Advertisement

Showing posts with label ganga. Show all posts
Showing posts with label ganga. Show all posts

Thursday, November 6, 2008

गंगा शुद्ध कशी होईल ?

बुधवारची वर्तमानपत्रे उघडल्यावर तीन चांगल्या बातम्या वाचावयास मिळाल्या. पं. भीमसेन जोशींना `भारतरत्‍न' हा सर्वोच्च लोकपुरस्कार प्रदान करण्यात आला. गंगा नदीला राष्ट्रीय नदी म्हणून केंद्र सरकारने घोषित केले. मला अधिक आवडलेली बातमी म्हणजे भारतातील हिंदु मुलगे पाकिस्तानातील मुसलमान मुलींशी लग्न करू लागले आहेत. सध्या `झी मराठी'वर `आयडिया सारेगमप लिटल चॅम्प्स' कार्यक्रमात लहान मुले हलकी फुलकी गाणी म्हणण्याचा कार्यक्रम इतका सुंदर करत आहेत की, रसिक मराठी माणसे आठवडाभर उत्कंठेने त्याची वाट पहात असतात. पुढच्या पन्नास वर्षांचे संगीतविश्‍व ही मुले भारून टाकणार आहेत. त्यांच्यासमोर भीमसेनजींचा आदर्श घट्ट रोवलेला असणे कालोचित ठरेल. शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून सत्याचा शोध घेण्यासाठी भीमसेन वयाच्या बाराव्या वर्षी घर सोडून देशभर वणवण फिरले. दोन कोसांवरून पाण्याच्या घागरी डोक्यावरून वाहून त्यांनी गुरूंची सेवा केली. गुरुसुद्धा इतके कठोर की, त्यांनी भीमसेनकडून केवळ `सा' घोटवण्यात कित्येक वर्षे घालवली. इतकी प्रचंड साधना भीमसेनजींनी केली आहे की, संगीतातील गणित त्यांना समजले आहे, असे वाटते. भीमसेनजींचे संगीत म्हणजे धबधबा आहे. पावित्र्य आहे. खरेपणा आहे. अतिशय सामर्थ्यशाली आणि सर्वांची काळजी घेणारा थोरला भाऊ आसपास वावरत जरी असला, तरी घराच्या कर्तृत्वाला जसे चहुअंगांनी धुमारे फुटतात, उत्साहाला उधाण येते, तसे भीमसेनजींचे गाणे ऐकल्यावर वाटते. भीमसेनजींचे गाणे ऐकले की, या देशात अजून पुरुष जिवंत आहेत, असा विश्‍वास वाटतो. `काँग्रेस संस्कृतीचा ज्याच्यावर काही परिणाम झाला नाही, असा एखादा कलावंत दाखवा', असे कोणी म्हणाले, तर बिनधास्तपणे भीमसेनजींकडे बोट दाखवता येईल. काँग्रेस संस्कृतीचे एक वैशिष्ट्य म्हणजे तिने या देशातील सामाजिक जीवनात एकदिशामार्ग प्रवास सुरू केला. दोन्ही बाजूंनी दळणवळण होण्याला उत्तेजन दिले नाही. हिंदु मुली मुसलमानांच्या घरात लोटण्याचे काम काँग्रेसने आनंदाने केले; परंतु मुसलमानांच्या मुली हिंदूंच्या घरात सुना म्हणून याव्यात, असा प्रयत्‍न काँग्रेसने कधी केला नाही. मुसलमानांना भारतावर प्रेम करायला कसे लावायचे, हा सगळयात मोठा प्रश्‍न आहे. मुसलमानांच्या राक्षसी क्रौर्यापुढे भिऊन काश्मीर खोर्‍यात हिंदूंचा वंश खुंटला आहे. मुसलमानांना माणसाळवण्याची आवश्यकता आहे. त्याकरता मुसलमान मुलींवर हिंदु संस्कार झाले पाहिजेत. बुधवारच्या `डीएन्ए'मध्ये हिंदु मुले पाकिस्तानातील मुलीशी लग्ने करत असल्याच्या बातम्या आहेत. हा ओघ प्रशस्त होईल, यासाठी सर्वांनी, विशेषत: तरुणांनी प्रयत्‍न करायला पाहिजेत. म्हणजे गांधीयुग सुरू झाल्यापासून जे वाईट विचार वातावरणात भरून राहिले आहेत, ते कमी होत जातील आणि राष्ट्रजीवनाची गंगा शुद्ध होईल !
- सुघोष

निगडीत वृत्त : शरसंधान