आपल्या धर्मावर व राष्ट्रावर खूप मोठे संकट आले आहे. `आपण उद्या जिवंत असू कि नाही', हे सध्या सांगू शकत नाही. दहशतवादी मुसलमानांना कुरवाळणारे दोन्ही काँग्रेसचे सरकार राष्ट्र व धर्म प्रेमी हिंदुत्ववादी संघटनांवर `बंदी' घालू पहात आहे. अशा प्रकारे हिंदु धर्मियांसाठी आपत्काळच सुरू झाला आहे. असे असतांना मौजमजा करणार्या जन्महिंदूंमध्ये जागृती करायला हवी अन्यथा हिंदुद्रोह्यांच्या अत्याचारांमुळे भारताचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. हिंदूंमध्ये जागृती कशी करावी, याविषयी सनातन संस्थेचे गोवा राज्य व रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा यांचे प्रसारसेवक श्री. मदन सावंत यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन सर्व हिंदूंना मार्गदर्शक ठरेल, यासाठी ते येथे देत आहोत.
भारतातील हिंदूंचे धर्मांतर हे धर्मद्रोह्यांचे उद्दिष्ट
सर्वप्रथम आपल्या राष्ट्रावर व धर्मावर आलेल्या संकटामागे कारण काय आहे, ते शोधूया. लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून संपूर्ण जगाचा अभ्यास केला, तर पहिला क्रमांक िख्र्चाश्न, दुसरा क्रमांक मुसलमान व तिसरा क्रमांक हिंदूंचा आहे. िख्र्चाश्नांचे ध्येय आहे संपूर्ण जगाचे ख्रिस्तीकरण करणे आणि मुसलमानांचे ध्येयही संपूर्ण जगाचे इस्लामीकरण करणे हे आहे. आता या दोघांचेही लक्ष आहे, भारत आणि नेपाळ या देशांवर; कारण या दोन्ही देशांत त्यांची संख्या अत्यल्प आहे. या देशातील लोकांना धर्मांतरित केले, तर आपले राज्य आपण स्थापन करू शकतो, हाच दोघांचाही उद्देश आहे.
या दोन्ही देशांत त्यातल्यात्यात भारताचे वेगळे असे वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे महान भारतीय संस्कृती ! याच संस्कृतीचे आचरण या देशातील नागरिक करत आहेत. त्यामुळे या देशाची भरभराट सातत्याने होत आहे; म्हणून धर्मांतर घडवल्यास या देशांवर आपले राज्य आणून येथील संपत्तीचे हरण करता येईल आणि संपूर्ण जगाचे इस्लामीकरण करणे शक्य होईल, हाच मनसुबा हिंदुद्रोह्यांच्या मनात होता. या युद्धाचा पहिला टप्पा म्हणून त्यांनी भारतावर आक्रमण केले.
आजपर्यंत सर्वांत जास्त आक्रमणे ख्रिस्ती आणि मुसलमान यांनी केली. िख्र्चाश्नांची आक्रमणे ही सावकाशपणे, पैशांचे आमीष दाखवणे, धर्माबाबत गैरसमज पसरवणे वगैरे पद्धतीने चालतात. मुसलमानांचे आक्रमण मात्र िख्र्चाश्नांच्या विरुद्ध पद्धतीचे आहे. धमकावणे, ठार मारणे, बलात्कार करणे इत्यादी मार्गांनी हिंदूंना धर्मातरित करण्याचा प्रयत्न मुसलमान करत आहेत. त्याची आपण उदाहरणे पाहूया. जेणेकरून समाजप्रबोधन करण्यासाठी आपल्याला ती उपयोगी पडतील.
हिंदु धर्मावरील आक्रमणांचे विविध प्रकार
इतर धर्मियांनी हिंदु धर्माचा, आपल्या संस्कृतीचा अभ्यास कसा केला आणि त्यानुसार आक्रमणे कशा प्रकारे केली, याचा अभ्यास आपण करूया. असे करण्यामुळे या विषयाची आपली उजळणी होईल आणि दुसरे म्हणजे `हा विषय समाजात जाऊन कसा सांगू शकतो', याबद्दल आपले चिंतन होईल. आज आपल्या देशामध्ये काय घडते, याबद्दल आपण रोजच्या वृत्तपत्रांमधून वाचतो. याच्यामागे कोण आहे तर इस्लामिक संघटना. असे करण्यामागे त्यांचा उद्देश काय आहे, ते आपण पाहिलेच आहे व ते म्हणजे या देशाचे इस्लामीकरण करणे.
अ. मूर्तीभंजन आणि मंदिरे तोडणे : सुरुवातीला मोगलांनी धमकावणे, मारणे, अत्याचार करणे, घरे लुटणे, अशा प्रकारे आक्रमणे केली. तरीही काही हिंदु समाज त्यांच्या या धमकावणीला किंवा अतिशय क्रूर अशा पद्धतींना वा आमिषांना बळी पडला नाही. तेव्हा अतिशय विपरीत आणि भयावह स्थितीतही काही हिंदूंकडून विरोध होतो, तर `ही शक्ती त्यांना कोठून मिळते', याचा अभ्यास त्यांनी केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले, `हे हिंदू देवळात जातात, पूजापाठ करतात, धार्मिक सण व उत्सव करतात, त्यामुळे त्यांना एक धार्मिक, ईश्वरी शक्ती प्राप्त होते. या शक्तीच्या आधारावरच हे सगळे हिंदू टिकून आहेत.' हे लक्षात आल्यानंतर त्यांनी प्राचीन मंदिरे व मोठमोठ्या मूर्ती तोडल्या. तरीही काही हिंदू इस्लाम धर्माकडे वळत नाहीत, हे पाहून पुन्हा त्यांनी मोठ्या प्रमाणावर नरसंहार वाढवला.
आ. श्रीराम, श्रीकृष्ण व शिव या हिंदूंच्या श्रेष्ठ देवतांच्या मंदिरांवर मुसलमानांनी मशिदी आणि स्मारके बांधून हिंदूंची श्रद्धास्थाने पायदळी तुडवणे : त्यांनी आणखी काय केले, तर श्रीविष्णूचा सातवा अवतार असलेल्या श्रीरामाचे अयोध्येतील मंदिर नष्ट करून तेथे बाबरी मशीद बांधली. काही वर्षांपूर्वी ही बाबरी मशीद तोडली गेली. तरीही आज या ठिकाणी हिंदू श्रीरामाचे मंदिर उभारू शकत नाहीत. भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थानही आज मशिदीखाली आहे. संपूर्ण भारतातील सर्व हिंदूंची श्रद्धास्थाने असलेल्या श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या मंदिरांची अशी बिकट स्थिती आहे. ज्या ठिकाणी शिवतत्त्व जास्त प्रमाणात कार्यरत आहे, तो शिवमहाल म्हणजेच `तेजोमहाल' होय. ज्याला आज `ताजमहाल' म्हटले जाते, तोही एक मुसलमान स्त्रीचे स्मारक बनला आहे. हिंदूंच्या अत्यंत पवित्र अशा तीन श्रद्धास्थानांची अशी दयनीय अवस्था आहे.
इ. मंदिरांच्या ठिकाणी मशिदी आणि मदरसे बांधणे व कर्ण्यांवरून अल्लाच्या नावाने जोराने हाक मारणे : असे झाले तरीही या हिंदू लोकांच्या मनावर धार्मिक गोष्टींचा प्रभाव आहे. यासाठी त्यांना मंदिर, तीर्थक्षेत्र या ठिकाणी जायची सवय आहे, हे मुसलमानांनी लक्षात घेतले व या मंदिरांच्या ठिकाणी मशिदी-मदरसे बांधले. अर्थातच बाटगे मुसलमान सोडल्यास येथेही कोणी येत नाहीत, हे लक्षात आल्यानंतर या मशिदींवर त्यांनी मोठे कर्णे लावले आणि दिवसातून दोन वेळा अल्लाचे नाव घेऊन मोठमोठ्याने हाक मारायला सुरुवात केली. खरेतर मुंगीच्या पायातील घुंगराचा आवाजही ईश्वरापर्यंत पोहोचतो. त्यामुळे मोठमोठ्या आवाजातील कर्णे लावायची काही आवश्यकता नाही. मग हे का लावले ? त्यामागचा एकच उद्देश होता, तो म्हणजे हिंदूंच्या मनातील देवाविषयी श्रद्धा नष्ट व्हायला हवी व त्यासाठी हिंदूंच्या मनावर अल्लाचा संस्कार व्हायला पाहिजे. या कर्ण्यांद्वारे हा संस्कार ते रोज करतात.
तुमचाही अनुभव असेल की, जेव्हा ही बांग सुरू होते, तेव्हा आपले कोणत्याही गोष्टीकडे लक्ष लागत नाही. बोलणे सुरू असले, तरी ते आपण थांबवतो. त्यांच्या अल्लाचे नांव ते सातत्याने आपल्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करतात. या प्रयत्नांमुळे काही हिंदूंनी धर्मांतरही केले.
ई. तथाकथित विज्ञानवादी संस्थांद्वारे विज्ञान खरे आणि `देव-धर्म खोटे' असा प्रसार करणे : हिंदूंची देवतांवरील श्रद्धा उडायला हवी, यासाठी तथाकथित विज्ञानवाद्यांनी काय केले, तर हिंदूंच्या देवता व धर्म यांवरील त्यांची श्रद्धा नष्ट व्हावी; म्हणून वरकरणी विज्ञानाचा बुरखा पांघरणार्या संस्थेकरवी `देव नाही', असे सांगण्याचा प्रयत्न केला. इस्लामिक संघटनांनी आपला उद्देश सफल करण्यासाठी तथाकथित विज्ञानवाद्यांना निधी पुरवून संस्था स्थापन केल्या. या संस्थांच्या माध्यमातून `विज्ञान हे सत्य व देवता नाहीत', असा विचार ते समाजात निर्माण करू लागले. तरीही हिंदु समाजावर काही परिणाम झाला नाही.
उ. नाटकनिर्मात्यांकडून देवतांचे विडंबन करून हिंदूंच्या श्रद्धांचे भंजन करणे : हिंदु समाजाचा बारकाईने अभ्यास केल्यावर त्यांच्या लक्षात आले, `हिंदु समाजाचे लक्ष करमणुकीकडे आहे.' त्यामुळे ते नाटके पहातात व विविध कार्यक्रमांना उपस्थित रहातात. त्यामुळे त्यांनी श्री. मच्छिंद्र कांबळी आणि श्री. संतोष पवार यांच्यासारख्या नाटकनिर्मात्यांना हाताशी धरले. नंतर `नाटकांतून देवतांचे विडंबन करावे व विनोदाच्या नावावर देवतांची टिंगलटवाळी करावी. त्यामुळे हिंदूंची देवतांवरील श्रद्धा कमी होईल', असा विचार करून नाटकनिर्मात्यांकडून हिंदुद्रोही नाटके निर्मिली. दुर्दैवाने अशी धर्मद्रोही नाटके हिंदूंच्याच नाट्यगृहात होतात. निर्माते-लेखकही मुसलमानधार्जिणे हिंदू, नाटकातील देवतांचे विडंबन पहाणारे व टाळया वाजवणारेही हिंदूच आहेत. इतके सगळे करूनही काही हिंदू हे धर्माशी बांधीलच राहिले व त्यांनी या नाटकांना विरोधही केला.
ऊ. देवतांची नग्न आणि अश्लील चित्रे काढून त्यांची जगभर प्रसिद्धी करणे : मकबूल फिदा हुसेनसारख्या हिंदुद्वेष्ट्या चित्रकाराने हिंदूंच्या परमश्रद्धेय अशा देवतांची नग्न आणि अत्यंत अश्लील चित्रे काढली. त्याला मुसलमानांची मदत होती, हे सांगायची आवश्यकताच नाही. इतके सगळे होऊनही हिंदू समाज इतका षंढ आणि मृतवत आहे की, या धर्मद्रोही कृतीविरुद्ध समाजातील कुठल्याही व्यक्तीने आवाज उठवला नाही. त्याला हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था वगळता कोणीही विरोध केला नाही. या धर्मद्रोही कृतींसाठी अरब देशांकडून आर्थिक मदत दिली जाते. आजही हुसेन यांना दुबईत संरक्षणही दिले गेले. या सर्व गोष्टींना इस्लामिक संघटनांचा पाठिंबा आहे.
ए. हिंदूंना दूरदर्शनवरील मनोरंजनात्मक मालिकांमध्ये जखडून धर्माचरणापासून परावृत्त करणे : आता आणखी एका डावपेचाचा आपण अभ्यास करूया. हिंदु पुरुष आज गुटखा, तंबाखू, दारू, मटका इत्यादी व्यसनांच्या अधीन होऊन धर्माचरण विसरले आहेत. हिंदु स्त्रिया मात्र धार्मिक आहेत. त्या सण, व्रते, धार्मिक उत्सव यांबरोबरच काहीतरी दैनंदिन उपासना करतात. या स्त्रियांना धर्माचरणापासून दूर करायला हवे, हे या धर्मद्रोह्यांच्या लक्षात आले. त्यासाठी काही वर्षांपूर्वी त्यांनी दूरदर्शनच्या माध्यमातून काही मालिका तयार केल्या. हिंदु स्त्रिया आणि कुटुंबीय या मालिका रस घेऊन पाहू लागले. आतातर खाजगी दूरचित्रवाहिन्या आल्या. त्यांपैकी अनेक वाहिन्या घराघरांत येऊन दाखल झाल्या. त्यामुळे या वाहिन्यांवरील मालिका बघता बघता स्त्रिया व कुटुंबीय आपले सण व व्रतवैकल्ये विसरल्या. बहुतेक मालिकांचे लेखक व दिग्दर्शक मुसलमान असतात. या मालिकांतून प्रेमप्रकरणे, हेवेदावे, कलह यांचे रसभरीत प्रसंग दाखवले जातात. ज्या गोष्टी स्वप्नातही पाहिल्या नाहीत, त्या विविध मालिकांतून दाखवल्या जातात. या सर्वांमुळे मनोराज्यात रमणारी, अनैतिकता वाढवणारी व विकृती निर्माण करणारी (कु)संस्कृती घराघरांत निर्माण होत आहे. पूर्वी मंदिरात जाणार्या, मुलांना शुभंकरोति, रामरक्षा यांसारखी स्तोत्रे म्हणायला लावणार्या, कथा-पुराण-कीर्तन-प्रवचनाला जाणार्या स्त्रिया, तसेच संपूर्ण कुटुंब आता दूरदर्शनच्या अधीन झाले आहे. एकूणच हिंदूंची मानसिकता पूर्णपणे बदलत चालली आहे.
ऐ. धार्मिक उत्सवांच्या वेळी हिंदूंवर हल्ले होणे : आज आपले सण व धार्मिक उत्सव यांच्या काळात आपल्यावर मुसलमानांकडून हल्ले होतात. मशिदीजवळून हिंदूंची मिरवणूक जाऊ लागली, तर दगडफेक व मारहाण होते, अशा प्रकारे दंगल घडवली जाते. त्यानंतर पोलीस दंगलखोर मुसलमानांना नाही, तर आपल्यालाच पकडून नेतात व आपल्यावरच गुन्हे दाखल करतात. ज्या उत्सवांमुळे हिंदू समाज एकत्र येतो, असे सर्व धार्मिक उत्सव बंद करणे हा त्यांचा उद्देश आहे.
मुसलमानांच्या आक्रमणाचे काही दशकांतील उदाहरण, म्हणजे काश्मीरमधील हिंदूंचा वंशविच्छेद !
आपल्या देशातील अत्यंत गंभीर अशी समस्या म्हणजे काश्मीर समस्या. मशिदींमधील भोंग्यांमधून, वर्तमानपत्रांतील मोठमोठ्या जाहिरातींमधून, घराच्या दारांवर धमक्यांची भित्तीपत्रके लावून सार्या हिंदूंना जाहीरपणे धमकावण्यात आले, ``हिंदूंनो, म्हणजे काफिरांनो, इस्लाम धर्म स्वीकारा अन्यथा मरणास सिद्ध व्हा !'' काश्मीरमधील लाखो हिंदूंना एका रात्रीत घरदार, जमीन-जुमला सारे काही सोडून जावे लागले. तेथील हिंदूंना स्वत:चा धर्म, संस्कृती आणि प्राण वाचवण्यासाठी वैभव, संपत्ती व वडिलोपार्जित वारसा सारेकाही सोडून तेथून पळ काढावा लागला. तरीही मुसलमानांकडून होणार्या अनन्वित अत्याचारांना सामोरे जावे लागले. सहा वर्षांची मुलगी असो वा साठ वर्षांची महिला असो, शेकडाेंना मुसलमानांच्या सामूहिक बलात्कारांना सामोरे जावे लागले. हिंदूंचा वंशविच्छेद करणार्या या घटनांच्या संदर्भात संपूर्ण हिंदुस्थानातून आंदोलने करून हा विषय जागृत ठेवण्यात आला नाही. या प्रकरणी लोकांमध्ये जागृतीच झाली नाही. संपूर्ण देशात ९० टक्के हिंदू असूनही राजकीय नेते किंवा अन्य कोणीही हिंदू काश्मीरमधील हिंदूंच्या मदतीला गेले नाहीत; कारण सर्व हिंदू षंढ झाले आहेत, निद्रिस्त झाले आहेत. मुसलमानांच्या अनन्वित अत्याचारांना बळी पडलेल्या सहा वर्षांच्या मुलीने सांगितले, `माझ्यावर झालेल्या या अत्याचारांत माझा दोष काय, तर मी हिंदु म्हणून जन्माला आले.' त्या मुलीचे उद्गार प्रत्येक हिंदूला खाली मान घालायला लावणारे आहेत. आज महाराष्ट्रात मुख्यमंत्री, गृहमंत्री, महसूलमंत्री व बहुसंख्य आमदार हिंदु धर्मीय आहेत. असे असूनसुद्धा हिंदूंना मदत करणारा एकही नेता नाही. आता ही स्थिती काश्मीरमध्ये, दिल्लीत, धुळयात व गोव्यातही आहे; ती आपल्याकडे निर्माण व्हायला वेळ लागेल का ? कदापि नाही !
मुसलमानांची धर्मपरायणता
मुसलमानांच्या स्त्रिया किंवा कोणतीही व्यक्ती दूरदर्शनवरचे कार्यक्रम पहात नाही. अहमदाबादमध्ये तर आम्ही पाहिले की, रात्री १० ते १२ या वेळेत सर्व मुसलमान स्त्रिया एका मैदानावर एकत्रित येतात व लाठी-काठी आणि तलवार चालवण्याचे प्रशिक्षण घेतात. त्यांना सगळया गोष्टी शिकवल्या जातात. दर शुक्रवारी सगळे मुसलमान दुकाने बंद करून बाजाराचा दिवस असला, तरी मशिदीत जातात. ख्रिस्ती दर रविवारी आपल्या चर्चमध्ये जातात. हिंदूमध्ये मात्र कोणताही सत्संग असला, सेवा करण्यासाठी वेळ द्यायचा असला; तर अडचणींचे पाढे वाचले जातात. या प्रकरणी अभ्यास केल्यास असे लक्षात येते की, धर्मासाठी कार्य करण्याची वेळ आल्यावर मुसलमान धर्माशिवाय इतर कशालाच महत्त्व देत नाहीत. आपल्यासाठी मात्र धर्म सोडून बाकी प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असते. ही परिस्थिती अशीच राहिली; तर कोणी येथे जिवंत राहिलाच, तर तो काश्मीरप्रमाणेच फक्त मुसलमान असेल ! एका ठिकाणी धर्मजागृती विषयावरील प्रवचन संपल्यानंतर अकरा वर्षांची एक मुलगी आली आणि मला म्हणाली, ``तुम्ही सांगता हे खरे आहे. नव्याण्णव टक्के हिंदू आज मालिका पहाणे इत्यादी निरर्थक गोष्टींमध्ये अडकले आहेत. माझ्या वर्गातील मुसलमान मुलीने मला सांगितले की, तुमच्या धर्मात बरे आहे. तुम्हाला दूरदर्शन वगैरे पहायला मिळतो. आमच्या धर्मात तसे नाही. आमच्याकडील मौलवी इत्यादी मोठे लोक एका महिन्याने आमच्या घरी फेरी मारतात व कोणाकडे दूरदर्शन किंवा दूरचित्रवाहिनी असेल, तर त्यांना धमकावतात. बर्याच जणांना तर त्यांनी दूरदर्शन संचच घेऊ दिला नाही आणि दूरदर्शन संच विकत घेतलाच; तर एकच वाहिनी लावायची, ती म्हणजे इस्लाम धर्माचा प्रसार करणारी `क्यू टीव्ही'वाहिनी ! ते महिन्यातून अचानक केव्हा येतात, तेही आपल्याला कळत नाही. ती छोटी मुलगी असल्यामुळे आपल्याला ही माहिती कळली. मोठ्यांकडून हे कळणे शक्य नाही. ही स्थिती आज त्यांच्या धर्मात आहे. आपल्या धर्माचे महत्त्व त्यांनी कसे टिकवून ठेवले आहे, ते पहा ! आपल्याकडे बायकोला मालिका पहायची असल्यास नवराच दूरदर्शन संच खरेदी करून देतो. आपण धर्महानीच्या या दुष्टचक्रात टप्प्याटप्प्याने अडकत जातो.
धर्महानी होत असतांना हिंदूंमध्ये धर्मजागृती करणारी सनातन संस्था व हिंदु जनजागृती समिती !
बहुतांश हिंदू मनोरंजनाच्या अधीन झाले, तरी सुमारे पाच टक्के हिंदु समाज हिंदु धर्माशी बांधील राहिला. धर्म जे सांगतो व धर्माला जे मान्य आहे, तेच हा समाज करतो. हा समाज किंवा धर्माचरण करणार्या स्त्रिया कशाच्या माध्यमातून संघटित राहिल्या, तर याचे एक कारण म्हणजे हिंदु जनजागृती समिती व सनातन संस्था यांमुळेच ! सनातन संस्थेने केलेल्या धर्मप्रसारामुळे हिंदूंचा पुन्हा उलट प्रवास सुरू झाला. तो म्हणजे दूरदर्शन व दूरचित्रवाहिनी बंद झाली. जे धर्माचरण हिंदु समाज विसरला होता, ते धर्माचरण आता या संघटनांनी शिकवायला सुरुवात केली आहे. सनातन संस्थेने धर्मशिक्षण देण्यास सुरुवात केल्यामुळे हिंदूंच्या आचरणातच बदल होऊ लागला. धर्मशिक्षणामुळे हिंदु जागृत होऊन कृतीशील झाले व संघटित व्हायला लागले. हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभांना ३ हजार, ८ हजार, १० हजार अशा प्रकारे मोठ्या संख्येने हिंदू उपस्थित रहायला लागले.
हिंदुद्रोही काँग्रेस सरकारने जन्महिंदू राजकारण्यांवर दबाव आणून हिंदु संघटनांवर `बंदी'चा बडगा आणणे
हिंदु जनजागृती समिती असो वा सनातन संस्था असो, या दोन्हीही संघटनांच्या मागे हिंदु समाज जायला लागला. हे इस्लामिक संघटनांच्या लक्षात आल्यावर श्री. शरद पवार व श्री. रा.रा. पाटील यांच्यावर दबाव आणला. तसेच त्यांनी अन्य राजकीय पुढार्यांच्या माध्यमातून या संघटनांवर बंदी आणण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यासाठी ठाणे येथे झालेला बाँबस्फोट हे कारण पुढे सांगण्यात येऊ लागले; पण `या संघटनांचा बाँबस्फोटांशी काडीमात्रही संबध नाही', असे पोलीस तपासात सिद्ध झाले. तरीही वाढत्या दबावामुळे हे निमित्त पुढे करून `या संघटनांवर बंदीच आणूया', असे हिंदुद्रोह्यांनी ठरवले आहे.
अ. हिंदुद्रोही पक्षांचे खरे स्वरूप ! : आता ही बंदी आणू पहाणारे पक्ष कसे आहेत, ते पाहूया. एक म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस. तिची अध्यक्षा ख्रिस्तीआहे. दुसरा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस. तिचे पदाधिकारी जन्माने हिंदु व कर्माने मुसलमान आहेत; कारण त्यांची प्रत्येक गोष्टींमागील विचारसरणी हिंदु धर्माच्या विरोधातच आहे.
आ. मुसलमानांच्या दृष्टीने प्रत्येक हिंदु काफीरच ! : या प्रत्येकाने हे ओळखायला हवे की, जे धर्मांतरित नाहीत, त्यांना ते प्रथम ठार मारणार; जे त्यांना मदत करतात, त्यांना नंतर ठार मारणार. जो मुसलमान नाही, मग तो कोणत्याही धर्माचा असो; तो काफीरच आहे. पूर्वीचा इतिहास पाहिला, तर काय दिसते ? मुसलमान राज्यकर्त्यांनी विरोध करणार्या हिंदु राजांचा काटा त्या वेळच्या हिंदु राजांकरवीच काढला होता. तसेच विरोधक संपवल्यानंतर मदत करणार्या हिंदु राजांनाही त्यांनी संपवलेच. पैसा व सत्ता यांच्या लोभामुळे आज ही वस्तूस्थिती राजकीय पुढार्यांच्या लक्षात येत नाही. तसेच जनतेलाही या सर्व गोष्टी दिसत नाहीत. शंभर-दोनशे रुपयांना आपण विकले जाऊन आपला धर्म बदलतो.
इ. .... अन्यथा दहा वर्षांत संपूर्ण भारताचा पाकिस्तान होईल ! : हल्ली सनातन संस्था, बजरंग दल, हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रीय स्वराज्य संघ यांसारख्या हिंदुत्ववादी संघटनांवर शासन बंदी घालू पहात आहे. बंदी घातल्यावर हिंदु धर्मासाठी थोडे-फार काही करत आहेत, अशा धर्माभिमान्यांची सरकार धरपकड करील. त्यामुळे समाजात धर्मावरील हल्ल्यांना प्रत्युत्तर देणारे, विरोध करणारे कोणी रहाणार नाहीत. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांवर बंदी आली आणि हे धर्मद्रोही सरकार टिकले, तर येत्या दहा वर्षांत संपूर्ण भारताचा पाकिस्तान झाल्यास नवल वाटण्याचे काही कारण नाही. मतांसाठी काहीही करणार्या या षंढ राजकारण्यांना त्यांचेच हिंदु बांधव नकोसे झाले आहेत. अशा हिंदुद्रोही नेत्यांना आपल्या भूमीत पाऊल ठेवायला देता कामा नये. इथे येतांना त्यांच्या मनात दहा वेळा विचार यायला हवा की, मी सातत्याने मुसलमानांची बाजू मांडतो. हिंदूंना विचारतसुद्धा नाही. मग मी कोणत्या तोंडाने तिथे जाऊ. इतकी स्थिती निर्माण व्हायला हवी !
धर्महानीकडे षंढपणे पहाणारे मरण्याच्याच लायकीचे असणे
आज सर्व हिंदु समाज निद्रिस्त आहे. आपल्या शेजारीसुद्धा बघा. पक्षापक्षांतून गावात वाद होतात. सख्खे भाऊ पक्षांत वाटले गेले आहेत व एकमेकांचे पक्के वैरी झाले आहेत. हे भ्रष्ट आणि राष्ट्रद्रोही पक्षनेते असतात दिल्लीला व त्यांच्याबद्दल आम्ही अभिमानाने सांगतो की, आमचे शरद पवार, आमचे आबा ! याउलट संतांबद्दल असे विचार हवे होते. `आमचे संत, आमचे धर्मगुरु', असे वाटायला हवे होते. आज अशी स्थिती आली आहे की, हिंदूंच्या अनेक नेत्यांची हत्या, तर होतच आहे; आता पू. लक्ष्मणानंदजींसारख्या संतांचीही हत्या होते. हे षंढपणे पहाणारा समाज मुसलमानांच्या हातून मारण्याच्याच लायकीचा आहे. त्यामुळे त्यांना नरकाचे स्थान मिळेल. तेच त्यांच्यासाठी योग्य आहे.
समाजाला जागृत करून धर्माचरण करायला शिकवणे ही काळाची गरज असणे
असे असले तरी धर्माबद्दल काहीतरी चाड असलेले आजही आहेत. त्यांना जागरूक करण्याची खूप गरज आहे. हिंदु धर्म पक्ष, जाती, संप्रदाय व संघटना यांमध्ये विभागला आहे. या सर्वांना `धर्म म्हणजे काय', हे सांगण्याची अत्यंत आवश्यकता आहे. `आपण हिंदु धर्मात जन्माला आलो, काँग्रेसमध्ये किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाही जन्मलो', याची जाणीव त्यांना व विशेषत्वाने काँग्रेसवाल्यांना करून द्यायला हवी. हे आपण आज समाजात जाऊन सांगायला पाहिजे. आपणाला साधना करायची असेल, तर समाजाला सात्त्विक बनवणे व त्यासाठी समाजाला धर्माचरण करायला शिकवणे, ही आपली साधनाच आहे. तसेच हे सर्व जर आपण आताच केले नाही, तर एक दिवस आपल्यालासुद्धा दुसरा धर्म स्वीकारावा लागेल.
