Advertisement

Showing posts with label Obama. Show all posts
Showing posts with label Obama. Show all posts

Tuesday, November 18, 2008

ओबामांना बिघडवू नका !

राष्ट्रहितासाठी कठोर भूमिका घेणार्‍या ओबामांचा आदर्श भारतीय राज्यकर्ते घेतील काय ?

महाराष्ट्राचे बांधकाममंत्री व महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक श्री. छगन भुजबळ यांनी अमेरिकेचे नूतन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना महात्मा ज्योतिबा फुले यांनी भारतातील अस्पृश्यांवर ब्राह्मणांनी केलेल्या अत्याचारांवर आधारित लिहिलेले एक पुस्तक भेट दिले आहे. सध्या अमेरिका कठीण परिस्थितीतून जात आहे. त्यामुळे तेथील अमेरिकी जनतेच्या नूतन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. या परिस्थितीत बराक ओबामा यांना देशहिताच्या दृष्टीने योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. अशा वेळी खंबीर वैचारिक आधार खूप महत्त्वाचा ठरतो. अशा परिस्थितीत श्री. भुजबळ ओबामा यांना ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले पुस्तक भेट देऊन कोणता कार्यभाग साधत आहेत, हे कळण्यास वाव नाही. श्री. भुजबळ यांनी ओबामा यांना भेट दिलेले सदर पुस्तक फुले यांनी १ जून १८७३ रोजी लिहिलेले आहे. या पुस्तकाच्या सुरुवातीलाच फुले यांनी `सुसंस्कृत ब्रिटिशांच्या राजवटीत ब्राह्मणांनी अस्पृश्यांवर चालवलेल्या छळावर प्रकाश टाकणारे पुस्तक', असा उल्लेख केला आहे. जी व्यक्‍ती भारतातील ब्रिटिशांच्या राजवटीला सुसंस्कृत म्हणते, त्या व्यक्‍तीचे विचार राष्ट्राच्या उत्कर्षाच्या दृष्टीने किती उपयुक्‍त असतील, त्याची कल्पना करता येते.

भारतातील ऋषीमुनींनी लिहिलेले मार्गदर्शक ग्रंथ ओबामा यांना भेट देणे योग्य !
कोणताही राज्यकर्ता राज्यकारभार कसा करतो, हे त्याच्या वैचारिक बैठकीवर अवलंबून असते. त्यामुळे राज्यकर्त्याचे विचार व त्याने अंगीकारलेले तत्त्वज्ञान फार महत्त्वाचे असते. भारत हा जगाचा आध्यात्मिक गुरु आहे. मानवजातीचे व्यष्टी व समष्टी जीवन समृद्ध करण्यासाठी मार्गदर्शन करणारे अनेक ग्रंथ आपल्या ऋषीमुनींनी लिहून ठेवले आहेत. राज्यकर्ता कसा असावा, राजकारणामधील डावपेच आदींबद्दल सखोल मार्गदर्शन करणारे ग्रंथ आर्य चाणक्य व कौटिल्य ऋषी यांनी लिहिले आहेत. सध्या महासत्ता असलेली अमेरिका बिकट परिस्थितीतून जात आहे. अशा वेळी श्री. भुजबळ यांनी ओबामा यांना चाणक्य व कौटिल्य यांनी लिहिलेले ग्रंथ भेट दिले असते, तर ते अधिक सयुक्‍तिक ठरले असते. जीवनाचे सार ज्याच्यात लपले आहे, ती भगवद्‍गीता ओबामा यांना सध्याच्या कठीण प्रसंगात खर्‍या अर्थाने मार्गदर्शक ठरली असती. `अमेरिकेचा शत्रू असलेला अल्-कैदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याला जेरबंद करणार अथवा त्याला ठार मारणार', असे बराक ओबामा यांनी जाहीर केले आहे. अमेरिकेकडे वाकड्या नजरेने बघणार्‍यांना अद्दल घडवण्यास ओबामा आकाश-पाताळ एक करतील, यात वाद नाही. याउलट ज्योतिबा फुले यांनी भारतावर राज्य करणार्‍या ब्रिटिशांचा उदोउदो केला व हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कौतुकासाठी त्यांच्याजवळ शब्द नाहीत. त्यामुळे ओबामा यांच्यासारख्या एका निस्सीम देशभक्‍ताला देशाच्या शत्रूची भलावण करणारे व राष्ट्रभक्‍तांकडे दुर्लक्ष करणारे फुले यांनी लिहिलेले पुस्तक वाचायला देऊन श्री. भुजबळ काय साध्य करू पहात आहेत ? फुले यांनी हिंदूंच्या देवतांवर यथेच्छ टीका केली आहे, तर ओबामा हे श्री हनुमानभक्‍त आहेत.
देवतांवर केलेली टीका ओबामा यांना रुचेल का, हेही श्री. भुजबळ यांनी लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करता ओबामा यांचे वैचारिक अध:पतन करणारे पुस्तक त्यांना भेट देऊन श्री. भुजबळ यांनी त्यांना बिघडवू नये, एवढेच आम्हाला वाटते.

ओबामा यांच्या गुणवैशिष्ट्यांचे आचरण करण्याची भारतीय राज्यकर्त्यांना गरज !
काही दिवसांपूर्वी संयुक्‍त पुरोगामी आघाडी सरकारला प्राप्‍त झालेल्या अहवालावरून भारतात दहशतवादाच्या विरोधात राबवले जाणारे कायदे हे दिवसेंदिवस कडक करण्याऐवजी शिथिल करण्यात येत आहेत, असे नमूद करण्यात आले होते. दहशतवादाने पूर्णपणे पोखरलेल्या भारतासाठी ही बाब चिंताजनक आहे. दुसर्‍या बाजूने विचार करता ओबामा हे ओसामा बिन लादेन व त्याची अल्-कैदा ही दहशतवादी संघटना यांचा समूळ नायनाट करण्याची घोषणा करतात. श्री. भुजबळ व त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. भारतात देशविघातक कारवाया करणार्‍या मुसलमानांचे तुष्टीकरण करण्याची भाषा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा श्री. शरद पवार करतात. या सर्व मुद्यांचा अभ्यास करता स्वत:मध्ये देशभक्‍ती वाढवण्यासाठी श्री. भुजबळ व त्यांच्या पक्षाने ओबामा यांचा आदर्श आता डोळयांसमोर ठेवावा. भारताच्या राष्ट्रहिताच्या दृष्टीने ते आवश्यक आहे.

Sunday, November 9, 2008

बराक ओबामा आणि भारत सरकार !

ओबामा यांनी पाकपुरस्कृत दहशतवादाबाबत केलेल्या वाच्यतेचा लाभ भारतीय राज्यकर्ते उठवतील का ?

बराक ओबामा हे अमेरिकेचे ४२ वे अध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर पाच दिवस उलटून गेले. अमेरिकेतील ही निवडणूक ऐतिहासिक निवडणूक म्हणून जगभर गाजली. बराक ओबामा हे तेथील निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून प्रसिद्धीच्या झोतातच राहिले आणि चार नोव्हेंबर रोजी अमेरिकी जनतेने ओबामा यांच्या नेतृत्व निवडीवर शिक्कामोर्तब केले. त्यांची लोकप्रियता केवळ अमेरिकेतच नव्हे, तर जगभर पसरली असल्यामुळे अद्यापही त्यांच्याविषयीच्या बातम्या ठळकपणे वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होतच आहेत.



जगातील मोठी लोकशाही आणि मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशाचा अध्यक्ष निवडला गेला, याचा हर्ष प्रसिद्धीमाध्यमे लपवू शकली नाहीत, एवढे म्हणता येत असले, तरी या नेत्यांच्या बरोबर आपल्या राजकीय नेत्यांची तुलना करण्याचा विचार मनात आल्यावाचून रहात नाही. बराक ओबामा यांनी गेल्या दीड वर्षापासून त्यांचा निवडणूक प्रचार सुरू ठेवला होता. त्या प्रचाराच्या काळात त्यांच्याच पक्षाच्या म्हणजे डेमोक्रॅटिक पक्षाच्या आणखी एक उमेदवार असलेल्या हिलरी क्लिंटन यांना त्यांनी उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडले, हा त्यांचा पहिला विजय होता. केवळ वक्‍तव्यांच्या फवार्‍यांनी समोरच्या व्यक्‍तीला नामोहरम करण्याचे सामर्थ्य ओबामा यांच्यात होते. आपल्या देशात अशा प्रकारे विरोधकाला जेरीस आणण्याची किमया करणारे लोकप्रतिनिधी किंवा राजकारणी कितीसे आहेत ? अमेरिकेसारखी सुसंस्कृत लोकशाही आता आपल्या देशात नाही, हे पटवून देण्यासाठी शेकडो उदाहरणे सांगता येतील. समाजवादी पक्षाचे खासदार अनीस अहमद, राजदचे खासदार पप्पू यादव, लोकजनशक्‍ती पक्षाचे खासदार सूरजभान आणि राजदचे खासदार शहाबुद्दीन यांच्यावर जे खुनाचे आरोप आहेत, ते याच लोकशाहीतील आहेत. आपल्या देशातील नेत्यांच्या भोवती सुरक्षाव्यवस्थेचे जे कडे पहायला मिळते, तसे बराक ओबामा यांच्या भोवती कधी दिसले नाही. त्यामुळे त्यांना एका खुनी हल्ल्यालाही सामोरे जावे लागले, हे ऐकून जगभरातील लोक अस्वस्थ झाले. या सगळया गोष्टींचा ऊहापोह करावासा वाटतो, त्यामागील कारण म्हणजे ओबामा यांच्याविषयी वाटणारा विश्‍वास. सध्या जगभर आर्थिक मंदीचे वातावरण असून त्यामध्ये अमेरिकेची भूमिका महत्त्वाची आहे. आर्थिक मंदी ही बाबच अशी आहे की, त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तीन तीन वर्षांचा कालावधी जातो, असा आजपर्यंतच्या आर्थिक मंदी कालावधींविषयीचा अनुभव आहे. त्यामुळे ओबामा यांच्या खांद्यावर प्रचंड मोठी जबाबदारी आहे, असे जगभरातील अर्थतज्ञ आणि राजनीतीज्ञ म्हणत आहेत. या पार्श्वभूमीवर बराक ओबामा हे एक आदराचे स्थान आहे, असे म्हणायला हरकत नाही.

परिश्रम आणि मिंधेपणा !
अमेरिकेतील डेमोक्रॅटिक आणि रिपब्लीकन या दोन प्रमुख पक्षांनी आजपर्यंत त्या देशात राजवट चालवली आहे. राजनीतीच्या दृष्टीने विचार करता डेमोक्रॅटिक पक्षाच्या सरकारकडून भारताला झुकते माप मिळते, तर रिपब्लीकन सरकार पाकधार्जिणे असते. बराक ओबामा हे डेमोक्रॅटिक पक्षाचे असल्यामुळे आपल्या देशाचे परराष्ट्र धोरण त्याचा कसा लाभ घेणार, हे पहायचे आहे. जागतिक अर्र्थव्यवस्थेचे जवळपास तीनतेरा वाजलेले असले, तरी अमेरिका व पाश्चात्त्य देश पुढाकार घेऊन या मंदीवर मात करू शकतात. बराक ओबामा यांनी स्वत:ची जबाबदारी ओळखली आहे आणि त्यांना अमेरिकेचा कारभार हाती घेण्यासाठी अद्याप शंभर दिवसांचा अवधी बाकी असला, तरी आजपासून त्यांनी त्यांच्या नियोजनाचे आराखडे तयार करायला सुरुवातही केली आहे. अविरत परिश्रम ही त्यांच्या यशाची किल्ली म्हणायला हवी. केवळ चार दिवसांच्या कालावधीत त्यांनी अर्थव्यवस्था सावरण्यासाठी १७ सदस्यांची उच्चस्तरीय सल्लागार समिती स्थापन केली. ही तत्परता आणि तळमळ आपल्या देशातील नेत्यांमध्ये नाही; म्हणून ओबामा यांचे गुणगान सर्वत्र होतांना दिसत आहे. प्रचाराच्या काळात ओबामा यांनी जागतिक परिस्थितीवर बोलतांना पाकला दिलेला सल्ला भारतीय राजकारण्यांना दिलासा देणारा आहे. पाकला भारतापासून धोका नसून पाकमधील दहशतवादापासून तो आहे. पाकला दिला जाणारा मदतनिधी दारिद्र्य निर्मूलनासाठी न वापरता शस्त्रास्त्रे गोळा करण्यावर खर्च केला जातो, हे लक्षात आले आहे, असे ओबामा म्हणाले होते. अमेरिकेच्या अध्यक्षांचे वक्‍तव्य सध्याच्या काँग्रेस सरकारला सुखावणारे वाटते. सामर्थ्यहीन असल्यावर त्याहून वेगळे ते काय होणार ? ही लाचार वृत्ती सोडून शत्रूला वठणीवर आणणारे सरकार देशाला लाभण्यासाठी आता वैचारिक क्रांतीच हवी !