Advertisement

Monday, November 3, 2008

एकच अस्मिता - हिंदू अस्मिता

महंमद गझनीने सतरा वेळा लुटलेल्या आणि पाडलेल्या गुजरातमधील सोरटी सोमनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात पुढाकार घेतला सरदार पटेल, कन्हैय्यालाल मुन्शी आणि काका गाडगीळ यांनी. नेहरूंचा या प्रकल्पाला कडवा विरोध होता. तथापि हा राष्ट्रीय पुनर्निर्माणाचा क्षण आहे, अशी घोषणा करून बिहारमधून आलेले भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद उद्घाटन सोहळयाला जातीने उपस्थित राहिले. `आकाशवाणीने राष्ट्रपतींचे भाषण प्रक्षेपित करू नये', असा आदेश नेहरूंनी काढला. आज बिहारी अस्मिता विरुद्ध मराठी अस्मिता असा घातक वाद मुद्दाम पेटवण्यात येत आहे; म्हणून सोमनाथाची आठवण झाली. भारतात खरा वाद हिंदु अस्मिता विरुद्ध मुस्लीम अस्मिता असा आहे. सावरकर आणि गांधी यांनी या वादातील दोन बाजूंचे नेतृत्व केले. सावरकरांना महाराष्ट्राचा जाज्वल्य अभिमान होता. `महाराष्ट्र भारताचा खड्गहस्त आहे', असे ते म्हणत. `सगळे जग जरी विसरले, तरी एकटा महाराष्ट्र पाकिस्तानात गेलेल्या सिंधू नदीला मुक् करील', अशी वीरवाणी त्यांच्या मुखातून बाहेर पडली होती; परंतु हिंदु जगला, तर मराठी, गुजराती, कानडी आणि बिहारी अस्तित्वात राहील, असे ते सांगत. सिंधू मुक् करायची; कारण तिच्या काठावर हिंदु संस्कृती जन्माला आली म्हणून. भारताला एकच अस्मिता आहे, ती हिंदू अस्मिता आहे. या सिद्धांताला गांधींचा विरोध होता. हिंदु अस्मितेइतकेच किंबहुना अधिक स्थान इस्लामी अस्मितेला भारताने दिले पाहिजे, हा गांधींचा कटाक्ष होता; म्हणून त्यांचे खरेखुरे वारसदार नेहरू यांचा मंदिराच्या जीर्णोद्धाराला विरोध होता. जुन्या मंदिरातून राष्ट्राचे पुनर्निर्माण होईल, असे राजेंद्रबाबू, सरदार, मुन्शी आणि काका यांना वाटत होते. काँग्रेसमध्ये सावरकर आणि गांधींना मानणारे दोन गट होते. पहिला गट अखंड हिंदुस्थानवादी म्हणजे हिंदु अस्मितावादी, तर दुसरा गट पाकिस्तानवादी म्हणजे भगव्याबरोबर हिरवा पाहिजे म्हणणारा होता. आज अखंड हिंदुस्थानवादी गट सर्वच पक्षांत हालचाल करू लागला आहे. इस्लामी आतंकवादाविरुद्ध सर्व हिंदूंनी मतभेद विसरून एकजुटीने आणि बुद्धीचातुर्याने लढले पाहिजे, हा विचार बळावतो आहे. युद्ध घोषित करा आणि दयामाया दाखवता तुटून पडा, अशी हाक निवृत्त सेनाधिकारी आणि पोलीस महासंचालक देत आहेत. ती हाक हिंदू अस्मितेची आहे. त्यामुळे चवताळून लालूप्रसाद यादव यांच्यासारखे बेजबाबदार नेते बिहारी अस्मिता विरुद्ध मराठी अस्मिता असे खोटे वाद उभे करत आहेत. मराठी नेत्यांनी या वादात वाहत जाऊ नये. मराठी अस्मिता बिहारींचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या मनात इस्लामी आतंकवाद्यांविरुद्ध लढण्याची प्रेरणा देण्यासाठी आहे, असे महाराष्ट्राच्या वतीने सांगितले पाहिजे. ही वेळ आपापसांत लढण्याची नाही. ही वेळ इस्लामी प्रभुत्व नष्ट करण्याची आहे; कारण इस्लाम मराठी आणि बिहारी असा भेदभाव करता सगळयांनाच मारणार आहे.

- सुघोष