धर्माचार्य व सेनाधिकारी यांनी एकत्र येऊन समाजरक्षणाचे दायित्व घेणे, हे काळ बदलत असल्याचे द्योतक !
हिंदू-मुस्लीम ऐक्याचा प्रयोग किती यशस्वी झाला, हे ओळखण्याची गांधीयुगातील खूण म्हणजे मुसलमानांकडून अधिकाधिक मार खाऊन हिंदूंची सहनशीलता किती चिवट झाली आहे, ते पहाणे ही होती; परंतु रक्त सांडल्यावर किंवा आगीचे चटके लागल्यावर काय वाटते, हा अनुभव मुसलमानांना देण्याचे गुजरातमधील सर्वसामान्य हिंदूंनी ठरवले आणि जमाना बदलला आहे, याची जाणीव हिंदूंना आणि मुसलमानांना दोघांना झाली. जमाना बदलत चालल्याची ही चाहूल अमरनाथ भूमी आंदोलनानंतर परत लागल्यानंतर हिंदूंनी आता भोळे राहू नये. मुसलमानांनी भारतात कसे रहावे, असे हिंदूंना वाटते ते त्यांनी आता स्पष्टपणे सांगावे आणि तशी कृती त्यांच्याकडून करवून घ्यावी.
लेखक : ज्येष्ठ पत्रकार श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी
फाळणीनंतर हिंदुस्थानात थांबलेले मुसलमान स्वीकारण्याच्या मनस्थितीत आले ! भारतात फाळणीनंतर जे मुसलमान राहिले, ते सुरुवातीला साशंक होते. आपण पाकिस्तानात गेलो नसलो, तरी त्या इस्लामी राष्ट्राच्या निर्मितीला आपण मनापासून पाठिंबा दिला असल्यामुळे हिंदूंच्या मनात आपल्या विषयी राग असेल, अशी भीती त्यांना वाटत होती. मुसलमानांनी दंगे करून पाकिस्तान मिळवले. शांतताप्रिय आणि सहिष्णू हिंदूंना अवमानित करून त्यांची भूमी आपण पादाक्रांत केली असल्याने आपल्याविषयी त्यांच्या मनात अढी असेल, अशी धाकधूक मुसलमानांच्या मनात होती. मुसलमान गुंडांनी आपल्या शेजारच्या हिंदू स्त्रियांवर बलात्कार केले, तेव्हा त्यांच्या रक्षणार्थ आपणास धावून जाता आले नाही, हे हिंदूंच्या मनात कायमचे घर करून रहाणे साहजिक आहे, असे मुसलमानांच्या मनात वारंवार येई आणि त्याची प्रतिक्रिया किती उग्र असेल, याचा विचार करण्यात मुसलमानांच्या कित्येक रात्री खर्ची पडल्या आहेत. हिंदू आपला तिरस्कार करतील, अशी मुसलमानांत धास्ती होती. हिंदूंची आपल्या विषयीची मते चांगली व्हावीत; म्हणून आपण पूर्वीचे राहिलो नाही, तर बदललो आहोत, असे दाखवावे असे मुसलमानांना वाटू लागले. त्या वेळी मुंबईत आणि अनेक लहानमोठ्या नगरात टांगा हे वाहतुकीचे साधन होते. मुंबईत त्याला घोडागाडी म्हणत. जे टांगेवाले मुसलमान होते, ते गोंडेवाली लाल टोपी घालीत असत. फाळणीनंतर या टांगेवाल्यांनी ही लाल टोपी फेकून दिली आणि ते साध्या कापडाची पांढरी टोपी घालू लागले. परिस्थिती बदलली आहे आणि आपण परिस्थितीप्रमाणे बदललो आहोत, असे दाखवण्याचा तो प्रयत्न होता.
काँग्रेसमुळे ते पुन्हा पहिल्यासारखे मुसलमान झाले !
वर्षभरात टांगेवाल्यांच्या डोक्यावरच्या सफेद टोप्या अंतर्धान पावल्या आणि पुन्हा गोंडेवाल्या लाल टोप्या टांग्यांवर झेंड्यासारख्या फडकू लागल्या. मुंबईत नेहमी घोडागाडीतून फिरणार्या एका धनाढ्याने आपल्या सवयीच्या टांगेवाल्याला एका वर्षात अशी टोप्यांची फिरवाफिरव दोनदा का झाली, असा प्रश्न विचारल्यावर त्याने दिलेले उत्तर मार्मिक आहे. तो म्हणाला की, फाळणीनंतर जमाना बदलला आहे, असे आम्हाला वाटले. मुसलमान म्हणून पटकन ओळखू येणारी आपली जी बाह्य लक्षणे आहेत. ती बदलायला पाहिजेत आणि सर्वसामान्य भारतियात सहज मिसळून जाण्याइतके आपले वेष असले पाहिजेत, असे आम्हाला वाटले; पण जसजसे दिवस गेले, तसतसे जमाना बदललेला नाही आणि आपले मुसलमानत्व जपून आणि मिरवून भारतात आपण निर्भयपणे जगू शकतो, असे आमच्या लक्षात आले. मग आम्ही सफेद टोप्या काढून ठेवल्या आणि पुन्हा पहिल्यासारखे मुसलमान झालो. जमाना बदललेला नाही, असे मुसलमानांना का वाटले ? कारण भारतात राहिलेले मुसलमान फाळणीवादी नसून देशभक्त आहेत, असे प्रशस्तीपत्र नेहरूंनी लगेच देऊन टाकले. त्यांच्याकडे संशयाने बघून त्यांना अस्वस्थ करू नका, असा दम नेहरूंनी भरला. त्यामुळे फाळणीचे समर्थन करूनही भारतात राहू इच्छिणार्या मुसलमानांना सहजीवनाचे नियम समजावून सांगण्याची दक्षता हिंदूंना घेता आली नाही. परिणामी भारताची उद्ध्वस्त धर्मशाळा होण्याचे मार्ग खुले झाले.
बाबरी मशीद पाडल्यानंतर मुसलमान पुन्हा स्वीकारण्याच्या मनस्थितीत आले !
बाबरी मशीद पाडल्यानंतर जमाना बदलला, असे मुसलमानांना वाटू लागले होते. मशिदीची एक वीट पडली, तरी सारा भारत पेटवून देऊ, अशी धमकी इमाम बुखारीने दिली होती; पण मशीद पडल्यावर मुसलमान समाज इतका विस्मयचकीत झाला होता की, काय करावे ते त्यांना सूचत नव्हते. सगळीकडे चिडीचूप शांतता होती. सर्व सामान्य काँग्रेसजनांना मनातून मशीद पाडल्याचा आनंद झाला होता. महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे वृत्त मिळवण्यासाठी मी त्या वेळी नागपूरला गेलो होतो आणि मशीद पडल्याचे कळल्यावर जवळजवळ सर्व काँग्रेस आमदारांनी मला भेटून आपणास आनंद झाल्याचे सांगितले होते.
पुन्हा काँग्रेसमुळेच मुसलमानांची मानसिकता `जैसे थे' झाली !
जमाना बदलू लागला होता; परंतु राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांनी आकाश कोसळल्याचे दु:ख आपणास झाले, असे म्हणून जो हंबरडा फोडला तो पाहून आपणास पक्षात रहायचे असेल, तर असेच गळे काढले पाहिजेत, असे काँग्रेसवाल्यांना वाटले आणि मग छात्या पिटण्याच्या आणि अशुभ सूर काढण्याचा एकच कार्यक्रम सर्व काँग्रेसजनांनी देशभर चालू ठेवला. जमाना बदललेला नाही, हे मुसलमानांच्या लक्षात आले. मुसलमानी फुटीरप्रवृत्तीला मार्गावर आणण्याची एकही संधी हिंदू पकडायला सिद्ध नाहीत, हे मुसलमानांच्या लक्षात आले. मग त्यांनी बाबरी मशीद पाडल्याचा सूड म्हणून दंगे सुरू केले. भारताच्या हिताच्या विरोधात आपण कितीही लांड्यालबाड्या केल्या, तरी हिंदु-मुस्लिम ऐक्यासाठी हिंदू त्या सहन करतील, असा मुसलमानांचा ठाम समज आहे. हिंदूंवर गांधीवादाचा भयंकर प्रभाव असल्याने ते आघाताला प्रत्याघाताने उत्तर देणार नाही, अशी निश्चिती मुसलमानांना वाटते.
नरेंद्र मोंदींनंतर काश्मीरमधील हिंदूंचा हिसका बसल्यावर मुसलमान पुन्हा नरमलेत !
