Monday, November 17, 2008
राष्ट्रीय एकात्मतेचा प्रश्न
रविवारी शिवाजी उद्यान, दादर येथे एकात्मता परिषद झाली. इस्लाम आणि ख्रिस्तीधर्माचे प्रतिनिधी विशेषत्वाने उपस्थित होते. चिमणलाल आणि मोतीलाल सेटलवाड या स्वातंत्र्यलढ्यातील गाजलेल्या घराण्यातील आणि जावेद आनंदशी लग्न केलेली तिस्ता सेटलवाड ही महिला पत्रकार सर्व अल्पसंख्यांक समाजाची स्वयंघोषित प्रतिनिधी म्हणून या व्यासपिठावर वावरत होती. `राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येत असून त्याच्या निषेधार्थ आपल्याला रस्त्यावर उतरावे लागेल', अशी धमकी तिने दिली आहे. अल्पसंख्यांकांवर सतत हल्ले होत आहेत; म्हणून एकात्मता धोक्यात आली आहे, असा सिद्धांत तिने मांडला आहे. तिस्ता ही सेटलवाडात जन्मली नसून महमद अली जिना यांच्या घराण्यात जन्माला आली असावी अशा थाटात ती परिस्थितीचे विश्लेषण करत असते. काँग्रेसकडून मुसलमानांवर सर्व बाजूंनी अन्याय आणि अत्याचार होत आहेत, असा कांगावा करत जिनांनी गांधींना नमविले. गांधींनी हिंदूंच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण केली आणि शेवटी तथाकथित अन्यायाचे प्रायश्चित्त म्हणून पाकिस्तान द्यायला लावले. तोच डाव सोनिया आणि मनमोहनसिंग सरकार आज खेळत आहेत आणि त्या खेळातील महत्त्वाचा मोहरा म्हणून ते तिस्ताला वापरीत आहेत. हिंदूंनी वस्तूस्थिती तिस्ताच्या तोंडाला फासून तिच्या अवलक्षणी चेहेर्याला काळे करायला लावले पाहिजे. भारतात अल्पसंख्यांकांचे चार प्रकार आहेत. पारशी हे आदर्श आणि अनुकरणीय अल्पसंख्यांक आहेत. इस्लामने त्यांना इराणबाहेर काढल्यामुळे ते भारताच्या आश्रयाला आले. त्यांची नौका गुजरातच्या संजाण बंदराला लागल्याने त्यांनी गुजराती भाषा आणि पेहराव आपला म्हणून कायमचा स्वीकारला. `दुधात साखर जशी विरघळते, तसे हिंदूंशी आम्ही पूर्णपणे एकरूप होऊन राहू', असे वचन त्यांनी संजाणच्या राजाला दिले आणि तसे एकरूप होऊन ते राहिले. पारश्यांच्या सहनिवासाने हिंदूंचे मानसिक स्वास्थ्य कधीही बिघडले नाही उलट ते समृद्ध झाले. ख्रिस्तीम्हणून हिंदूंपेक्षा वेगळी वागणूक आम्हाला नको, अल्पसंख्यांक म्हणून कसलेही आरक्षण नको, आम्हाला भारतीय म्हणून रहायचे आहे, असे ख्रिस्तीप्रतिनिधींनी घटना परिषदेत म्हटले होते. मोगलांकडून हिंदूंवर जे अनन्वित अत्याचार झाले त्याविषयी मुसलमानांनी हिंदूंची क्षमा मागितली, तर भविष्यात िख्र्चाश्नांनाही ते लाभदायक होईल, असे कवी ना.वा. टिळकांचे चिरंजीव देवदत्त यांनी भारत स्वतंत्र होताच आवाहन केले होते. टिळकांनी ख्रिस्तीधर्माचा स्वीकार केला होता. त्यांचे भारतीयत्व कमी झाले नव्हते; परंतु मुसलमानांनी देवदत्तांचे ऐकले नाही. त्यांनी कधीही पश्चात्ताप व्यक्त केला नाही. उलट प्रत्येक विषयात हिंदूंपेक्षा आपण वेगळे आहोत, असे दाखवून हिंदूंचा राष्ट्रीय अपमान करण्याची एकही संधी मुसलमानांनी सोडली नाही. `भारतात आपण स्वतंत्र आणि युद्धमान राष्ट्र आहोत', अशाच भूमिकेत मुसलमान नेहमी वावरले. त्यांनी क्षुल्लक कारणावरून दंगे केले. भीतीचे साम्राज्य निर्माण करून त्यांनी पाकिस्तान मिळवले. तीच नीती काश्मीर गिळंकृत करण्यासाठी ते अवलंबित आहेत. मुसलमानांना राजकीय महत्त्वाकांक्षा आहे. पारश्यांना ती नाही. िख्र्चाश्न मुसलमानांमुळे बहकले आहेत; म्हणून मुसलमानांची राजकीय फुटीरपणाची महत्त्वाकांक्षा मुळातून मोडून काढली की िख्र्चाश्न मुख्य प्रवाहापासून दूर रहाणार नाहीत. मग राष्ट्रीय एकात्मता साधणे आपल्या आवाक्यात येईल. मग काँग्रेस आणि तिस्तासारख्या दलाल संस्था आणि व्यक्ती संदर्भशून्य होतील.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment