Advertisement

Sunday, June 28, 2009

मुलांमध्ये प्रखर राष्ट्रतेज निर्माण करा !

समाजनिर्मितीत स्त्रीचा वाटा अतिशय मोलाचा आहे. स्त्रिच्या हातात असलेले हे क्रांतीचे शस्त्र वापरून प्रत्येकीनेच आपली भूमिका पार पाडली, तरच समाज सुधारू शकतो. स्त्रियांनी तेजस्वी व पराक्रमी भावी पिढी निर्माण केली, तर राष्ट्र पुन्हा वैभवाच्या शिखरावर जाण्यास वेळ लागणार नाही. यासाठी स्त्रीने आपले सामर्थ्य लक्षात घेऊन त्यानुसार पावले उचलायला हवीत.

महिलांनो, मुलांच्या मनात राष्ट्रभक्‍तीचे बीज पेरणे हे आपले सर्वप्रथम कर्तव्य समजा ! प्रत्येक कुटुंबातील स्त्रीने आपल्या मुलांमध्ये ईश्‍वराविषयी प्रेम निर्माण करून साधनेचे संस्कार करणे आवश्यक आहे. मुलांमध्ये प्रखर राष्ट्रतेज निर्माण करण्याची आज गरज आहे. चहुबाजूंनी संकटग्रस्त असलेल्या आपल्या राष्ट्राची स्थिती पहाता प्रत्येक कुटुंबात तेजस्वी, पराक्रमी, युयुत्सु व राष्ट्रहिताचा विचार करणारी मुले निर्माण करण्याची गरज आहे !

No comments:

Post a Comment