Advertisement

Thursday, November 20, 2008

बाँबस्फोट करायचेच, तर पाकिस्तानात करू ! - हिमानी सावरकर

बाँबस्फोट करायचे असते, तर शत्रूराष्ट्रात जाऊन केले असते, असे आवेशात सांगणार्‍या हिमानी सावरकर !

मुंबई - मी माझ्या माणसांची बाजू मांडणार नाही का ? राष्ट्र व धर्म यांवर प्रेम करणे हा अपराध असेल, तर मला जरूर अटक करा. रा.रा. पाटील यांनीही म्हटले होते की, गोळीचे प्रत्युत्तर गोळीने देऊ. त्यांनाही अटक करा. आम्हाला बाँबस्फोट करायचेच असते, तर आम्ही ते पाकिस्तानात केले असते, असे परखड प्रतिपादन `अभिनव भारत'च्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती हिमानी सावरकर यांनी आज वृत्तवाहिन्यांशी बोलतांना केले.

मारूनमुटकून हिंदुत्ववाद्यांना आरोपी बनवले ! - शिवसेनेचे खासदार संजय राऊत
मुंबई - मालेगाव प्रकरणात हिंदुत्वनिष्ठांना `मोक्का' लावून राजकारण केले आहे. हिंदुत्वनिष्ठांना मारूनमुटकून आरोपी केले जात आहे. या देशात सिमी, आएस्आय या दहशतवादी संघटनांकडून सातत्याने सीमेपलीकडून दहशतवाद होत आहे. त्यांच्याकडील लक्ष हटवण्यासाठी सरकारने `हिंदु दहशतवाद' हे नाव प्रचलित केले आहे. सरकारच्या दबावाखाली काम करून पोलिसांनी हे नवीन षड्यंत्र रचले आहे.

2 comments:

  1. षड्यंत्र नव्हे कारस्थान म्हणा...

    ReplyDelete
  2. tumche barobar aahe...

    ReplyDelete