सनातनवरील `बंदी'विषयी धर्माभिमान्यांना जागृत करायला हवे !
समाजात जेव्हा क्रांती होते, तेव्हा संपूर्ण समाज एकत्र आलेला असतो. हे समाज एकत्र आणण्याचे काम आपणा सर्वांचे आहे; म्हणून आपण प्रत्येकाने ठरवायला हवे की, मी माझा किती वेळ धर्मासाठी देणार ? आज प्रत्येकाने जास्तीतजास्त वेळ धर्मासाठी देण्याची गरज आहे. आज आपण जर वेळ दिला नाही आणि उद्या संस्थेवर बंदी आली, तर आपण काहीच करू शकणार नाही. या समाजानेतरी पुढे येऊन सनातनच्या बाजूने बोलायला पाहिजे. ही संस्था म्हणजे कोण आहे, तर हिंदूंचा खरा आधारस्तंभ आहे. लक्षात घ्या, ``हिंदु धर्माचा दिवा सनातन संस्थेच्या रूपाने गेली १८ वर्षे अखंड तेवत आहे आणि हे हिंदुद्रोही राष्ट्रवादी काँग्रेसवाले आमच्या संस्थेवर बंदी आणण्याचा प्रयत्न करत आहे. अशा हिंदुद्रोह्यांना मुसलमान धर्म स्वीकारून सरळ पाकिस्तानात निघून जावे. तरीही समाजातील काहीजण त्यांच्या पाठीशी उभे आहेत. यासाठी आपल्याला समाजात जाऊन `वस्तूस्थिती काय आहे', ते सांगायला पाहिजे. `मुसलमानाच्या सांगण्यामुळे, त्यांच्या दबावामुळे हिंदुत्ववादी संघटनांवर बंदी आणली जात आहे', हे सांगून समाजाला जागृत करण्यासाठी आपण प्रत्येक व्यक्तीला भेटायला हवे.
`उद्या जिवंत असू का', हे सांगू शकत नसतांना मौजमजा न करता धर्मप्रसार करायला हवा !
दिवाळी साजरी करायला मुंबईला चाललोय, भाऊबिजेला पुण्याला चाललोय, अशी आजची स्थिती नाही. आपण असेच वागलो आणि कुठे अपघात झाला, दहशतवाद्यांचा हल्ला झाला; तर आपली हानी होऊ शकते. आम्ही तुम्हाला ही भीती घालत नसून तुमच्यासमोर सत्य मांडत आहोत; कारण नंतर `आम्हाला कोणी सांगितलेच नव्हते', असे कोणी म्हणायला नको ! आजपर्यंत मौजमजा केली ते खूप झाले. आजची स्थिती तशी नाही. आज दुसर्या क्षणाला काय घडेल, हेच आपण सांगू शकत नाही. आपण स्वत:च `उद्या जिवंत असू काय', हे सांगू शकत नाही, अशी आजची स्थिती आहे. या स्थितीत धर्माला अपेक्षित काय आहे, ते पहायला हवे. धर्मप्रसार करणे अत्यंत आवश्यक आहे, तरच ही महान भारतीय संस्कृती टिकू शकते.
मी धर्मप्रसारक आहे. आपले धर्मकर्तव्य म्हणून आपण धर्मप्रसार करायला हवा. प्रत्येक गावातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा विषय पोहोचवायला हवा. यासाठी प्रत्येकाने पक्ष, संप्रदाय, जात, गट, पद हे सर्व विसरून धर्मरक्षणासाठी उभे रहायला हवे !
।। धर्मो रक्षति रक्षित: ।।
सनातन हिंदु धर्माचा विजय असो !
Showing posts with label madan sawant. Show all posts
Showing posts with label madan sawant. Show all posts
Wednesday, November 19, 2008
Subscribe to:
Posts (Atom)