या त्यांच्या समजाला प्रचंड धक्का नरेंद्र मोदींच्या गुजरातने दिला. मुसलमानांनी गोध्रा लोहमार्ग स्थानकाजवळ साबरमती एक्स्प्रेसच्या एका डब्याला आत कारसेवक कोंडून आग लावली. सगळयाना जिंवत जाळून ठार मारले. आगीचे चटके कसे असतात आणि रक्त बाहेर आल्यावर काय वाटते याचा अनुभव मुसलमानांनी हिंदूंना अनेकवार दिला होता. हिंदू मुस्लीम ऐक्याचा प्रयोग किती यशस्वी झाला, हे ओळखण्याची गांधीयुगातील खूण म्हणजे मुसलमानांकडून अधिकाधिक मार खाऊन हिंदूंची सहनशीलता किती चिवट झाली आहे, ते पहाणे ही होती; परंतु रक्त सांडल्यावर किंवा आगीचे चटके लागल्यावर काय वाटते, हा अनुभव मुसलमानांना देण्याचे गुजरातमधील सर्वसामान्य हिंदूंनी ठरवले आणि जमाना बदलला आहे, याची जाणीव हिंदूंना आणि मुसलमानांना अशी दोघांना झाली. मोदींनी मन्वंतर केले. भिवंडीच्या दंगलीनंतर अब हिंदू मार नही खाअेगा, अशी गर्जना अटलबिहारी वाजपेयींनी केली होती. तिचा साक्षात्कार मोदी युग सुरू झाल्यावर हिंदूंना झाला. त्यानंतर काही वर्षे गेली. हिंदू धीट बनले. नेतृत्वावर अवलंबून न रहाता आपले जीवनमरणाचे प्रश्न आपले आपणच सोडवायला पाहिजेत, असा निर्धार करण्याच्या स्थितीप्रत हिंदू मानसिकता आली. अमरनाथ यात्रेकरूंसाठी दिलेली भूमी गुलाम नबी आझाद सरकारने काढून घेतली, तेव्हा सर्वसामान्य हिंदूंनी स्वत: व्यूहरचना आखून दोन महिने आंदोलन केले आणि भूमी परत मिळवली. मुसलमानांवर आर्थिक बहिष्कार टाकून त्यांना सहजीवनवादी करता येते, असा धडा या प्रकरणातून हिंदूंना मिळाला.
आता हिंदु धर्माचार्य आणि सेनाधिकार्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे मुसलमान स्वीकारण्याच्या मनस्थितीत येत आहेत !
परंतु इस्लामी आतंकवाद इतका भयंकर आहे की, त्याच्यावर मात करण्याची इच्छाशक्ती सरकारकडे नसेल, तर ती लढाई सर्वसामान्य हिंदूंवर न सोपवता समाजातील प्रगल्भ घटकांनी त्यात लक्ष घातले पाहिजे, असे काहींना वाटले असावे. धर्माचार्य आणि सेनाधिकारी हे प्रगल्भ गटात मोडतात. त्यांची भारतनिष्ठा आणि चारित्र्य वादातीत असते. हे दोन घटक जेव्हा एकत्र येऊन समाज रक्षणाचे दायित्व अंगावर घेतात, तेव्हा जमाना बदलला आहे, असे समजायचे असते, हे मुसलमानांना माहीत आहे. भारतात त्या दिशेने विचार सुरू झाला आहे अणि मार्गक्रमणही सुरू झाले आहे. याची जाणीव होताच इस्लामच्या भारतातील मुल्लामौलवींनी आतंकवादाचा निषेध करण्यास सुरुवात केली आहे. जामियत उलमा-इ-हिंद ही भारतातील मुसलमानांची सर्वात मोठी संघटना आहे. उत्तरप्रदेशातील देवबंद येथील दारुल उलूम या मुसलमानांची तात्विक भूमिका कुराणानुसार व्यवस्थित आहे कि नाही, हे डोळयांत तेल घालून बघणार्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संघटनेने मार्चमध्ये आतंकवादाचा निषेध करणारा ठराव केला होता. तो ठराव आपणास मान्य असल्याचे जामियतने गेल्या आठवड्यात घोषित केले. इस्लाम शांततावादी आहे, सहजीवनवादी आहे, असे ही संघटना सांगत आहे. जमाना बदलत चालल्याची ही चाहूल आहे. हिंदूंनी आता भोळे राहू नये. मुसलमानांनी भारतात कसे रहावे, असे हिंदूंना वाटते ते त्यांनी आता स्पष्टपणे सांगावे आणि तशी कृती करवून घ्यावी, असे फतवे पूर्वी निघाले होते आणि त्यांची वासलात कशी लागली, याचाही अभ्यास हिंदूंनी केला पाहिजे.
Monday, November 17, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment