देशाच्या संरक्षणव्यवस्थेकडे पूर्ण दुर्लक्ष म्हणजे सत्तेने अंध झालेल्या राज्यकर्त्यांची `विनाशकाले विपरित बुद्धी' !
रशियामध्ये `के १५२ - नेर्पा' ही `अकुला-२' श्रेणीची आण्विक पाणबुडी नुकतीच प्रशांत महासागरात दुर्घटनाग्रस्त झाली. १९७२ साली तयार करण्यात आलेली ही पाणबुडी १० वर्षांच्या भाडेपट्टीवर भारतीय नौदलात सामील करून घेण्याचा आत्मघातकी निर्णय काँग्रेस सरकारने घेतला होता. तिचे `आयएन्एस् चक्र', असे नामकरण करण्याचेही भारताकडून ठरवण्यात आले होते. ही पाणबुडी भारतात आणल्यानंतर तिचा अपघात झाला असता, तर त्यातून भारताची न भरून येणारी वित्त व जीवित हानी झाली असती. तसेच ही पाणबुडी आण्विक असल्याने त्याचा धोका येथील समुद्रातील जिवांनाही निर्माण झाला असता. येथे लक्षात घ्यावयाचा मुद्दा म्हणजे भारताने यापूर्वीही संरक्षणासंबंधीचे जे जे साहित्य परदेशांकडून भारत सरकारने खरेदी केले, त्यामध्ये नंतर काही ना काही त्रुटी निघाल्या आहेत. त्याचा परिणाम भारतीय जवानांना भोगावा लागला आहे. अशा त्रुटी निघण्याचे मुख्य कारण म्हणजे खरेदी करण्यात आलेले साहित्य त्या देशाने वापरून ते टाकाऊ झाल्यावर भारताला विकले आहे. अथवा भारताला ते खरेदी करण्यास भाग पाडले आहे. यापूर्वी भारताने स्वीडनकडून `बोफोर्स' तोफा खरेदी केल्या होत्या. त्यामध्ये `आर्थिक' व्यवहार झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पाकिस्तानने भारताच्या हद्दीत भारतावर कारगिलचे युद्ध लादले. या युद्धात या तोफांतील उणिवा सर्वांच्या निर्दशनास आल्या. भारतीय राज्यकर्ते जवानांना असे तकलादू साहित्य देशाच्या संरक्षणासाठी देणे हा बेजबाबदारपणाचा कळस आहे. यापूर्वी आपण परदेशातून भारतीय संरक्षक दलासाठी लढाऊ विमाने, तोफा, युद्धनौका आदी खरेदी केल्या आहेत. भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या भारतीय राज्यकर्त्यांनी देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे साहित्य खरेदी करतांही तडजोड अथवा `आर्थिक' व्यवहार झाल्याच्या बातम्या आपण ऐकल्या आहेत.
राष्ट्राभिमान गहाण टाकलेल्या काँग्रेस सरकारला भारत संरक्षण क्षेत्रात अग्रेसर झाला पाहिजे व देशाच्या संरक्षणासाठी जवानांना अत्याधुनिक साहित्या उपलब्ध करून दिले पाहिजे, असे कधी वाटल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे संरक्षण साहित्यांची निर्मितीमध्ये भारत पाश्चात्त्य देशांच्या कितीतरी वर्षे मागे आहोत. त्यामुळे त्यांनी वापरून झालेली युद्धसामग्री आपण त्यांच्याकडून खरेदी करतो. प्रखर राष्ट्राभिमान भिनलेल्या छोट्याशा इस्त्रायलकडून आपण अत्याधुनिक रडारयंत्रणा खरेदी करतो. असे संरक्षण साहित्य तयार करण्यासांठी काँग्रेस सरकारने कधीच लक्ष दिले नाही. भविष्याचा विचार करून संरक्षण साहित्यासाठी आवश्यक त्या निधीची तरतूद नियोजनशून्य व राष्ट्राभिमानाच्या वल्गना करणार्या काँग्रेस सरकारला करता येत नाही. त्यामुळे दहशतवादी व नक्षलवादी यांकडे जवानांपेक्षा अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आहेत. त्याच्या आधारे जवान दहशतवादी व नक्षलवादी यांना तोंड देत आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात सर्वाधिक सत्ता उपभोगणार्या नियोजनशून्य काँग्रेस सरकारने देशाच्या संरक्षण व्यवस्थेकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचे आपल्याला पहायला मिळते !
उडत्या शवपेट्या ठरलेली मिग विमाने
परदेशातून घेतलेल्या व कधीही दगा देऊ शकेल, असे युद्धसाहित्य लष्कराला देऊन जवान व समस्त भारतीय जनता यांच्या जिवाशी काँग्रेस सरकार खेळत आहे. लष्कराला आवश्यक निर्णय घेऊ न देता त्यात ढवळाढवळ करून आपले इप्सित साध्य करू पहाणार्या काँग्रेस सरकारचा आणखी एक धोकादायक निर्णय म्हणजे मिग विमाने खरेदी करणे. रशियाने कालबाह्य केलेली मिग विमाने विमाने खरेदी करण्याचा आत्मघातकी निर्णय काँग्रेसच्या सरकारने घेतला. विमानेही भारतात दाखल झाली; मात्र एकामागोमाग एक या विमानांचा अपघात होण्यास सुरुवात झाली. ती विमाने म्हणजे भारतीय जवानांसाठी उडत्या शवपेट्या बनल्या ! त्यामध्ये अनमोल अशा भारतीय जवानांचे प्राण जाऊनही काँग्रेस सरकारने आजही लष्कराला त्या विमानांचे उड्डाण थांबवण्याबाबत कोणताही निर्णय दिलेला नाही. नुकतेच मिग-२१ विमान सिबसागर जिल्ह्यात कोसळले. या वर्षी या जातीची ३ विमाने कोसळली आहेत. ही विमाने सदोष असल्याचे यापूर्वी झालेल्या मिग विमानांच्या अपघातावरून सिद्ध झाले आहे. एकूणच भारतीय जवानांच्या जिवावर उठणारे व युद्धात तकलादू ठरणारे युद्धसाहित्य आयात करून युद्धाच्या आधीच देशाच्या नावावर पराभवाची नोंद करू पहाणारे राष्ट्रघातकी राज्यकर्ते हटवण्यासाठी आता वैचारिक क्रांतीला पर्याय नाही !
Showing posts with label russia. Show all posts
Showing posts with label russia. Show all posts
Sunday, November 16, 2008
Subscribe to:
Posts (Atom)