Advertisement

Saturday, November 22, 2008

हिंदु समाजाला आपण `दहशतवादी' म्हणू शकतो का ?

मालेगाव बाँबस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंग यांना अटक करण्यात आल्यानंतर `हिंदु दहशतवाद' असा शब्दप्रयोग हेतूपुरस्सरपणे प्रसारमाध्यमे व निधर्मीवादी प्रचलित करत आहेत. या संदर्भात `ली फिगारो' या फ्रान्समधील सर्वाधिक खपाच्या फ्रेंच नियतकालिकाचे भारतातील प्रतिनिधी फ्रान्सुआ गोतीए यांनी त्यांच्या नियतकालिकासाठी ‘The Hindu Rate Of Wrath’ हा लेख लिहिला आहे. या लेखाचा अनुवादित भाग आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.

हिंदु नागरिकांची तुलना दहशतवादी संघटनांशी करणारी प्रसिद्धीमाध्यमे !
मी हिंदुप्रेमी असल्याने मला याविषयी लिहिण्यास सांगण्यात आले आहे. माझ्या दक्षिण आशियातील २५ वर्षांच्या अनुभवांवरून मी माझे विचार या लेखातून व्यक्‍त करत आहे. १९८० साली मी दक्षिण भारतात मुक्‍त पत्रकारितेला सुरुवात केली. पत्रकारिता करतांना सर्वप्रथम मी `कलारीपयाट्टू' या अयप्पा उत्सवाचे छायाचित्र काढले होते. येथे पत्रकारिता करत असतांना हळूहळू माझ्या लक्षात आले की, या देशाचे बुद्धीवैभव हे हिंदु धर्मातील अध्यात्म व शास्त्र यांमध्ये आहे. येथील खेड्यांत वास्तव्य करणार्‍या सर्वसाधारण हिंदूंमध्ये हे अध्यात्म मूलत:च आहे. हिंदूंच्या या अध्यात्ममय जीवनामुळेच येथील ख्रिस्ती, मुसलमान, जैन, अरब, फ्रेंच किंवा चिनी यांच्या आचारांत हिंदुत्वाचा प्रभाव पडला आहे. हिंदुत्वाच्या प्रभावामुळेच भारतातील ख्रिस्तीहे फ्रान्समधील िख्र्स्त्या्रांपेक्षा वेगळे आहेत. भारतातील मुसलमान हे सौदी अरेबियामधील मुसलमानांपेक्षा वेगळे आहेत. ईश्‍वर हा विविध रूपांतून व विविध वेळी प्रकट होतो, हा विश्‍वास येथील हिंदू ठेवतात. त्यांनी सिरीयन ख्रिस्ती, पारशी, ज्यू आणि आता तिबेटी अशा जगातील अल्पसंख्यांक जमातींना आश्रय दिला आहे. हिंदूंनी कोणत्याही देशावर लष्करी आक्रमण केलेले नाही. आपला धर्म त्यांनी कोणावरही जबरदस्तीने लादलेला नाही किंवा जबरदस्तीने कोणाचे धर्मांतर केलेले नाही.

निर्बुद्ध भारतीय पत्रकार !
जगात तुम्हाला इतर पंथांतील मूलतत्त्ववादी हिंदूंपेक्षा कमी आहेत, असे आढळणार नाहीत. त्यामुळे भारतातील व पाश्चिमात्त्य वृत्तपत्रे कोणाचीही हत्या न करता ख्रिस्तीचर्च जाळणार्‍या हिंदूंची तुलना `सिमी' या दहशतवादी संघटनेशी करत असल्याचे पाहून मला दु:ख होत आहे. जातीय तणाव हा मुख्यत: दलित व आदिवासी यांमधील धर्मांतरित ख्रिस्तीझालेले व धर्मांतर न करणारे हिंदू या दोन गटांमध्ये होत आहे, हे आपल्याला माहीत आहे. हिंदूंनी बाबरी मशीद पाडली, तेव्हा कोणत्याही मुसलमानाची हत्या केली नाही. बाबरी पतनाची तुलना १९९३ साली मुंबईमध्ये झालेल्या बाँबस्फोटांशी करा. या बाँबस्फोटांमध्ये शेकडो निष्पाप हिंदू मारले गेले. या दोन घटनांपैकी बाबरी मशीद पाडणे, हे जास्त भयानक आहे, असे (निर्बुद्ध) पत्रकार वर्णन करतात.

हिंदुबहुल भारतात हिंदूंवर होणारा अन्याय !
हिंदु दहशतवादाविषयी मी स्पष्टपणे काही मांडू इच्छितो. अरबांनी भारतावर आक्रमण केल्यापासून हिंदू दहशतवाद सहन करत आहे. १३९९ साली तैमूरने एका दिवसात एक लाख हिंदूंची कत्तल केली. पोर्तुगिजांनी `इन्क्विझीनशन'च्या वेळी अनेक ब्राह्मणांना सूळावर चढवले. अजूनही भारतात हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. १९०० साली काश्मीरमध्ये दहा लाख हिंदू होते. आता अवघे काही हिंदू तिथे शिल्लक आहेत. उरलेले भीतीने पळून गेले. गेल्या चार वर्षांत भारतभर होणार्‍या अनेक स्फोटांमध्ये अनेक निष्पाप हिंदू ठार झाले. या देशात बहुसंख्य असलेल्या हिंदूंची चेष्टा केली जात आहे. त्यांना योग्य त्या सवलती दिल्या जात नाहीत. हिंदूंना त्यांच्या प्रसिद्ध अमरनाथ यात्रेसाठी सवलती न देणारे सरकार हज यात्रेसाठी भरघोस साहाय्य करत आहे. आमिष दाखवून किंवा आर्थिक मदत देऊन आपल्याच बांधवांचे व भगिनींचे ख्रिस्तीधर्मात होणारे धर्मांतर त्यांना उघड्या डोळयांनी पहावे लागत आहे. हिंदूंना त्यांच्या ८४ वर्षे वयाच्या स्वामींची हत्या पहावी लागत आहे. हिंदूंच्या देवतांची विटंबना केली जात आहे.

सहनशीलतेचा अंत झालेल्या हिंदूंकडून उद्रेक !
आता मात्र सहनशीलतेचा अंत झाला आहे. काही शतकांपासून एका टप्प्याला मेंढ्यांप्रमाणे कत्तल होत असलेल्या व महात्मा गांधी ज्यांना भित्रे म्हणायचे अशा हिंदूंनी उद्रेकापोटी उठाव केला आहे. गुजरातमध्ये हे प्रथम घडले. त्यानंतर जम्मू, कंधमल, बंगळुरू व मालेगाव येथे ते घडत आहे. यानंतर ते कुठेही इतरत्र घडू शकते. कोणत्याही राजकीय नेतृत्वाखाली न लढता सर्वसाधारण हिंदूंनी उत्स्फूर्तपणे केलेली ही क्रांती आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी दर सहा जणांमागे एक हिंदू आहे. कायद्याचे पालन करणारा व एकतेवर विश्‍वास ठेवणारा जगातील सर्वांत मोठा हा घटक आहे. अशा समाजाला आपण दहशतवादी म्हणू शकतो का ?

No comments:

Post a Comment