहे.
२ अ २. सर्वांवर राज्य करणारा : सिंहाला त्याच्यातील गुणांमुळे `जंगलाचा राजा' ही उपाधी प्राप्त झालेली आहे.
अ. भारत सर्व विश्वावर राज्य करण्याची व अधिकार गाजवण्याची क्षमता बाळगणारा देश आहे.
२ अ ३. स्वत:च्या शक्तीचा योग्य ठिकाणी वापर करणारा : स्वत:ला भूक लागल्याशिवाय सिंह विनाकारण शिकार करून स्वत:ची शक्ती वाया घालवत नाही. भूक नसतांना त्याच्यासमोर सावज उभे असले, तरीही तो त्याकडे पहात नाही.
अ. भारत हा शांतताप्रिय देश असल्याने विनाकारण कोणत्याही देशावर आक्रमण करून स्वत:ची शक्ती वाया घालवत नाही.
२ अ ४. शत्रूला पराभूत करणारा : सिंहाला भूक लागल्यावर सावज कुठेही व कितीही सुरक्षित जागी दडून बसले, तरी तो त्याचा वेध घेऊन त्याला आपले भक्ष्य बनवतो.
अ. वेळ पडल्यास भारत स्वत:वर सतत आक्रमण करणार्या देशाला पराभूत करून स्वत:चे रक्षण करण्याचे सामर्थ्य बाळगतो.
२ अ ५. केवळ आवश्यक गोष्टी करणारा : सिंह त्याला प्राप्त झालेले भक्ष्य पूर्णत: न खाता त्यातील काही महत्त्वाचा पोषक भागच खातो, त्याला आपण `सिंहाचा वाटा', असे म्हणतो.
२ अ ५ अ. भारताच्या थोर व आदर्श परंपरेला बट्टा लावून `सिंहाचा वाटा' गमावणारे राज्यकर्ते : भारतावर विनाकारण आक्रमण करून शांतीचा भंग केल्याबद्दल भारत देशाने `अखंड पाकिस्तान'चे अस्तित्व कायमचे संपवून बांगलादेशची निर्मिती करून त्याला राजमान्यता बहाल केली. भारतातील सैनिकांनी स्वत:च्या प्राणांची बाजी लावून व वेळप्रसंगी प्राणार्पण करून स्वाभिमानाने `सिंहाचा वाटा' कमावला होता; मात्र आजच्या नतद्रष्ट राज्यकर्त्यांनी तो शत्रूराष्ट्राला परत करून राष्ट्रद्रोहच केला. त्यानंतर भारतीय राज्यकर्त्यांनी भारतियांच्या शौर्य, धैर्य व पराक्रम या गुणांना तिलांजली दिली. केवळ एवढ्यावरच न थांबता त्यांनी स्वत:ची राजसत्ता सांभाळण्यासाठी शत्रूराष्ट्राशी एकतर्फी मैत्रीचा अनुनय करण्याचा अट्टाहास चालवला आहे. त्यामुळे त्यांनी भारताच्या थोर व आदर्श परंपरेला बट्टा लावून भारत देशाच्या संकटांत वाढ केली आहे.
२ अ ६. सतत मागे पहात पुढील मार्ग आक्रमणारा : सिंह नेहमी सावध राहून सतत मागे वळून पहातो व पुढील मार्ग आक्रमितो. त्यालाच आपण `सिंहावलोकन' म्हणतो.
२ अ ६ अ. सिंह करतो त्याप्रमाणे सिंहावलोकन न करणारे, म्हणजे अखंड सावध न रहाणारे भारतीय राज्यकर्ते : भारत देशाची संरक्षणक्षमता शत्रूराष्ट्रापेक्षा कैकपटीने जास्त आहे. सर्वार्थाने समर्थ अशा भारताने `आपले सार्वभौमत्व टिकवण्यासाठी अखंड सावध राहून आपली संरक्षणविषयक इतिकर्तव्ये करत रहाणे, म्हणजेच `सिंहावलोकन' करून मार्गक्रमण करणे', हे भारतीय राज्यकर्त्यांकडून होणे अपेक्षित आहे. त्यांच्याकडून हे होत नसल्याने त्यांना सत्ताच्यूत करून क्रांतीच्या दिशेने वाटचाल करणे ही काळाची गरज आहे.
२ अ ७. सिंहगर्जना करून स्वत:च्या अस्तित्वाची इतरांना जाणीव करून देणारा : सिंहगर्जना करून स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव जंगलातील इतर प्राण्यांना करून देतो. याला `सिंहगर्जना', असे म्हणतात.
२ अ ७ अ. सिंहगर्जना विसरलेले भ्रष्ट आणि नपुंसक राज्यकर्ते : सिंहाचा हा गुणही भारतात आहे; परंतु भारतातील ज्या भ्रष्ट आणि नपुंसक राज्यकर्त्यांना `सिंहावलोकन करणे' हाच गुण स्वत:त आणता येत नसेल, त्यांच्याकडून `सिंहगर्जना करणे' हा पुरुषार्थ गाजवण्याची आशा करणेच व्यर्थ ठरेल. अशी ही गुणवैशिष्टये प्राप्त असलेला सिंह चार दिशेला तोंड करून उभ्या स्थितीत भारताच्या राजमुद्रेवर विराजमान आहे. सिंहाच्या गुणांप्रमाणे भारत देशानेही पुरुषार्थ गाजवावा, यासाठी ते अखंडपणे उभे आहेत.
२ आ. `सत्यमेव जयते' हे घोषवाक्य
भावार्थ : या विश्वात जे काही सत्याच्या कसोटीला उतरते, त्याचा अंतीम विजय हा निश्चितच होतो. भारताची मूळ संस्कृती आणि वैभव, सध्याची दयनीय व शोचनीय अवस्था आणि आगामी भवितव्य पहाता समस्त भारतवासियांच्या मनात `आता आपला भारत देश आणि संस्कृती नष्ट होण्यास अगदी अल्प काळ शिल्लक राहिला आहे. हा देश व ही संस्कृती आता नष्ट झाल्याशिवाय रहाणार नाही', असे विचार येऊ शकतात. यावर मला स्पष्टपणे सांगावेसे वाटते की, आपल्या भारत देशाला आज जे ग्रहण लागले आहे, ते पूर्णपणे नष्ट होणार आहे. भारताचे पुनरुत्थान निश्चित होणार आहे. आपल्या भारताचा प्रवास इ.स. २००६ पासून २०२५ पर्यंत `तमसो मा ज्योतिर्गमय' म्हणजेच अंधाराकडून उजेडाकडे झेपावणारा आहे. त्याची काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.
१. या विश्वात नित्य व सत्य अशी एकमेवाद्वितीय शक्ती, या विश्वाचा निर्माता म्हणजे ईश्वरच आहे. बाकी सर्व अनित्य आहे. बाकी सर्व वस्तूंना उत्पत्ती, स्थिती व लय हे विश्वाचे नियम लागू पडतात.
२. सनातन हिंदु धर्म हा ईश्वरनिर्मित धर्म असल्यामुळे तो एकमेवाद्वितीय, शाश्वत व चिरंतन टिकून रहाणारा आहे. ज्याप्रमाणे साखरेपासून गोडी वेगळी करता येत नाही, त्याप्रमाणे ईश्वरापासून त्याचा धर्म वेगळा करता येत नाही. त्यामुळे ईश्वर म्हणजेच धर्म व धर्म म्हणजेच ईश्वर हे समीकरण सर्वांनी लक्षात घ्यावे.
३. या धर्म-अधर्माच्या लढ्याची व्याप्ती वाढत जाऊन त्याची परिणती तृतीय महासंहारक विश्वयुद्धात होईल. या महायुद्धात महासंहारक शस्त्रास्त्रांचा पाऊसच पडेल व रक्ताचे पाट वहातील. या महाप्रलयंकारी धर्मयुद्धामुळे मृत्यूचे महाप्रचंड तांडव अनुभवण्यास येईल. यातून प्रचंड जीवित व वित्त यांची हानी होईल. या कालखंडातून ईश्वरीकृपेने वाचलेले आणि भेदरलेले जीव पुढे ईश्वरचरणी लीन होऊन मानसिक शांती व समाधान यांच्यासाठी अत्यंत व्याकुळ झालेले असतील.
४. परात्पर गुरूंनी स्थापन केलेल्या संघटनेइतकी प्रचंड शक्ती विश्वातील कुठल्याही सरकारकडे असणार नाही.
५. परात्पर गुरूंच्या माध्यमातून ईश्वराची `आज्ञापक शक्ती' कार्यान्वित होऊन संपूर्ण विश्वात त्यांची ज्ञानप्रभा झळकेल.
६. या ज्ञानप्रभेची तेजस्वी झळाळी काळानुरूप वाढत जाऊन शेवटी संपूर्ण ब्रह्मांडाला गवसणी घातल्याशिवाय शांत व स्थिर बसणार नाही.
७. या ज्ञानप्रभेच्या तेजामुळे संपूर्ण विश्व प्रभावित होऊन परात्पर गुरूंनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचा स्वीकार करील व त्यानुसार आचरण करण्यास सुरुवात करील.
८. या श्रेष्ठ धर्माचा व तत्त्वज्ञानाचा संपूर्ण विश्वाकडून स्वीकार केला जाईल. हा धर्म, `सनातन हिंदु धर्म'असेल आणि स्वीकृत तत्त्वज्ञान व संस्कृती ही `भारतीय संस्कृती' असेल.
९. सनातन हिंदु धर्म संपूर्ण विश्वात स्थापित होणे म्हणजेच दुसर्या अर्थाने ईश्वरी राज्याची स्थापना होणे, असा आहे. असा संस्थापित झालेला धर्म व ईश्वरी राज्य आगामी १००० वर्षांच्या कालावधीसाठी अबाधितपणे कार्यरत राहील. अशा प्रकारे `सत्यमेव जयते' या वचनाची अनुभूती आगामी काळात धर्माची बाजू घेऊन लढणार्या प्रत्येक धर्मवीराला अनुभवता येईल.
`हे माझ्या प्रिय भारतीय बांधवांनो, मी आज जे वास्तव तुमच्यापर्यंत उभे केले आहे. त्याचे नीट चिंतन, मनन व परिशीलन करा. भारताच्या आगामी उज्ज्वल कालखंडात प्रवेश करता येण्यासाठी सुसज्ज व्हा. यासाठी मी तुम्हाला सर्वप्रथम सांगितलेला विचाररूपी संदेश कदापीही विसरू नका.'
``उत्तिष्ठत ! जाग्रत !! प्राप्य वरान्निबोधत !!!'' - स्वामी विवेकानंद (श्री. धनंजय राजहंस यांच्या माध्यमातून, ३०.६.२००६, पहाटे ४.३५ ते १०.१२.२००६, रात्री ८.३०)
हिंदु धर्म व संस्कृती यांचा अपप्रचार
अमेरिकेत हिंदु धर्म व संस्कृती यांचा अपप्रचार
हिंदु धर्म संपवण्याचा हा कट उधळण्यासाठी हिंदू काय करणार ?
अमेरिकेत नुकतेच श्रीमती अदिती बॅनर्जी यांचे `इन्व्हेडिंग द सेक्रेड : एन एनॅलिसिस ऑफ हिंदुइझम इन अमेरिका' हे पुस्तक बाजारात आले. श्रीमती बॅनर्जी या अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे अँटर्नरी (सरकारने शहरासाठी नियुक्त केलेला प्रमुख वकील) म्हणून कार्यरत आहेत. या पुस्तकात त्यांनी अमेरिकेत हिंदु धर्म व संस्कृती यांवर कशी चिखलफेक केली जात आहे, याबाबत त्यांना आलेल्या अनुभवांचे विवेचन केले आहे. यातील एक प्रसंग येथे देत आहोत.
महाविद्यालयीन अभ्यासक्रमातून हिंदूंच्या महापुरुषांची बदनामी !
अमेरिकेत महाविद्यालयांतील अभ्यासक्रमामध्ये जॅफ्री क्रिपल यांचे तत्त्वज्ञान शिकवले जाते. `श्री रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंद यांच्याकडे समलिंगी संबंधातून पाहत असत', असे त्यांनी पुस्तकात म्हटले आहे. क्रिपल यांनी मांडलेल्या या मुद्याला कोणताही पुरावा अथवा आधार नाही. असे असतांनाही वर्षानुवर्षे हा विषय मान्यवर प्राध्यापकांकडून शिकवला गेल्यामुळे क्रिपल यांनी मांडलेल्या मुद्यांना मान्यता प्राप्त झाली.
श्याम मानव व महामानव यांतील फरक !
खरंतर अंधश्रद्धा निर्मूलन हे मानवांचे ध्येय नाहीच आहे. एखाद्या क्षुल्लक यशावर ते संतुष्ट नाहीत, म्हणून ज्योतिषशास्त्र, अध्यात्म, विशेषत: संत, त्यांचं सामर्थ्य, प्राचीन योगविद्या आणि तत्त्वज्ञान यांचं मूळच त्यांना उखडून टाकायचं आहे. म्हणून ते नेहमी संत आणि चमत्कार यांना झोडपतात. रामकृष्णांना अष्टसिद्धी वश होत्या, असे सांगतात; पण त्यांनी त्यांचा उपयोग केल्याचे ऐकिवात नाही. त्यांनी केलेला एकमेव महान चमत्कार म्हणजे स्वामी विवेकानंद. आपल्या सिद्धीचे प्रयोग करत जर हे योगीपुरुष फिरले, तर मग श्याम मानव आणि हे महामानव यांत फरक काय राहिला ? - श्रीपाद रामचंद्र भांडारकर, कुर्टी, फोंडा. (दै. गोमन्तक, ५ जून १९९०)
धर्म म्हणजे केवळ शाब्दिक बडबड नव्हे, तर प्रत्यक्ष आत्मानुभूति घेणे
`स्वामी विवेकानंद यांनी विद्यार्थीदशेत असतांना तत्त्वज्ञान हा विषय घेतला. त्यात `आत्मानुभूति म्हणजे काय ?' हा प्रश्न त्यांना पडला होता. त्यावर त्यांच्या प्राध्यापकांनी त्यांना सांगितले, `कलकत्ता येथील दक्षिणापुरी येथे हा अनुभव घेतलेले श्री रामकृष्ण परमहंस आहेत.' विवेकानंदांनी लगेच श्री रामकृष्णांची भेट घेऊन त्यांची परीक्षाच घेतली. त्यांना दिसून आले, `मी ज्यांच्या शोधात होतो, ते हे प्रत्यक्ष ईश्वरस्वरूप परमहंसच आहेत.' श्री रामकृष्ण परमहंस यांच्यामुळे पुढे त्यांनाही आत्मानुभूतीचा अनुभव आला. तेव्हा धर्म म्हणजे केवळ शाब्दिक बडबड नव्हे, तर प्रत्यक्ष आत्मानुभूति घेणे आहे, हे त्यांना कळले. परमहंस म्हणतात, `प्रथम आपले चारित्र्य चांगले करा आणि त्याद्वारे आत्मानुभूतीचा प्रयत्न करा. नंतर तुम्हाला अनुभूति येईलच.' प्रत्येक शास्त्र हे एकत्वाचा शोध लागताच थांबते; कारण त्याच्या पलीकडे ते जाऊ शकत नाही. `मी तो आहे', या महावाक्याचा शोध लागला, तेव्हाच धर्माची महान तत्त्वे, धर्माचे क्षेत्र व धर्माची कार्यपद्धति यांचा आविष्कार झाला. द्रष्टे निर्माण करण्याचे हे महान कार्य आपल्या समोर आहे; कारण ते इंद्रियांच्या पलीकडे असलेल्या सत्याचे दर्शन घेऊ शकले. यावर आपण तेव्हाच विश्वास ठेवू, जेव्हा आपण स्वत: तसे करण्यास समर्थ होऊ. याकरिता धर्माचा अनुभव आताच, या जन्मी घ्यावयाचा आहे. स्वत:चा उद्धार स्वत:च करावयाचा आहे. जेव्हा हे तुम्ही कराल, तेव्हाच तुम्हाला धर्म प्राप्त होईल. धर्माचा साक्षात्कार, त्याची प्रत्यक्षानुभूति हाच एकमेव मार्ग आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला तो शोधून घ्यावा लागेल; कारण आत्मसाक्षात्कार हाच धर्म आहे. याकरिता येणार्या अनुभूतीसाठी धर्मग्रंथाचा उपयोग होतो. तो धर्माच्या पद्धतीनेच शिकावा लागतो. त्यात `मनाला सूक्ष्म अनुभवाच्या अवस्थेपर्यंत कसे पोहोचावे' हे सांगितले आहे आणि ते जाणून घेऊन त्या अवस्थेपर्यंत पोहोचावे लागेल. माझ्यात जो आत्मा आहे, तोच सर्वांत आहे. तो सत्- चित्-आनंदमय आहे. `मी लाचार, दुर्बल आहे', ही भावना दुर्गतीला कारणीभूत होते; म्हणून वरीलप्रमाणे हे सर्व समजून घेऊन `मीही सबळ, सर्वशक्तिमान व ज्ञानसंपन्न आहे', हे ओळखले पाहिजे. धर्म म्हणजे प्रत्यक्ष अनुभूतिच आहे. तो मतवाद नव्हे. `आत्मा हा ब्रह्मस्वरूप आहे'. हे जाणून तद्रूप होणे, त्याचा साक्षात्कार करून घेणे, म्हणजेच धर्म होय.
No comments:
Post a Comment